शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

Murshidabad Violence : "सर्व जळून खाक, काहीही शिल्लक नाही; अनेक कुटुंबांनी घर सोडून पळून जाण्याचा घेतला निर्णय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 11:04 IST

Murshidabad Violence : मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंसाचारात तीन जणांचा मृत्यू झाला. १८ पोलिसांसह अनेक जण जखमी झाले. या प्रकरणात १५० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंसाचारात तीन जणांचा मृत्यू झाला. १८ पोलिसांसह अनेक जण जखमी झाले. या प्रकरणात १५० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. सुत्ती, धुलियान, जंगीपूर आणि शमशेरगंज या भागात वक्फ कायद्याविरुद्धच्या निदर्शनांनी हिंसाचाराची सुरुवात झाली. यामध्ये अनेक दुकानं आणि घरं जाळण्यात आली.

हिंसाचाराने प्रभावित झालेल्या लोकांच्या कथा हृदयद्रावक आहेत. एका स्थानिक व्यक्तीने एएनआयला सांगितलं की, सर्व काही जळून खाक झालं आहे, काहीही शिल्लक नाही... अनेक कुटुंबांनी आपलं घर सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे परिसरात भीती आणि असुरक्षिततेचं वातावरण आहे. खुशबू दास म्हणाल्या की, आमची दुकानं आणि घरं जाळली गेली आहेत. पोलिसांनी मदत केली नाही, आम्हाला बीएसएफ कॅम्प हवा आहे.

"आम्हाला शांतता आणि सुरक्षितता हवी"

मुर्शिदाबादमधील धुलियान येथील रहिवासी प्राजक्ता दास यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आम्हाला शांतता आणि सुरक्षितता हवी आहे आणि ही परिस्थिती का उद्भवली हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने मुर्शिदाबाद, मालदा आणि बीरभूम जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद केल्या आहेत. केंद्र सरकारने सुमारे ३०० बीएसएफ जवान तैनात केले आहेत.

"घरांना आग, लोकांवर हल्ले, मंदिरांची तोडफोड..."

"आज मुर्शिदाबादचे लोक आणि मुलं म्हणत आहेत की, बीएसएफ त्यांच्यासाठी देवासारखे आहेत कारण बीएसएफने त्यांना वाचवलं आहे. पोलिसांच्या उपस्थितीतही, घरांना आग लावण्यात आली, लोकांवर हल्ले करण्यात आले, मंदिरांची तोडफोड करण्यात आली आणि पोलिसांनी काहीही केलं नाही" असं भाजपाच्या आमदार अग्निमित्रा पॉल यांनी म्हटलं आहे.

“हल्लेखोर आले, पोलिसांना फोन केला पण...”; मुर्शिदाबाद हिंसाचारातील थरकाप उडवणाऱ्या घटना

हिंसाचारात अनेकांना आपला जीव गमवावा लागला, मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आणि परिसरात अजुनही तणावाचं वातावरण आहे. ३२ वर्षीय पिंकी दासने हल्ल्यादरम्यान असलेल्या भीषण परिस्थितीबद्दल सांगितलं. "हल्लेखोर आले, हल्ला सुरू झाल्यानंतर आम्ही पोलिसांना फोन करत होतो. पण आम्हाला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. माझे पती आणि सासरे यांची हत्या केली गेली. त्यांचे मृतदेह आमच्या घराजवळ तीन तास पडले होते." 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी