शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

तेलंगणात मुस्लीम मते निर्णायक; टीआरएसला एमआयएमची साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 05:27 IST

तेलंगणात निवडणुकीच्या रणधुमाळीत सगळ्याच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तिथे ७ डिसेंबर रोजी मतदान होईल. तेलंगणात जातीधर्माचे राजकारण महत्त्वाचे असल्याचे प्रचारांमधून दिसत आहे.

- धनाजी कांबळे

हैदराबाद : तेलंगणात निवडणुकीच्या रणधुमाळीत सगळ्याच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तिथे ७ डिसेंबर रोजी मतदान होईल. तेलंगणात जातीधर्माचे राजकारण महत्त्वाचे असल्याचे प्रचारांमधून दिसत आहे. विशेषत: मुस्लीम समाजाची मते या निवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत.तेलंगणात १२.७ टक्के मुस्लीम समाज आहे. सर्वच मतदारसंघात त्यांचा प्रभाव आहे. मात्र, प्रामुख्याने अदिलाबाद, मेहबूबनगर, निजामाबाद, नालगोंडा, रंगारेड्डी, हैदराबाद, मेडक आणि करीमनगरमध्ये मुस्लिमांचे प्राबल्य आहे. गेल्या, २०१४ च्या निवडणुकीत तेलंगणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याचा मुद्दा होता. किंबहुना या मुद्यावर केसीआर यांनी निवडणुकीत विजयश्री मिळवली होती. मुस्लीम समाजानही केसीआर यांच्या टीआरएसलाच पाठिंबा दिला होता. विशेषत: उत्तर तेलंगणातील जनता केसीआर यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली होती.तज्ज्ञांच्या मते, लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र होण्याच्या भीतीने केसीआर यांनी मुदतीआधीच विधानसभा बरखास्त केली. एकत्र निवडणुका झाल्यास राज्याच्या मुद्यांऐवजी राष्ट्रीय मुद्यांभोवतीच निवडणूक फिरेल, असे केसीआर यांना वाटत होते. त्यामुळेच त्यांनी मुदतीआधीच विधानसभा बरखास्त केली. भाजपाच्या समर्थन किंवा विरोधाचा मुद्दाच फार चर्चेत राहील आणि विधानसभेत मुस्लीम मते कुठे जातील, याची खात्री नसल्यानेच त्यांनी हे पाऊल उचलले, असे के. नागेश्वर म्हणाले.आॅल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमीन (एमआयएम) २०१४ पासून काँग्रेससोबत नाही. आता एमआयएम व टीआरएस यांचे चांगले संबंध आहेत. एमआयएमचा हैदराबादमधील ७ मतदारसंघात मोठा प्रभाव आहे. गेल्यावेळी एमआयएमने या मतदारसंघात वर्चस्व सिद्ध केले. या विभागात ४० टक्के मुस्लीम आहेत. त्यामुळे टीआरएस आणि एमआयएमच्या मैत्रीपूर्ण संबंधाचा फायदा येथे होत आला आहे. काँग्रेसकडे वळणारी मते टीआरएसकडे वळविण्याचा एमआयएमचा प्रयत्न असेल, असेही के. नागेश्वर म्हणतात.एमआयएमबरोबरच टीआरएस आणि भाजपची यांचीही मैत्री असल्याचे बोलले जाते. हे दोघे एकमेकांविरोधात भूमिका घेत आहेत. मात्र, मुस्लिमांची मते काँग्रेसला जाऊ नयेत, यासाठी असे दाखवले जात असल्याचे तज्ज्ञांना वाटते.याच चपलांनी मला माराकोरुटला मतदारसंघात अकुला हनुमंत या अपक्ष उमेदवाराकडे सर्वांचेच लक्ष वेधले गेले आहे. प्रचारासाठी घराघरात जाऊ न तो आपले माहितीपत्रक मतदारांना देताना सोबत तो चपलांचा (स्लिपर्स) जोडही प्रत्येक घरात देत आहे. मी दिलेली आश्वासने पूर्ण नाही केली, तर तुम्ही याच चपलांनी मला बडवा, असे तो सांगत आहे.

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018