शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिमांना भारतात भीती वाटते; यावर स्मृती इराणी म्हणाल्या- आपल्याच देशात हे अल्पसंख्याक कसे झाले..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 14:04 IST

'कायदा सर्वांसाठी समान आहे. कोणत्याही समाजाच्या मनात कधीही वेगळेपणाची भावना नसावी.'

नवी दिल्ली: देशात भाजपचे सरकार आल्यापासून विरोधकांकडून अनेकदा मुस्लिम/अल्पसंख्यांक धोक्यात आहे किंवा त्यांना भीती वाटते, असे म्हटले जाते. मोदी सरकारची धोरणे अल्पसंख्याक समाजाच्या विरोधात असल्याचा आरोप विरोधक करतात, त्यामुळे मुस्लिमांमध्ये भीती निर्माण झाली आहे. यावर इंडिया टुडेच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. 

स्मृती इराणींचा विरोधकांना टोला

मुस्लिम समाजात किंवा अल्पसंख्याक समाजात भीती निर्माण केली जात आहे, या प्रश्नावर स्मृती इराणी यांनी आपल्याच देशात कोणीही अल्पसंख्याक कसा असू शकतो, असा टोला लगावला. कायदा सर्वांसाठी समान आहे. संविधान आणि कायद्यानेच देश चालतो. कोणत्याही समाजाच्या मनात कधीही वेगळेपणाची भावना नसावी. त्यांच्या कपड्यांवरुन किंवा इतर गोष्टीवरुन कोणाचाही जज करू नका. प्रत्येकाने भारतीय म्हणून पाहिले पाहिजे.

मी स्वत: एका अशा व्यक्तीशी लग्न केले आहे, ज्याच्या समुदायाची लोकसंख्या संपूर्ण जगात फक्त 55 हजार आहे. माझे पारशी कुटुंबीय म्हणतात की, आपण आपल्याच देशात अल्पसंख्याक कसे असू शकतो. हे एकून मला खूप आनंद होतो. म्हणूनच सर्व भारतीय आहोत, या भावनेने आपण पुढे गेले पाहिजे, असं स्मृती इराणी म्हणाल्या.

यावेळी मोदी सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांचा सर्व समाजांना मोठा फायदा झाला आहे, यावरही केंद्रीय मंत्र्यांनी भर दिला. मग ते आयुष्मान भारत बद्दल असो किंवा मोफत रेशन देण्याचा विषय असो किंवा घरांमध्ये शौचालये देण्याचा विषय असो. या योजनांचा लाभ प्रत्येक समाजाला मिळाला आहे, असंही इराणी यावेळी म्हणाल्या.

राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोलयावेली त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही टोमणा मारला. लंडनमध्ये दिलेल्या त्यांच्या वक्तव्यावर म्हणाल्या, आपल्या देशात प्रत्येक आई आपल्या मुलांना म्हणथे की, घरात भांडण करा, बाहेर नका करू. राहुल गांधींनी काय केले? एक भारतीय म्हणून मी त्या गोष्टीला अजिबात स्वीकारू शकत नाही. भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे, अशावेळी बाहेर जाऊन अशी विधाने केली जातात. सभागृहात गैरहजर राहणाऱ्या खासदारांबद्दल काय बोलायचं... असा टोमणाही त्यांनी यावेळी लगावला.

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीBJPभाजपाMuslimमुस्लीमcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी