शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

'मुघलांनी कधीच धर्माच्या नावावर अत्याचार आणि धर्मांतर केले नाही'; काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 18:06 IST

'मुघलांनी हा भारत देश बनवला, आम्ही(काँग्रेस) अकबराला आपलाच मानतोत.'

नवी दिल्ली:काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर(Mani Shankar Aiyar) पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. मणिशंकर अय्यर यांनी मुघल आणि मुस्लिमांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 'मुघलांनी धर्माच्या नावाखाली कधीही अत्याचार केला नाही. आम्ही(काँग्रेस) अकबराला आपलाच मानतो,' असं अय्यर म्हणाले. याशिवाय, त्यांनी भाजपवर टीका करताना जिन्नाचंही कौतुक केलं.

मुघलांच्या काळात जबरदस्तीने धर्मांतर झालं नाहीमणिशंकर अय्यर यांनी जुन्या जनगणनेचा दाखला देत म्हटले की, 1872 मध्ये देशात 72 टक्के हिंदू आणि 24 टक्के मुस्लिम होते. कमी-अधिक प्रमाणात ही संख्या अजूनही तेवढीच आहे, त्यामुळे मुस्लिमांवर लोकसंख्या वाढल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. मणिशंकर अय्यर यांनी यावेळी मुघल राजवटीचंही कौतुक केलं. नेहरू जयंतीनिमित्त एका कार्यक्रमादरम्यान मणिशंकर अय्यर यांनी मुघल राजवटीत झालेल्या अत्याचाराच्या चर्चेचं खंडन केलं. मुघल सम्राट अकबरापासून ते इतर सर्व मुघल सम्राटांपर्यंत, मुघल राजवटीत कोणतेही जबरदस्तीने धर्मांतर झालं नसल्याचा दावा त्यांनी केला. 

भारताला आपला मानायचे मुघलमुघल राजवटीची स्तुती करताना अय्यर म्हणाले की, ब्रिटीश आणि मुघल यांच्यातील मोठा फरक म्हणजे मुघल या देशाला आपला मानत होते. अय्यर यांनी बाबरचे कौतुक करताना म्हटले की, बाबरने आपला मुलगा हुमायूनला एक पत्र लिहिले होते, ज्यामध्ये त्याने भारतातील लोकांच्या धर्मात हस्तक्षेप न करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळेच अकबराच्या काळात धर्माच्या नावावर कधीच भेदभाव झाला नव्हता. मुघलांनी हा देश स्वतःचा बनवला. बाबर 1526 मध्ये भारतात आला आणि तो 1530 मध्ये मरण पावला. म्हणजे तो भारतात फक्त 4 वर्षे राहिला. त्याने हुमायुनला सांगितले की, जर हा देश चालवायचा असेल, जर इथल्या रहिवाशांच्या धर्मात ढवळाढवळ करू नको, असंही अय्यर म्हणाले.

भाजपच्या मते केवळ 80 टक्के भारतीय आहेतअय्यर यांनी यावेळी भाजपवरही जोरदार हल्ला चढवला. सत्तेत असलेल्यांनाच देशातील 80 टक्के जनतेची चिंता आहे, असा आरोप त्यांनी केला. सत्तेत असलेल्यांसाठी फक्त 80% लोक खरे भारतीय आहेत, बाकीचे पाहुणे म्हणून जगत आहेत. मुस्लिमांच्या लोकसंख्येबाबत त्यांनी केलेल्या विधानाच्या समर्थनार्थ युक्तिवाद मांडताना त्यांनी वस्तुस्थितीही मांडली. जुन्या जनगणनेचा दाखला देत मणिशंकर अय्यर म्हणाले की, 1872 मध्ये ब्रिटिशांनी पहिली जनगणना केली तेव्हापासून आतापर्यंत भारतात कमी-अधिक प्रमाणात मुस्लिमांची संख्या 24 टक्के आणि हिंदू 72 टक्के असल्याचे दिसून आलं आहे.

जिन्नांची स्तुती, भाजपवर टीकाते पुढे म्हणाले की, भाजपवाले म्हणतात की, त्या काळात हिंदू मुलींवर बलात्कार झाले आणि सगळ्यांना मुस्लिम केले. पण, तुम्ही मुस्लिम झाला असता तर आज आकडेवारी वेगळी असायला हवी होती. आज देशात 72 टक्के मुस्लिम असायला हवे होते आणि 24 टक्के हिंदू असायला हवे होते. फाळणीची मागणी करण्यापूर्वी जिन्नाची एकच मागणी होती की, सेंट्रल असेंब्लीमध्ये 30 टक्के आरक्षण द्यावे. त्यांनी कधीच 80 किंवा 90 टक्के मागितले नाही. त्यांनी 30 टक्के मागितले आणि तेही नाकारले गेले, असंही ते म्हणाले.  

टॅग्स :congressकाँग्रेसMani Shankar Aiyarमणिशंकर अय्यर