शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

'आसाममध्ये 40 टक्क्यांपर्यंत पोहचली मुस्लीम लोकसंख्या', CM हिमंत बिस्व सरमा यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 18:03 IST

"आज आसाममधील मुस्लीम लोकसंख्या 40 टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. 1951 मध्ये ही लोकसंख्या 12 टक्के होती. या कालावधीत आपण अणेक जिल्हे गमावले आहेत. हा माझ्यासाठी राजकारणाचा मुद्दा नाही, तर जीवन-मरणाचा प्रश्न आहे."

भाजप नेते तथा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बुधवारी (17 जुलै) राज्यातील बदलत्या 'डेमोग्राफी' वर मोठे वक्तव्य केले आहे. आसाममध्येमुस्लीम लोकसख्या 40 टक्क्यांपर्यंत पोहचल्याचा दावा हिमंता बिस्वा सरमा यांनी केला आहे. त्यांचे हे वक्तव्य झारखंडच्या रांचीमध्ये झालेल्या एक सभेदरम्यावन आले आहे. सीएम सरमा हे झारखंडमध्ये भाजपचे सह प्रभारीही आहेत.

हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, "आसामच्या डेमोग्राफीत अथवा लोकसख्येत झालेला बदल हा माझ्यासाठी एक मोठा मुद्दा आहे. आज आसाममधील मुस्लीम लोकसंख्या 40 टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. 1951 मध्ये ही लोकसंख्या 12 टक्के होती. या कालावधीत आपण अणेक जिल्हे गमावले आहेत. हा माझ्यासाठी राजकारणाचा मुद्दा नाही, तर जीवन-मरणाचा प्रश्न आहे."

लोकसभा निवडणुक काळात घडलेल्या घटना चिंतेचा विषय - कुठल्याही धर्माचे नाव न घेता मुख्यमंत्री सरमा म्हणाले, "कोणताही गुन्हा कुण्या एखाद्या विशिष्ट धर्माकडून गेला जातो, असे मी म्हणत नाही. मात्र लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या घटना चिंतेचा विषय आहे." यापूर्वी 23 जून रोजी हिमंता बिस्वा सरमा यांनी दावा केला होता की, बांगलादेशी अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मतदान केले होते. केंद्र आणि राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विकासकामांकडे दुर्लक्ष करून त्यांनी मतदान केले.

बांगलादेशी वंशाचे अल्पसंख्याक हा एकमेव समुदाय असा आहे, जो राज्यात जातीयवादात गुंतला आहे, असा दावाही सरमा यांनी केला होता. आसाममध्ये लोकसभा निवडणुकीत 24 पैकी 15 जागा भाजपने जिंकल्या आहेत, तर 3 जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्या आहेत.

टॅग्स :AssamआसामBJPभाजपाJharkhandझारखंडMuslimमुस्लीम