शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

मुस्लीम महिलांनाही कलम १२५ अन्वये पोटगीचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 07:11 IST

सर्व विवाहितांसाठी एकच कायदा

नवी दिल्ली: फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) १२५व्या कलमाद्वारे मुस्लिम महिला तिच्या पतीकडून पोटगी मागू शकते. ही तरतूद धर्मनिरपेक्ष असून, सर्व धर्मातील विवाहित महिलांना लागू आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने बुधवारी दिला.

न्या. बी. व्ही. नागरत्ना व न्या. ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने सांगितले की, मुस्लिम महिला (घटस्फोटाबद्दलच्या अधिकारांचे रक्षण) कायदा, १९८६ हा धर्मनिरपेक्ष स्वरूपाच्या कायद्यावर मात करू शकणार नाही. पोटगी ही धर्मादाय गोष्ट नसून तो सर्व विवाहित महिलांचा अधिकार आहे.

याचिकादाराचे फौजदारी अपील फेटाळून लावताना मुस्लिम महिला (घटस्फोटाबद्दलच्या अधिकारांचे रक्षण) कायदा, १९८६ हा सीआरपीसीच्या कलम १२५मधील धर्मनिरपेक्ष व धर्मातीत तरतुदींवर मात करू शकणार नाही, असे खंडपीठाने नमूद केले. या खटल्यात न्या. बी. व्ही. नागरत्ना व न्या. ऑगस्टिन जॉर्ज मसिह या दोन न्यायमूर्तीनी वेगवेगळे; पण एकसमान निवाडे दिले. वैयक्तिक कायद्यांतील तरतुदींनुसार २०१७ साली समद यांनी आपल्या पत्नीपासून तलाक घेतला. प्रमाणपत्र सादर करण्यात येऊनही कौटुंबिक न्यायालयाने त्याचा विचार केला नाही व पोटगी अंतरिम रक्कम भरण्याचा आदेश दिला होता. या निकालात हस्तक्षेप करण्यास तेलंगणा हायकोर्टाने नकार दिला होता. या आदेशाला मोहम्मद अब्दुल समद यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

आर्थिक अन् घरातील सुरक्षेत वाढ झाल्यासच महिलांचे सबलीकरण; बी. व्ही. नागरत्न यांचे निकालपत्रात परखड मत

भारतीय महिलांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण होण्यासाठी आर्थिक सुरक्षेसोबतच घरातील सुरक्षित वातावरणात वाढ होणे आवश्यक आहे, असे सर्वोच्च न्यायालयातील महिला न्यायाधीश बी. व्ही. नागरत्ना यांनी आपल्या ४५ पानी स्वतंत्र निकालपत्रात म्हटले. न्यायाधीश नागरत्ना यांनी म्हटले की, भारतीय महिलांना गृहिणी म्हटले जाते. या महिला कुटुंबाचे सामर्थ्य व कणा असतात. त्यांच्यामुळेच भारतीय समाज एकवटलेला राहतो.

न्यायाधीश नागरत्ना यांनी सांगितले की, कुटुंबातील महिलांचा प्रत्येकाने आदर केला पाहिजे, तसेच त्यांचे सबलीकरण होणे महत्त्वाचे आहे. भारतात विवाहित महिलांपैकी अनेकजणी या कमावत्या नसतात. त्यांना पैशांसाठी कुटुंबातील सदस्यांवर अवलंबून राहावे लागते. गृहिणींसमोरील संकटांची बहुतांश पतीराजांना कल्पनाच नसते. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयDivorceघटस्फोट