शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
2
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
3
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
4
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
5
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
6
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
7
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
8
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
9
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
12
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
13
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
14
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
15
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
16
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
17
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
18
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
19
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
20
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य

"विनेश फोगटला हरवण्यासाठी..."; हरयाणात 'आप'च्या जखमेवर मालीवाल यांनी चोळले मीठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 12:24 IST

Swati Maliwal : हरयाणा विधानसभा निवडणुकीत आपला अपयश मिळाल्यानंतर खासदार स्वाती मालीवाल यांनी जोरदार टीका केली आहे.

Haryana Assembly Results:हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत पाहायला मिळत आहेत. सुरुवातीच्या निकालाच्या कलापासून काँग्रेसने मोठी आघाडी घेतली होती. त्यानंतर भाजपने आघाडी घेतली. मात्र आता पुन्हा एकदा काँग्रेसने मुसंडी मारली आहे. दुसरीकडे हरयाणा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. हरयाणामध्ये आपचा सुपडा साफ होत असताना त्यांच्याच पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालवाल यांनी पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. आप इंडिया आघाडीा विश्वासाचा विश्वासघात करत असल्याचे स्वाती मालीवाल यांनी म्हटलं आहे.

हरयाणात मोठा विजय मिळवण्याच्या उद्देषाने निवडणुकीत उतरलेल्या आम आदमी पक्षाला खातेही उघडता आलेले नाही. आपने हरयाणामध्ये ८९ जागांवर निवडणूक लढवली आहे. मात्र या निवडणुकीत त्यांना दोन टक्क्यांपेक्षा कमी मतं मिळाली. आपच्या या कामगिरीवर पक्षाच्या बंडखोर राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी जखमेवर मीठ चोळण्याची संधी सोडली नाही. अरविंद केजरीवाल यांचे नाव न घेता त्यांची खिल्ली उडवली आहे. स्वाती मालीवाल यांनी आप पक्षाच्या उमेदवारांना डिपॉझिटही वाचवता आलेलं नाही असं म्हटलं आहे. 

आम आदमी पक्षाने काँग्रेसची मते पळवल्याचा आरोप स्वाती मालीवाल यांनी केला आहे. "काँग्रेसचा बदला घेण्यासाठीच ते हरयाणात आले होते. माझ्यावर भाजपचा एजंट असल्याचा खोटा आरोप केला, आज ते स्वत: इंडिया आघाडीशी गद्दारी करत आहे आणि काँग्रेसची मते पळवत आहेत. हे सगळं सोडा, विनेश फोगटलाही हरवण्यासाठी यांनी उमेदवार उभा केला. आपल्याच राज्यात या लोकांना डिपॉझिट वाचवता येत नाही, अशी परिस्थिती का निर्माण झाली आहे? अजूनही वेळ आहे, अहंकार सोडा, डोळ्यांवरील पडदा हटवा, नाटक करू नका आणि जनतेसाठी काम करा," अशी खोचक पोस्ट स्वाती मालीवाल यांनी केली आहे.

जामीनावर बाहेर आल्यानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी हरयाणात जोरदार प्रचार केला होता. अरविंद केजरीवाल हे मूळचे हरयाणाचे असून ही बाब जनतेसमोर ठेवून त्यांनी मते मागितली होती. आमच्या पाठिंब्याशिवाय हरयाणात सरकार स्थापन होणार नाही, असा दावा केजरीवाल यांनी अनेक वेळा केला. मात्र निवडणुकीचे चित्र स्पष्ट व्हायला लागल्यानंतर आपच्या उमेदवारांना हरयाणाच्या जनतेने साफ नाकारल्याचे दिसत आहे.

दरम्यान, हरयाणा निवडणुकीच्या आत्तापर्यंतच्या कलानुसार भाजपला मोठी आघाडी मिळाली आहे. भाजप४७ जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस ३६ जागांवर आघाडीवर आहे. जर भाजपकडे हीच आघाडी कायम राहिली तर राज्याच्या निवडणूक इतिहासातील ही पक्षाची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी असणार आहे. 

टॅग्स :HaryanaहरयाणाAAPआपcongressकाँग्रेस