शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

"विनेश फोगटला हरवण्यासाठी..."; हरयाणात 'आप'च्या जखमेवर मालीवाल यांनी चोळले मीठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 12:24 IST

Swati Maliwal : हरयाणा विधानसभा निवडणुकीत आपला अपयश मिळाल्यानंतर खासदार स्वाती मालीवाल यांनी जोरदार टीका केली आहे.

Haryana Assembly Results:हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत पाहायला मिळत आहेत. सुरुवातीच्या निकालाच्या कलापासून काँग्रेसने मोठी आघाडी घेतली होती. त्यानंतर भाजपने आघाडी घेतली. मात्र आता पुन्हा एकदा काँग्रेसने मुसंडी मारली आहे. दुसरीकडे हरयाणा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. हरयाणामध्ये आपचा सुपडा साफ होत असताना त्यांच्याच पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालवाल यांनी पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. आप इंडिया आघाडीा विश्वासाचा विश्वासघात करत असल्याचे स्वाती मालीवाल यांनी म्हटलं आहे.

हरयाणात मोठा विजय मिळवण्याच्या उद्देषाने निवडणुकीत उतरलेल्या आम आदमी पक्षाला खातेही उघडता आलेले नाही. आपने हरयाणामध्ये ८९ जागांवर निवडणूक लढवली आहे. मात्र या निवडणुकीत त्यांना दोन टक्क्यांपेक्षा कमी मतं मिळाली. आपच्या या कामगिरीवर पक्षाच्या बंडखोर राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी जखमेवर मीठ चोळण्याची संधी सोडली नाही. अरविंद केजरीवाल यांचे नाव न घेता त्यांची खिल्ली उडवली आहे. स्वाती मालीवाल यांनी आप पक्षाच्या उमेदवारांना डिपॉझिटही वाचवता आलेलं नाही असं म्हटलं आहे. 

आम आदमी पक्षाने काँग्रेसची मते पळवल्याचा आरोप स्वाती मालीवाल यांनी केला आहे. "काँग्रेसचा बदला घेण्यासाठीच ते हरयाणात आले होते. माझ्यावर भाजपचा एजंट असल्याचा खोटा आरोप केला, आज ते स्वत: इंडिया आघाडीशी गद्दारी करत आहे आणि काँग्रेसची मते पळवत आहेत. हे सगळं सोडा, विनेश फोगटलाही हरवण्यासाठी यांनी उमेदवार उभा केला. आपल्याच राज्यात या लोकांना डिपॉझिट वाचवता येत नाही, अशी परिस्थिती का निर्माण झाली आहे? अजूनही वेळ आहे, अहंकार सोडा, डोळ्यांवरील पडदा हटवा, नाटक करू नका आणि जनतेसाठी काम करा," अशी खोचक पोस्ट स्वाती मालीवाल यांनी केली आहे.

जामीनावर बाहेर आल्यानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी हरयाणात जोरदार प्रचार केला होता. अरविंद केजरीवाल हे मूळचे हरयाणाचे असून ही बाब जनतेसमोर ठेवून त्यांनी मते मागितली होती. आमच्या पाठिंब्याशिवाय हरयाणात सरकार स्थापन होणार नाही, असा दावा केजरीवाल यांनी अनेक वेळा केला. मात्र निवडणुकीचे चित्र स्पष्ट व्हायला लागल्यानंतर आपच्या उमेदवारांना हरयाणाच्या जनतेने साफ नाकारल्याचे दिसत आहे.

दरम्यान, हरयाणा निवडणुकीच्या आत्तापर्यंतच्या कलानुसार भाजपला मोठी आघाडी मिळाली आहे. भाजप४७ जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस ३६ जागांवर आघाडीवर आहे. जर भाजपकडे हीच आघाडी कायम राहिली तर राज्याच्या निवडणूक इतिहासातील ही पक्षाची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी असणार आहे. 

टॅग्स :HaryanaहरयाणाAAPआपcongressकाँग्रेस