शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Burari Death Case: 'ते' 11 जण मृत्यूआधी 6 दिवस दररोज करायचे आत्महत्येची प्रॅक्टिस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 16:14 IST

मृत भाटिया कुटुंबातील 11 जण मृत्यूआधी दररोज 6 दिवस आत्महत्येची प्रॅक्टिस करत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. 

नवी दिल्ली : दिल्लीच्या बुरारी भागातील संतनगरमधील एकाच कुटुंबातील 11 जणांच्या सामूहिक आत्महत्येने एकच खळबळ उडाली असताना या प्रकरणातील गूढ दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. या प्रकरणाला नवं वळण देणारी रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. मृत भाटिया कुटुंबातील 11 जण मृत्यूआधी दररोज 6 दिवस आत्महत्येची प्रॅक्टिस करत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. 

नारायणी भाटिया यांचा लहान मुलगा ललित कोणाच्या तरी आदेशानुसार डायरी लिहीत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. ललितने 30 जून रोजी डायरीत लिहिलेल्या मजकुरानुसार घरातील सदस्य हे 24 जूनपासून गळफास घेऊन आत्महत्या करण्याची प्रॅक्टिस करत होते. मात्र त्या प्रॅक्टिसदरम्यान त्यांचे हात, पाय, तोंड बांधलेले नसल्यामुळे ते वाचत असत. तसेच आत्महत्येआधी पूर्ण कुटुंबीय होम हवन करत असल्याचंही उघड झालं होतं. ललितने डायरीत लिहिलेल्या सूचनांचं कुटुंबातील सर्व सदस्य काटेकोरपणे पालन करत होते. वडील गोपाळदास यांच्या सूचनेवरून ललित डायरी लिहायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र यातील धक्कादायक बाब म्हणजे ललितच्या वडिलांचा 10 वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता. 

डायरीच्या पानांवर ललितचे वडील सगळ्यांना वाचवण्यासाठी येणार असल्याचंही लिहिलं होतं. डायरीमध्ये वेगवेगळ्या स्वरूपातील मजकूर पोलिसांना सापडला आहे.  तसेच मृत्यू हा मोक्षप्राप्तीचा मार्ग असल्याच्या आशयाचा मजकूरही पोलिसांना डायरीत आढळून आला आहे. त्यामुळे मोक्षप्राप्तीसाठी या कुटुंबानं आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.   

टॅग्स :Burari Deathsबुरारी मृत्यूdelhiदिल्लीCrimeगुन्हाDeathमृत्यू