शहरं
Join us  
Trending Stories
1
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

Murshidabad Violence : "सर्व जळून खाक, काहीही शिल्लक नाही; अनेक कुटुंबांनी घर सोडून पळून जाण्याचा घेतला निर्णय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 11:04 IST

Murshidabad Violence : मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंसाचारात तीन जणांचा मृत्यू झाला. १८ पोलिसांसह अनेक जण जखमी झाले. या प्रकरणात १५० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंसाचारात तीन जणांचा मृत्यू झाला. १८ पोलिसांसह अनेक जण जखमी झाले. या प्रकरणात १५० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. सुत्ती, धुलियान, जंगीपूर आणि शमशेरगंज या भागात वक्फ कायद्याविरुद्धच्या निदर्शनांनी हिंसाचाराची सुरुवात झाली. यामध्ये अनेक दुकानं आणि घरं जाळण्यात आली.

हिंसाचाराने प्रभावित झालेल्या लोकांच्या कथा हृदयद्रावक आहेत. एका स्थानिक व्यक्तीने एएनआयला सांगितलं की, सर्व काही जळून खाक झालं आहे, काहीही शिल्लक नाही... अनेक कुटुंबांनी आपलं घर सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे परिसरात भीती आणि असुरक्षिततेचं वातावरण आहे. खुशबू दास म्हणाल्या की, आमची दुकानं आणि घरं जाळली गेली आहेत. पोलिसांनी मदत केली नाही, आम्हाला बीएसएफ कॅम्प हवा आहे.

"आम्हाला शांतता आणि सुरक्षितता हवी"

मुर्शिदाबादमधील धुलियान येथील रहिवासी प्राजक्ता दास यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आम्हाला शांतता आणि सुरक्षितता हवी आहे आणि ही परिस्थिती का उद्भवली हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने मुर्शिदाबाद, मालदा आणि बीरभूम जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद केल्या आहेत. केंद्र सरकारने सुमारे ३०० बीएसएफ जवान तैनात केले आहेत.

"घरांना आग, लोकांवर हल्ले, मंदिरांची तोडफोड..."

"आज मुर्शिदाबादचे लोक आणि मुलं म्हणत आहेत की, बीएसएफ त्यांच्यासाठी देवासारखे आहेत कारण बीएसएफने त्यांना वाचवलं आहे. पोलिसांच्या उपस्थितीतही, घरांना आग लावण्यात आली, लोकांवर हल्ले करण्यात आले, मंदिरांची तोडफोड करण्यात आली आणि पोलिसांनी काहीही केलं नाही" असं भाजपाच्या आमदार अग्निमित्रा पॉल यांनी म्हटलं आहे.

“हल्लेखोर आले, पोलिसांना फोन केला पण...”; मुर्शिदाबाद हिंसाचारातील थरकाप उडवणाऱ्या घटना

हिंसाचारात अनेकांना आपला जीव गमवावा लागला, मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आणि परिसरात अजुनही तणावाचं वातावरण आहे. ३२ वर्षीय पिंकी दासने हल्ल्यादरम्यान असलेल्या भीषण परिस्थितीबद्दल सांगितलं. "हल्लेखोर आले, हल्ला सुरू झाल्यानंतर आम्ही पोलिसांना फोन करत होतो. पण आम्हाला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. माझे पती आणि सासरे यांची हत्या केली गेली. त्यांचे मृतदेह आमच्या घराजवळ तीन तास पडले होते." 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी