शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'आसाममध्ये 40 टक्क्यांपर्यंत पोहचली मुस्लीम लोकसंख्या', CM हिमंत बिस्व सरमा यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 18:03 IST

"आज आसाममधील मुस्लीम लोकसंख्या 40 टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. 1951 मध्ये ही लोकसंख्या 12 टक्के होती. या कालावधीत आपण अणेक जिल्हे गमावले आहेत. हा माझ्यासाठी राजकारणाचा मुद्दा नाही, तर जीवन-मरणाचा प्रश्न आहे."

भाजप नेते तथा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बुधवारी (17 जुलै) राज्यातील बदलत्या 'डेमोग्राफी' वर मोठे वक्तव्य केले आहे. आसाममध्येमुस्लीम लोकसख्या 40 टक्क्यांपर्यंत पोहचल्याचा दावा हिमंता बिस्वा सरमा यांनी केला आहे. त्यांचे हे वक्तव्य झारखंडच्या रांचीमध्ये झालेल्या एक सभेदरम्यावन आले आहे. सीएम सरमा हे झारखंडमध्ये भाजपचे सह प्रभारीही आहेत.

हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, "आसामच्या डेमोग्राफीत अथवा लोकसख्येत झालेला बदल हा माझ्यासाठी एक मोठा मुद्दा आहे. आज आसाममधील मुस्लीम लोकसंख्या 40 टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. 1951 मध्ये ही लोकसंख्या 12 टक्के होती. या कालावधीत आपण अणेक जिल्हे गमावले आहेत. हा माझ्यासाठी राजकारणाचा मुद्दा नाही, तर जीवन-मरणाचा प्रश्न आहे."

लोकसभा निवडणुक काळात घडलेल्या घटना चिंतेचा विषय - कुठल्याही धर्माचे नाव न घेता मुख्यमंत्री सरमा म्हणाले, "कोणताही गुन्हा कुण्या एखाद्या विशिष्ट धर्माकडून गेला जातो, असे मी म्हणत नाही. मात्र लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या घटना चिंतेचा विषय आहे." यापूर्वी 23 जून रोजी हिमंता बिस्वा सरमा यांनी दावा केला होता की, बांगलादेशी अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मतदान केले होते. केंद्र आणि राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विकासकामांकडे दुर्लक्ष करून त्यांनी मतदान केले.

बांगलादेशी वंशाचे अल्पसंख्याक हा एकमेव समुदाय असा आहे, जो राज्यात जातीयवादात गुंतला आहे, असा दावाही सरमा यांनी केला होता. आसाममध्ये लोकसभा निवडणुकीत 24 पैकी 15 जागा भाजपने जिंकल्या आहेत, तर 3 जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्या आहेत.

टॅग्स :AssamआसामBJPभाजपाJharkhandझारखंडMuslimमुस्लीम