शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

“ज्ञानवापी निकाल निराशाजनक, कोर्टावरील विश्वास अत्यंत कमी झाला”: मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2024 4:14 PM

Gyanvapi Case: ...मग देशात आज इतकी मंदिरे कशी? २० कोटी मुस्लीम बांधवांना ज्ञानवापी निकालाने धक्का बसला, असे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने म्हटले आहे.

Gyanvapi Case: ज्ञानवापी परिसरात असलेल्या व्यास तळघरात हिंदूना पूजा करण्याचा अधिकार देण्याचा महत्त्वपूर्ण निकाल वाराणसी जिल्हा न्यायालयाने दिला. यानंतर मध्यरात्री व्यास तळघराचे शुद्धीकरण करून पूजा करण्यात आली तसेच आरतीच्या वेळाही ठरवण्यात आल्या. यानंतर मुस्लिम पक्षकारांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला. या निकालावर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सैफुल्लाह रहमानी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, न्यायालयावरील विश्वास अत्यंत कमी झाल्याचे म्हटले आहे. 

देशातील न्यायालये अशा पद्धतीने काम करत आहे, ज्यामुळे देशवासीयांचा न्यायालयांवरील विश्वास कमी होत चालला आहे. जो प्रकार झाला, तो अतिशय निराशाजनक होता. तिथे मशिद आहे. या निर्णयामुळे २० कोटी मुस्लिम बांधव आणि सर्व न्यायप्रेमी नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. मुस्लिम समाजाची अवस्था दयनीय झाली आहे, असे सैफुल्लाह रहमानी यांनी म्हटले आहे. 

...तर देशात इतकी मंदिरे अस्तित्वात असती का?

ऐतिहासिक तारखांचे सत्य समजून घेतले पाहिजे. इंग्रजांनी या देशात येऊन फोडा आणि राज्य करा, हे धोरण स्वीकारले. १८५७ मध्ये त्यांनी पाहिले की, देवाचे उपासक आणि पूजक दोघेही देशासाठी एकत्र आले आहेत. यानंतर, त्यांनी दोन समुदायांमध्ये फूट निर्माण करण्याचे काम केले. अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे बळजबरीने ताब्यात घेण्याची वृत्ती मुस्लीम समाजाची असती तर देशात इतकी मंदिरे अस्तित्वात असती का? अशी विचारणा रहमानी यांनी केली.

दुसऱ्या पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधीही दिली नाही

ज्या तडकाफडकीने न्यायालयाने निर्णय घेऊन पूजेला परवानगी दिली, त्यामुळे दुसऱ्या पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधीही दिली नाही. न्याय देणाऱ्या न्यायालयांवरचा विश्वास कमी झाला आहे. बाबरी मशिदीच्या निर्णयात न्यायालयाने मशिदीखाली मंदिर नसल्याचे मान्य केले होते पण एका समुदायाची श्रद्धा लक्षात घेऊन त्याच्या बाजूने निर्णय दिला होता, असा मोठा आरोप रहमानी यांनी केला. तसेच मंदिर पाडून मशीद बांधली असे ज्ञानवापी आणि अन्य काही मशिदींबाबत म्हटले जाते, ते चुकीचे आहे. इस्लाममध्ये हिसकावलेल्या जमिनीवर मशीद बांधता येत नाही. तिथे बांधलेली पहिली मशीदही विकत घेण्यात आली, असा मोठा दावा रहमानी यांनी केला.

दरम्यान, ज्ञानवापीतील व्यास तळघरात गणपती, श्रीविष्णू यांच्या एक, तर हनुमंतांच्या दोन, जोशीमठ येथील दोन प्रतिमांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तर राम नाम लिहिलेली एक वीट स्थापन करण्यात आली आहे. एक मकर आणि एक अखंड ज्योत स्थापन करण्यात आली आहे. याशिवाय दिवसातून पाच वेळा आरतीही करण्यात येणार आहे. काशी विश्वनाथ मंदिराचे मुख्य पुजारी ओम प्रकाश मिश्रा आणि अयोध्येतील रामललाच्या अभिषेकासाठी शुभ मुहूर्त ठरवणारे गणेश्वर द्रविड यांनी व्यास तळघरात पहिली पूजा केली.  

टॅग्स :Gyanvapi Mosqueज्ञानवापी मशीदHigh Courtउच्च न्यायालय