शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

"खासदाराने बॉटल पाल यांना फेकून मारण्याचा प्रयत्न केला"; भाजप खासदार दुबे 'वक्फ'वरून काँग्रेसवर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 18:18 IST

Waqf amendment bill 2025: वक्फ सुधारणा विधेयकाला विरोधी पक्षांकडून विरोध केला जात आहे. लोकसभेत किती तास चर्चा करायची यावरून, विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर टीका केली. त्यानंतर खासदार दुबेंनी टीका केली.

Waqf amendment bill 2025 news: 'जेव्हा जेव्हा निवडणूक झाली, तेव्हा काँग्रेसने मुस्लीम मतपेढीचे राजकारण केले. जेव्हा विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले, तेव्हा तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने समितीच्या अध्यक्षानाच पाण्याची बॉटला मारण्याचा प्रयत्न केला होता', असा दावा भाजपचे खासदार निशिकांत दुबेंनी केला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

वक्फ सुधारणा विधेयकला काँग्रेसने विरोध केला आहे. काँग्रेसच्या भूमिकेवर टीका करताना भाजपचे खासदार निशिकांत दुबे म्हणाले, "बघा, आता इतिहास तर बदलू शकत नाही. १९११ मध्ये जिन्ना साहेबांनी मुसलमान वक्फ कायदा आणला. १९५४ पर्यंत हा जिन्ना कायदा म्हणूनच ओळखला जातो. या देशात मुस्लिमांसाठी वेगळा कायदा, हिंदूंसाठी वेगळा कायदा. यातून भारताचे विभाजन केले. पाकिस्तान बनला."

हेही वाचा >>२ सभागृह, ४८ तास कालावधी...; वक्फ विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपाचा 'बिग प्लॅन'

"जेव्हा जेव्हा निवडणूक झाली, तेव्हा काँग्रेसने मुस्लीम मतपेढीचे राजकारण आणि वेगळा पाकिस्तान बनवण्याच्या नादात वक्फमध्ये संशोधन करून मुस्लिमांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मग १९९५ असो, २०१३ मध्ये. दोन्ही वेळा निवडणूक होणार होत्या", निशिकांत दुबे म्हणाले. 

तृणमूलच्या कोणत्या खासदाराने बॉटल फेकण्याचा प्रयत्न केला?

"वक्फ सुधारणा विधेयक जेव्हा आले, तेव्हा संयुक्त संसदीय समितीच्या ६० बैठका झाल्या. वक्फ विधेयक आल्यानंतर विरोधकांनी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याची मागणी केली होती. चर्चा झाली. जगदंबिका पाल (संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष) यांना कल्याण बॅनर्जी (तृणमूल काँग्रेसचे खासदार) यांनी बॉटल फेकून मारण्याचा प्रयत्न केला. मी असं माझ्या आयुष्यात कधी बघितलं नाही", असे खासदार दुबे म्हणाले. 

"आजही संसदेच्या कामकाज सल्लागार समितीमध्ये, त्या समितीचा मी सुद्धा सदस्य आहे. आज लोकसभा अध्यक्षांनी सांगितले की, विधेयकावर आठ तास चर्चा करू. त्यानंतर सभागृहाला वाटलं की वेळ वाढवावी, तर वाढवू. वेळबद्दल अजिबात अडचण नव्हती, हे आधीच ठरवून आले होते", अशी टीका दुबे यांनी केली.

"यांना मुस्लिमांना मेसेज द्यायचा आहे. त्यामुळे त्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यांच्या बुद्धीची कीव येते. वक्फ चांगले विधेयक आहे, ते मंजुर व्हायला पाहिजे", अशी  निशिकांत दुबे म्हणाले.   

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डcongressकाँग्रेसBJPभाजपाParliamentसंसदCentral Governmentकेंद्र सरकार