शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

मुकूल रॉय यांची घर वापसी; ममता म्हणाल्या- आपल्या लोकांचं स्वागत, विश्वासघात करणाऱ्यांना स्थान नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 18:20 IST

भजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय यांनी शुक्रवारी पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रेवेश केला. मुकूल रॉय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसच्या मुख्यालयात जाऊन पक्षाचे सदस्यत्व घेतले.

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत विजय मिळवलेल्या तृणमूल काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला आहे. आज भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय (Mukul roy) यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये घर वापसी केली. मुकूल रॉय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी ममता म्हणाल्या मुकूल आपल्या घरचेच सदस्य आहेत. ते आपल्या घरी परतले आहेत. त्यांचे अभिनंदन करते. (Mukul roy joining tmc in presence of west bengal cm mamata banerjee in kolkata)

भजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय यांनी शुक्रवारी पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रेवेश केला. मुकूल रॉय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसच्या मुख्यालयात जाऊन पक्षाचे सदस्यत्व घेतले. यावेळी ममता म्हणाल्या, मुकूल आपल्याच घरातील सदस्य आहेत. ते आपल्या घरी परत आले. मी त्यांचे अभिनंदन करते. निवडणुकीदरम्यान मुकूल यांनी आपल्यासोबत विश्वासघात केली नाही. ज्या लोकांनी विश्वासघात केली, त्यांना आम्ही पक्षात घेणार नाही. याच वेळी मुकूल रॉय यांना महत्वाची भूमिका दिली जाईल, असेही ममता म्हणाल्या.

तृणमूल काँग्रेसच्या मुख्यालय आयोजित पत्रकार परिषदेत मुकुल रॉय म्हणाले, 'टीएमसीत परतल्याने मला फार बरे वाटत आहे. भाजपतून बाहेर पडल्याने आणि आपल्या लोकांना भेटून फार चांगले वात आहे. मी भाजपत काम करू शकलो नाही. यामुळे आपल्या  जुन्या घरी परत आलो. रॉय म्हणाले, मी भाजप सोडून TMC त आलो आहे, आता बंगालमध्ये जी स्थिती आहे, त्या स्थितीत भाजपत कुणीही राहणार नाही. मुकूल यांच्या मुलानेही भाजपत प्रवेश केला आहे. मुकुल रॉय हे सर्वात पहिले टीएमसी सोडणाऱ्या नेत्यांपैकी एक होते ते 2017 मध्ये भाजपत गेले होते.

पराभूत झाल्याने पश्चिम बंगाल भाजपमध्ये संघर्ष -विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने पश्चिम बंगाल भाजपमध्ये संघर्ष सुरू आहे. बंगाल भाजपच्या एक उपाध्यक्षाचे म्हणणे आहे, की हीच परिस्थिती राहिली, तर त्यांना सर्वांनाच घरी बसावे लागेल. भाजपच्या एका महिला आमदाराचे म्हणणे आहे, की पराभवानंतर स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. आमचे स्थानिक पातळीवरील कार्यकर्तेच आम्हाला सोडून जात आहेत. भाजपतील जुने लोकही सुवेंदू अधिकारी आणि तृणमूलमधून आलेल्या लोकांमुळे नाराज आहेत. पुढे काय होईल कुणास ठाऊक? अशातच मुकूल रॉय पक्ष सोडून गेल्याने पश्चिम बंगाल भाजपमध्ये सर्व काही ठीक नाही, हे स्पष्ट झाले आहे.

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपा