शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
5
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
6
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
7
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
8
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
9
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
10
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
11
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
12
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
13
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
14
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
15
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
16
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
17
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
18
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
19
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
20
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!

माझी बायको कधी खोटं बोलत नाही; नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलं पत्नीच्या आरोपाचं समर्थन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 08:08 IST

नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवजोत कौर सिद्धू यांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि काँग्रेसच्या नेत्या आशा कुमारी यांच्यावर अमृतसरमधून तिकीट न दिल्याबद्दल आरोप केला होता.

चंदिगड - काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीने पंजाबचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रभारी यांच्यावर केलेल्या आरोपाच्या समर्थनार्थ पती नवज्योत सिंग सिद्धूही सरसावले आहेत. माझी बायको कधी खोटं बोलत नाही. ती नैतिकतेने मजबूत आहे असं प्रत्युत्तर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिलं आहे. पंजाबचे पर्यटनमंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांना पत्रकारांनी काही दिवसांपूर्वी नवजोत कौर सिद्धू यांनी केलेल्या आरोपावर प्रश्न विचारला होता त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं आहे.  

नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवजोत कौर सिद्धू यांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि काँग्रेसच्या नेत्या आशा कुमारी यांच्यावर अमृतसरमधून तिकीट न दिल्याबद्दल आरोप केला होता. मात्र मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांना आरोप फेटाळून लावला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, नवजोत कौर सिद्धू यांना अमृतसर किंवा भटिंडा या लोकसभा जागेवरुन लढण्याचा आग्रह केला होता. पण त्यांना त्यास नकार दिला. तसेच नवजोत कौर सिद्धू यांना तिकीट न देण्याबाबत माझी कोणतीही भूमिका नाही कारण तिकीट वाटपाचं काम काँग्रेस हायकमांड करते. 

नवजोत कौर सिद्धू यांचा आरोप होता की, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि पंजाब काँग्रेस प्रभारी आशा कुमारी यांच्यामुळे मला लोकसभा तिकीट नाकारलं गेले. मी अमृतसर आणि चंदिगड लोकसभा जागेसाठी मागणी केली होती. पण माझ्या मागणीला पक्षाने दुर्लक्ष केले. आमचे मुख्यमंत्री आणि आशा कुमारी यांनी अमृतसरमधून मी निवडून येऊ शकत नाही असं सांगितल्यानंतरच माझं तिकीट नाकारलं गेलं. पण मी जर पक्षाचे काम करत असेन, तर माझ्यावर पक्षाने विश्वास ठेवणं गरजेचे होते. कारण देशाला मोदींपासून वाचवण्याची ही खरी वेळ आहे असा आरोप त्यांनी केला होता. 

चंदिगड लोकसभा मतदार संघातून नवजोत कौर यांच्यासह पवन बन्सल आणि मनीष तिवारी यांची नावे उमेदवार म्हणून चर्चेत होती. अखेर, चंदिगड मतदारसंघासाठी काँग्रेसकडून पवन बन्सल यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. अनेक महिन्यांपासून नवजोत कौर या चंदिगड मतदार संघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा घेत होत्या. चंदिगड मतदार संघातून आपल्या काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात येईल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, पुलवामा हल्ल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलेल्या विधानावर पार्टी नाराज असून त्यामुळेच नवजोत कौर यांना उमेदवारी देण्यात आली नाही, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. तेव्हापासून नवजोत कौर या पक्षावर नाराज आहेत. त्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि आशा कुमारी यांच्यावर हा आरोप केल्याचं बोललं जातंय.    

टॅग्स :Punjab Lok Sabha Election 2019पंजाब लोकसभा निवडणूक 2019chandigarh-pcचंडीगढ़Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूcongressकाँग्रेस