शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

Murshidabad Violence : "सर्व जळून खाक, काहीही शिल्लक नाही; अनेक कुटुंबांनी घर सोडून पळून जाण्याचा घेतला निर्णय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 11:04 IST

Murshidabad Violence : मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंसाचारात तीन जणांचा मृत्यू झाला. १८ पोलिसांसह अनेक जण जखमी झाले. या प्रकरणात १५० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंसाचारात तीन जणांचा मृत्यू झाला. १८ पोलिसांसह अनेक जण जखमी झाले. या प्रकरणात १५० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. सुत्ती, धुलियान, जंगीपूर आणि शमशेरगंज या भागात वक्फ कायद्याविरुद्धच्या निदर्शनांनी हिंसाचाराची सुरुवात झाली. यामध्ये अनेक दुकानं आणि घरं जाळण्यात आली.

हिंसाचाराने प्रभावित झालेल्या लोकांच्या कथा हृदयद्रावक आहेत. एका स्थानिक व्यक्तीने एएनआयला सांगितलं की, सर्व काही जळून खाक झालं आहे, काहीही शिल्लक नाही... अनेक कुटुंबांनी आपलं घर सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे परिसरात भीती आणि असुरक्षिततेचं वातावरण आहे. खुशबू दास म्हणाल्या की, आमची दुकानं आणि घरं जाळली गेली आहेत. पोलिसांनी मदत केली नाही, आम्हाला बीएसएफ कॅम्प हवा आहे.

"आम्हाला शांतता आणि सुरक्षितता हवी"

मुर्शिदाबादमधील धुलियान येथील रहिवासी प्राजक्ता दास यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आम्हाला शांतता आणि सुरक्षितता हवी आहे आणि ही परिस्थिती का उद्भवली हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने मुर्शिदाबाद, मालदा आणि बीरभूम जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद केल्या आहेत. केंद्र सरकारने सुमारे ३०० बीएसएफ जवान तैनात केले आहेत.

"घरांना आग, लोकांवर हल्ले, मंदिरांची तोडफोड..."

"आज मुर्शिदाबादचे लोक आणि मुलं म्हणत आहेत की, बीएसएफ त्यांच्यासाठी देवासारखे आहेत कारण बीएसएफने त्यांना वाचवलं आहे. पोलिसांच्या उपस्थितीतही, घरांना आग लावण्यात आली, लोकांवर हल्ले करण्यात आले, मंदिरांची तोडफोड करण्यात आली आणि पोलिसांनी काहीही केलं नाही" असं भाजपाच्या आमदार अग्निमित्रा पॉल यांनी म्हटलं आहे.

“हल्लेखोर आले, पोलिसांना फोन केला पण...”; मुर्शिदाबाद हिंसाचारातील थरकाप उडवणाऱ्या घटना

हिंसाचारात अनेकांना आपला जीव गमवावा लागला, मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आणि परिसरात अजुनही तणावाचं वातावरण आहे. ३२ वर्षीय पिंकी दासने हल्ल्यादरम्यान असलेल्या भीषण परिस्थितीबद्दल सांगितलं. "हल्लेखोर आले, हल्ला सुरू झाल्यानंतर आम्ही पोलिसांना फोन करत होतो. पण आम्हाला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. माझे पती आणि सासरे यांची हत्या केली गेली. त्यांचे मृतदेह आमच्या घराजवळ तीन तास पडले होते." 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी