शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

म्युझियमचं नाव बदललं आता छत्रपती शिवाजी महाराज आणि आग्रा यांच्यातील कनेक्शन शोधणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 12:33 IST

छत्रपती शिवाजी महाराज आणि आग्रा यांच्यामधील नातं शोधण्यासाठी अधिकारी पुरावे गोळा करत आहेत.

ठळक मुद्देमुघलांच्या गुलामी मानसिकतेच्या प्रतिकाला उत्तर प्रदेशात स्थान नाहीआग्रा येथील म्युझियमला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव - योगी आदित्यनाथ म्युझियम बांधकामासाठी आणखी १ वर्ष विलंब होण्याचा अंदाज

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील आग्रा येथे मुघल म्युझियमला छत्रपती शिवाजी महाराज नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. त्यांच्या या निर्णयाचं अनेकांनी कौतुक केले. या म्युझियमच्या निर्माणासाठी सुरुवातीला निधीची कमतरता आणि वाढणारा खर्च यामुळे विलंब झाला. परंतु आता एक नवीन समस्या निर्माण झाल्यामुळे या बांधकामासाठी आणखी काही काळ विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि आग्रा यांच्यामधील नातं शोधण्यासाठी अधिकारी पुरावे गोळा करत आहेत. मुघलांच्या गुलामी मानसिकतेच्या प्रतिकाला उत्तर प्रदेशात स्थान नाही, असं सांगत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संग्रहालयाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज ठेवलं. यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी जानेवारी २०१६ मध्ये या बांधकामाचं भूमिपूजन केले. ताज महलच्या पूर्व गेटपासून दीड किमी अंतरावर हे म्युझियम उभं राहणार आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार या प्रकल्पासाठी १४१ कोटी रुपयांचा खर्च अंदाजित होता. २ वर्षात हे म्युझियम उभं राहणार होते. पण आतापर्यंत ७० टक्के कामकाज पूर्ण झालं आहे यासाठी ९० कोटींचा खर्च आला आहे. जीएसटी आणि कालावधी वाढल्याने बांधकामाचा खर्च जवळपास १७० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या बांधकामासाठी लागणारं साहित्य २०० किमी दूर नोएडावरुन आणवं लागत आहे. महापालिकेने हे संग्रहालय बांधण्याची जबाबदारी घेतली पण अर्थ विभागाकडून कोणताही अतिरिक्त खर्च निधी आला नाही.

संग्रहालयाचं नाव बदलल्यानंतर आग्रा पर्यटन विभागाचे अधिकारी अमित श्रीवास्तव म्हणाले की, शिवाजी महाराज आणि आग्रा यांच्यात निश्चितपणे लिंक आहे. औरंगजेबाच्या काळात आग्रा किल्ल्यात शिवाजी महाराजांना कैद केले होते. पण धाडसाने त्यांनी याठिकाणाहून सुटका मिळवण्यास यशस्वी झाले. आग्रातील भीमराव आंबेडकर विभागाच्या इतिहासकारांशी चर्चा करुन शिवाजी महाराज आणि आग्रा यांच्यातील घटनांची लिंक शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे जास्तीत जास्त या म्युझियमला जास्तीत जास्त आणखी १ वर्षचा विलंब होऊ शकतो.

तर आंबेडकर विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक बी. डी शुक्ला यांनी सांगितले की, १६६६ मध्ये आग्रा येथे शिवाजी महाराज आले होते. शिवाजी महाराजांनी त्यांचे सर्व किल्ले गमावले होते, त्यानंतर औरंगजेब यांच्या सांगण्यावरुन ते आग्रा येथे भेटीला आले. तेव्हा महाराजांना अपमानास्पद वर्तवणूक दिल्यामुळे त्यांना राग आला. दरबारातील घटनेनंतर राम सिंह कोठीमध्ये शिवाजी महाराजांना बंदी करण्यात आले. पण ही राम सिंह कोठी आग्र्यात कुठे आहे याचा एएसआय आणि इतिहासकारांना थांगपत्ता नाही. शिवाजी महाराज यशस्वीपणे आग्राहून सुटले, शिवाजी महाराज आग्र्यात कुठे कुठे गेले यासाठी संशोधन सुरु आहे असं त्यांनी सांगितले.   

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश