शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

"खासदाराने बॉटल पाल यांना फेकून मारण्याचा प्रयत्न केला"; भाजप खासदार दुबे 'वक्फ'वरून काँग्रेसवर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 18:18 IST

Waqf amendment bill 2025: वक्फ सुधारणा विधेयकाला विरोधी पक्षांकडून विरोध केला जात आहे. लोकसभेत किती तास चर्चा करायची यावरून, विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर टीका केली. त्यानंतर खासदार दुबेंनी टीका केली.

Waqf amendment bill 2025 news: 'जेव्हा जेव्हा निवडणूक झाली, तेव्हा काँग्रेसने मुस्लीम मतपेढीचे राजकारण केले. जेव्हा विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले, तेव्हा तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने समितीच्या अध्यक्षानाच पाण्याची बॉटला मारण्याचा प्रयत्न केला होता', असा दावा भाजपचे खासदार निशिकांत दुबेंनी केला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

वक्फ सुधारणा विधेयकला काँग्रेसने विरोध केला आहे. काँग्रेसच्या भूमिकेवर टीका करताना भाजपचे खासदार निशिकांत दुबे म्हणाले, "बघा, आता इतिहास तर बदलू शकत नाही. १९११ मध्ये जिन्ना साहेबांनी मुसलमान वक्फ कायदा आणला. १९५४ पर्यंत हा जिन्ना कायदा म्हणूनच ओळखला जातो. या देशात मुस्लिमांसाठी वेगळा कायदा, हिंदूंसाठी वेगळा कायदा. यातून भारताचे विभाजन केले. पाकिस्तान बनला."

हेही वाचा >>२ सभागृह, ४८ तास कालावधी...; वक्फ विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपाचा 'बिग प्लॅन'

"जेव्हा जेव्हा निवडणूक झाली, तेव्हा काँग्रेसने मुस्लीम मतपेढीचे राजकारण आणि वेगळा पाकिस्तान बनवण्याच्या नादात वक्फमध्ये संशोधन करून मुस्लिमांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मग १९९५ असो, २०१३ मध्ये. दोन्ही वेळा निवडणूक होणार होत्या", निशिकांत दुबे म्हणाले. 

तृणमूलच्या कोणत्या खासदाराने बॉटल फेकण्याचा प्रयत्न केला?

"वक्फ सुधारणा विधेयक जेव्हा आले, तेव्हा संयुक्त संसदीय समितीच्या ६० बैठका झाल्या. वक्फ विधेयक आल्यानंतर विरोधकांनी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याची मागणी केली होती. चर्चा झाली. जगदंबिका पाल (संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष) यांना कल्याण बॅनर्जी (तृणमूल काँग्रेसचे खासदार) यांनी बॉटल फेकून मारण्याचा प्रयत्न केला. मी असं माझ्या आयुष्यात कधी बघितलं नाही", असे खासदार दुबे म्हणाले. 

"आजही संसदेच्या कामकाज सल्लागार समितीमध्ये, त्या समितीचा मी सुद्धा सदस्य आहे. आज लोकसभा अध्यक्षांनी सांगितले की, विधेयकावर आठ तास चर्चा करू. त्यानंतर सभागृहाला वाटलं की वेळ वाढवावी, तर वाढवू. वेळबद्दल अजिबात अडचण नव्हती, हे आधीच ठरवून आले होते", अशी टीका दुबे यांनी केली.

"यांना मुस्लिमांना मेसेज द्यायचा आहे. त्यामुळे त्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यांच्या बुद्धीची कीव येते. वक्फ चांगले विधेयक आहे, ते मंजुर व्हायला पाहिजे", अशी  निशिकांत दुबे म्हणाले.   

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डcongressकाँग्रेसBJPभाजपाParliamentसंसदCentral Governmentकेंद्र सरकार