शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

"माझं 'ब्लाउज' चर्चेचा विषय बनला..."! काँग्रेस सोडणाऱ्या महिला नेत्यानं बोलून दाखवली 'व्यथा', काय म्हणाल्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 11:51 IST

काँग्रेसच्या या नेत्यांनी आसाम भाजप मुख्यालयात राज्य भाजपाध्यक्ष भाबेश कलिता आणि मंत्री पीयूष हजारिका तथा जयंत मल्ला बरुआ यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.

आसाममध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेनंतर, गुवाहटीमध्ये 150 हून अधिक काँग्रेस आणि ऑल आसाम स्टूडेंट्स युनियनच्या (AASU) कार्यकर्त्यांनी रव‍िवारी भारतीय जनता पार्टी अर्थात भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांमध्ये माजी मंत्री बिस्मिता गोगोई, माजी विधानसभा अध्यक्ष जीबा कांता गोगोई यांची मुलगी, आसाम प्रदेश काँग्रेस कमेटीचे माजी अध्यक्ष अंजन दत्ता यांची मुलगी अंगकिता दत्ता आणि एएएसयचे माजी अध्यक्ष दीपांका कुमार नाथ यांचा समावेश आहे. 

काँग्रेसच्या या नेत्यांनी आसाम भाजप मुख्यालयात राज्य भाजपाध्यक्ष भाबेश कलिता आणि मंत्री पीयूष हजारिका तथा जयंत मल्ला बरुआ यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. महत्वाचे म्हणजे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मणिपूर ते गुजरात भारत जोडो न्याय यात्रा आसाममधून गेल्यानंतर या नेत्यांनी काँग्रेसला टा-टा बाय-बाय केला आहे. 

महिला नेत्यानं बोलून दाखवलं दुःख -द ह‍िंदूच्या एका वृत्तानुसार, आता काँग्रेसमध्ये महिला सुरक्षित नाहीत, म्हणून आपण राजकीय रंग बदलला आहे, असे काँग्रेस नेत्या गोगोई यांचे म्हणणे आहे. "माझे ब्लाउजही काँग्रेसमध्ये चर्चेचा विषय बनले होते. मी नाव घेऊ शकत नाही. पण एक काँग्रेस नेता म्हणाला की, मी भाजपामध्ये प्रवेश करणार, कारण माझ्या ब्लाउजवर कमळाचे फूल आहे. त्यामुळे, जो पक्ष महिलांचा सन्मान करू शकत नाही, अशा पक्षासोबत राहण्यात काहीही अर्थ नाही, असे गोगोई यांनी म्हटले आहे.  याच वेळी त्यांनी राज्यात होत असलेल्या विकास कामांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे कौतुकही केले.

राहुल गांधी यांच्या यात्रेचा मोठा प्रभाव पडला आहे -मंत्री पीयूष हजारिका यांनी काँग्रेसवर निशाणा साधत, 150 हून अधिक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती दिली. त्यांनी रविवारी एक्सवर लिहिले की, 'मला हे मानावे लागेल की राहुल गांधी यांच्या भारत बस न्याय यात्रेने आसाममध्ये मोठा प्रभाव पाटला आहे. आसाम काँग्रेस आणि AASU च्या 150 हून अधिकन नेत्यांनी आज भाजपामध्ये प्रवेश  केला आहे. अंकिता दत्ता, बिस्मिता गोगोई आणि दीपांक कुमार नाथ यांनी चांगाला निर्णय घेतला आहे.'

लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या महिला नेत्यानेही काँग्रेस पक्ष सोडला -महत्वाचे म्हणजे,यूथ काँग्रेस आसामच्या माजी अध्यक्ष दत्ता यांनी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बीव्ही श्रीनिवास यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. यानंतर, एप्रिल 2023 मध्ये ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने (AICC) 'पक्षविरोधी कारवाई'चा ठपका ठेवत त्यांना 6 वर्षांसाठी निलंबित केले होते.  

टॅग्स :congressकाँग्रेसAssamआसामRahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राBJPभाजपा