शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 13:00 IST

Mallikarjun Kharge : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. जिरिबाम जिल्ह्यातील एका नदीमध्ये सहा बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह सापडल्यानंतर काही तासांतच राज्यात हिंसाचार उफाळला आहे. शनिवारी आंदोलकांनी तीन मंत्र्यांसह सहा आमदारांच्या घरांवर हल्ला केला. त्यानंतर राज्य सरकारने पाच जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. तसेच राज्यातील काही भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 

ना मणिपूर एक आहे, ना मणिपूर सुरक्षित आहे, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना मल्लिकार्जुन खरगे यांनी सोशल मीडियावर लिहिले की, "तुमच्या डबल इंजिन सरकारमध्ये ना मणिपूर एक आहे, ना मणिपूर सुरक्षित आहे. मे 2023 पासून राज्य अकल्पनीय वेदना, विभाजन आणि वाढत्या हिंसाचारातून जात आहे. त्यामुळे आपल्या लोकांचे भवितव्य उद्ध्वस्त झाले आहे. आम्ही हे पूर्ण जबाबदारीने म्हणत आहोत की, भाजपला त्यांच्या घृणास्पद विभाजनवादी राजकारणामुळे मुद्दाम मणिपूर जाळायचे आहे, असे दिसते."

पुढे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की,"७ नोव्हेंबरपासून आतापर्यंत १७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. संघर्षग्रस्त भागांच्या यादीत नवीन जिल्हे जोडले जात आहेत आणि आग सीमेवरील ईशान्येकडील राज्यांमध्ये पसरत आहे. मणिपूर या सुंदर सीमावर्ती राज्यात तुम्ही पूर्णपणे अपयशी ठरला आहात. भविष्यात तुम्ही मणिपूरला गेलात तरी राज्यातील जनता कधीही माफ करणार नाही. येथील लोक कधीच विसरणार नाहीत की, तुम्ही त्यांना त्यांच्याच परिस्थितीवर सोडले आणि त्यांचे दुःख कमी करण्यासाठी आणि उपाय शोधण्यासाठी त्यांच्या राज्यात कधीही प्रवेश केला नाही."

दरम्यान, मागच्या दीड वर्षांपासून अशांत असलेल्या मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोमवारीपासून बेपत्ता असलेल्या दोन महिला आणि एका मुलीचा मृतदेह शनिवारी जिरिबाममधील बारक नदीमध्ये सापडला. तर अन्य तिघांचे मृतदेह हे शुक्रवारी रात्री सापडले होते. यामुळे काही तासांतच राज्यात हिंसाचार उफाळला आहे. आंदोलकांनी तीन मंत्र्यांसह सहा आमदारांच्या घरांवर हल्ला केला. त्यानंतर राज्य सरकारने इंफाळ पूर्व आणि पश्चिम, बिष्णुपूर, थौबल आणि कचिंग जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे.

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेNarendra Modiनरेंद्र मोदीManipur Violenceमणिपूर हिंसाचारcongressकाँग्रेस