कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जाफराबाद येथील हिंसाचार दरम्यान पिता व मुलाच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी १३ जणांविरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. ११ एप्रिल रोजीच्या वक्फ कायद्याविरोधातील आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यानंतर धुलियान-सुती-शमशेरगंज क्षेत्रातील हरगोबिंदो दास (७४) व त्यांचा मुलगा चंदन दास (४०) या दोघांची हत्या झाली.
वक्फ कायद्याविरोधीतील निदर्शनाचे जातीय दंगलीत रुपांतर झाल्याने शेकडो लोकांना घर सोडून पळून जावे लागले होते. ८ ते १२ एप्रिल दरम्यान हिंसचारानंतर मुर्शिदाबादच्या विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल तक्रारी संदर्भात ३०० पेक्षा अधिक संशयित गुन्हेगारांना अटक केली आहे.