शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

मोदींना पत्र लिहिणाऱ्या 'त्या' 50 मान्यवरांविरोधातील देशद्रोहाचा खटला बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 21:28 IST

नरेंद्र मोदींना खुलं पत्र लिहिणाऱ्या 50 सेलिब्रिटींच्या विरोधात दाखल करण्यात आलेला देशद्रोहाचा खटला बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

मुजफ्फरपूरः मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुलं पत्र लिहिणाऱ्या विविध क्षेत्रांतील 50 मान्यवरांविरोधात दाखल करण्यात आलेला देशद्रोहाचा खटला बंद करण्याचे आदेश दिले आहेत. बिहारच्या मुजफ्फरपूरमधल्या एसएसपींनी या मान्यवरांविरोधात दाखल करण्यात आलेल्या देशद्रोहाचा खटला रद्द करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे आता त्या मान्यवरांविरोधात देशद्रोहाचा खटला चालणार नाही.  दुसरीकडे स्थानिक वकील सुधीर कुमार ओझा यांनी दोन महिन्यांपूर्वी याचिका दाखल केली होती, त्या याचिकेवरून मुख्य न्यायदंडाधिकारी(सीजेएम) सूर्यकांत तिवारींच्या आदेशानंतर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता. ओझानं सांगितलं की, 20 ऑगस्ट रोजी मी याचिका दाखल केली, त्यानंतर मुजफ्फरपूर पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आलं. दरम्यान, देशभरात वाढत असलेल्या मॉब लिंचिंगच्या घटनांमुळे व्यथित झालेल्या विविध क्षेत्रातील 50 मान्यवरांनी एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते. त्या पत्रांमध्ये मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. तसेच देशात असंतोषाचे दमन होणार नाही, असे वातावरण निर्माण करण्याची विनंती या मान्यवरांनी नरेंद्र मोदींना केली होती. त्यानंतर त्या मान्यवरांविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिणाऱ्या मान्यवरांमध्ये मणिरत्नम, अडूर गोपालकृष्णन, रामचंद्र गुहा, अनुराग कश्यप यांच्यासह कला, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील 50 जणांचा समावेश आहे. देशामध्ये निर्माण होणाऱ्या असंतोषाचे वातावरण न निवळता त्याला मोकळी वाट मिळेल, असे वातावरण निर्माण करावे. तसेच हा देश एक प्रबळ राष्ट्र बनावे, अशी विनंती या पत्राच्या माध्यमातून पंतप्रधानांना करण्यात आली होती. तसेच जय श्रीराम हे आज भडकावणारे वाक्य बनले आहे. श्रीराम हे बहुसंख्याक समुदायासाठी पवित्र आहेत. त्यामुळे राम नामाचे राजकारण बंद करावे. देशभरात दलितांवरील अत्याचाराच्या 840 घटना घडल्या आहेत. यावर काय कारवाई झाली याचे उत्तर पंतप्रधानांनी द्यावे, अशी विचारणाही या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली होती. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी