शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
2
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
3
“आम्ही कुटुंब फोडणारे नाही, राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच”: हर्षवर्धन सपकाळ
4
"किती दिवस स्वप्नीलसाठी फक्त टाळ्या वाजवायच्या?"; सोनाली कुलकर्णीचं वक्तव्य चर्चेत
5
दुहेरी हत्याकांडाने छत्रपती संभाजीनगर हादरलं; दुचाकीच्या वादातून दोघांची दगडाने ठेचून हत्या
6
संतापजनक! ज्ञानाच्या मंदिरात शिक्षकानं विद्यार्थ्यांना पाजली दारू, पाहा व्हिडिओ
7
Astro Tips: 'या' उपायामुळे सोमवार २१ एप्रिलचा दिवस तुमच्या आयुष्यात संस्मरणीय ठरू शकतो!
8
हे साफ खोटं, ही FAKE NEWS आहे...; 'डिंपल गर्ल' प्रिती झिंटा असं का म्हणाली? प्रकरण काय
9
३ तास समजावल्यानंतरही, सासूचे मत बदलले नाही, होणाऱ्या जावयाकडेच राहणार; मुलीच्या लग्नाआधी झाली होती फरार
10
‘२.५ कोटी रुपये पगार असावा आणि...!’ भावी नवऱ्याकडून तरुणीच्या अपेक्षांची मोठी लिस्ट, व्हायरल पोस्ट चर्चेत
11
IPO आणण्याच्या तयारीत PhonePe, नावही बदललं; भारतात लिस्टिंगच्या तयारीला वेग
12
“...म्हणून त्यांनी माझे सरकार पाडले”; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, सांगितली Inside Story
13
सगळी भांडणं मिटवतो, पण आधी शपथ घ्या की...; 'मनसे' युतीसाठी उद्धव ठाकरेंनी बंधूंसमोर ठेवली एक अट!
14
ठाकरे बंधू एकत्र येणार?; आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं सांगत राज ठाकरेंकडून युतीसाठी टाळी!
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...
16
Tarot Card: सुरवंटाचे फुलपाखरू होण्याचा काळ, प्रयत्नात कुचराई नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
“मराठीला हिंदी नाही तर गुजरातीपासून सर्वाधिक धोका”; संजय राऊतांची मनसे, भाजपावर टीका
18
Anaya Bangar Boy to Girl Transition Story: संजय बांगरचा मुलगा का बनली मुलगी? 'ट्रान्सजेंडर' Anaya Bangar ने सगळंच सांगून टाकलं...
19
तमन्ना भाटियासारखं फिट आणि सुंदर दिसायचंय? अभिनेत्रीने सांगितलेला सीक्रेट डाएट प्लान करा फॉलो
20
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 'या' दिवशी ६ तासांसाठी बंद राहणार!

'हिंदू आहोत हा आमचा गुन्हा आहे का?', पश्चिम बंगाल हिंसाचार बाधित महिलांचा भावनिक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 16:50 IST

Hindu Women, Murshidabad Violence West Bengal: बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे अनेक हिंदू कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.

Hindu Women, Murshidabad Violence West Bengal: पश्चिम बंगालमधीलमुर्शिदाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरू आहे. या गोंधळात अनेक हिंदू कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक हिंदू कुटुंबांना आपली आयुष्याची कमाई तशीच सोडून मदतीसाठी उभारलेल्या छावण्यांमध्ये राहण्याची वेळ आली आहे. हिंसाचाराच्या तडाख्याने बेघर झालेल्या कुटुंबांना भेटायला जाणाऱ्या लोकांना तेथील महिला रडत रडत एकच सवाल करत आहेत की, हिंदू असणे हा आमचा गुन्हा आहे का? शुक्रवारी बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी मुर्शिदाबादला भेट दिली. त्यानंतर ते जाफराबादलाही गेले. या दौऱ्यात त्यांनी बाधित कुटुंबांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला.

बंगालचे राज्यपाल आल्याने कुटुंबातील महिलांना थोडेसे हायसे वाटले. मात्र राज्यपालांना पाहून काही महिलांना भावना अनावर झाल्या. त्या स्वत:ला एक प्रश्न विचारण्यापासून रोखू शकल्या नाहीत. त्या सर्व महिला एकच प्रश्न विचार होत्या, हिंदू असण्यात आमचा काय गुन्हा आहे... तसेच  'आम्हाला वाचवा' अशा विनवण्याही करत होत्या. बाधित कुटुंबातील काही महिलांनी तर थेट राज्यपालांचे पाय धरले आणि त्यांच्याकडून मदतीची याचना केली. यावेळी राज्यपालांनी पीडित महिला आणि कुटुंबांना धीर दिला आणि शांतता राखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील, असे सांगितले.

हिंसाचाराचे बळी ठरलेल्यांच्या कुटुंबीयांना भेटले राज्यपाल

राज्यपालांनी जाफराबाद येथे झालेल्या हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्या हरगोबिंद दास आणि चंदन दास यांच्या घरांना भेट दिली. राज्यपालांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला आणि हिंसाचार करणाऱ्याना शासन करण्याचे आश्वासन दिले. योगायोगाने, एक दिवस आधी या भागात शांतता बैठक झाली होती. तेथील सत्ताधारी पक्षाच्या खासदार आणि आमदारांना या भागात कायमस्वरूपी बीएसएफ कॅम्प उभारण्यास सांगण्यात आले होते. परिसरातील रहिवासी पुन्हा राज्यपालांसमोर तीच मागणी करताना दिसले.

बीएसएफ कॅम्पला जमीन देण्यास लोकांनीही तयारी दर्शवली. गरज पडल्यास आम्ही आमची घरेही बीएसएफ कॅम्पला देऊ असे त्यांनी सांगितले. याशिवाय महिला आयोगाच्या सदस्यांनीही पीडित महिलांशी संवाद साधला आणि त्याना धीर दिला. मुर्शिदाबादमध्ये हिंसाचाराच्या घटना थांबल्या असल्या तरीही लोकांच्या मनात त्याबद्दल असलेली भीती स्पष्टपणे दिसते आहे.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालmurshidabad-pcमुर्शिदाबादHinduहिंदूwaqf board amendment billवक्फ बोर्ड