शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
6
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
7
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
8
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
9
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
10
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
11
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
12
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
13
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
14
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
15
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
16
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
17
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
18
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
19
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
20
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान

मुस्लिमांना भारतात भीती वाटते; यावर स्मृती इराणी म्हणाल्या- आपल्याच देशात हे अल्पसंख्याक कसे झाले..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 14:04 IST

'कायदा सर्वांसाठी समान आहे. कोणत्याही समाजाच्या मनात कधीही वेगळेपणाची भावना नसावी.'

नवी दिल्ली: देशात भाजपचे सरकार आल्यापासून विरोधकांकडून अनेकदा मुस्लिम/अल्पसंख्यांक धोक्यात आहे किंवा त्यांना भीती वाटते, असे म्हटले जाते. मोदी सरकारची धोरणे अल्पसंख्याक समाजाच्या विरोधात असल्याचा आरोप विरोधक करतात, त्यामुळे मुस्लिमांमध्ये भीती निर्माण झाली आहे. यावर इंडिया टुडेच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. 

स्मृती इराणींचा विरोधकांना टोला

मुस्लिम समाजात किंवा अल्पसंख्याक समाजात भीती निर्माण केली जात आहे, या प्रश्नावर स्मृती इराणी यांनी आपल्याच देशात कोणीही अल्पसंख्याक कसा असू शकतो, असा टोला लगावला. कायदा सर्वांसाठी समान आहे. संविधान आणि कायद्यानेच देश चालतो. कोणत्याही समाजाच्या मनात कधीही वेगळेपणाची भावना नसावी. त्यांच्या कपड्यांवरुन किंवा इतर गोष्टीवरुन कोणाचाही जज करू नका. प्रत्येकाने भारतीय म्हणून पाहिले पाहिजे.

मी स्वत: एका अशा व्यक्तीशी लग्न केले आहे, ज्याच्या समुदायाची लोकसंख्या संपूर्ण जगात फक्त 55 हजार आहे. माझे पारशी कुटुंबीय म्हणतात की, आपण आपल्याच देशात अल्पसंख्याक कसे असू शकतो. हे एकून मला खूप आनंद होतो. म्हणूनच सर्व भारतीय आहोत, या भावनेने आपण पुढे गेले पाहिजे, असं स्मृती इराणी म्हणाल्या.

यावेळी मोदी सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांचा सर्व समाजांना मोठा फायदा झाला आहे, यावरही केंद्रीय मंत्र्यांनी भर दिला. मग ते आयुष्मान भारत बद्दल असो किंवा मोफत रेशन देण्याचा विषय असो किंवा घरांमध्ये शौचालये देण्याचा विषय असो. या योजनांचा लाभ प्रत्येक समाजाला मिळाला आहे, असंही इराणी यावेळी म्हणाल्या.

राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोलयावेली त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही टोमणा मारला. लंडनमध्ये दिलेल्या त्यांच्या वक्तव्यावर म्हणाल्या, आपल्या देशात प्रत्येक आई आपल्या मुलांना म्हणथे की, घरात भांडण करा, बाहेर नका करू. राहुल गांधींनी काय केले? एक भारतीय म्हणून मी त्या गोष्टीला अजिबात स्वीकारू शकत नाही. भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे, अशावेळी बाहेर जाऊन अशी विधाने केली जातात. सभागृहात गैरहजर राहणाऱ्या खासदारांबद्दल काय बोलायचं... असा टोमणाही त्यांनी यावेळी लगावला.

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीBJPभाजपाMuslimमुस्लीमcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी