शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

राहुल गांधी मणिपूरमध्ये दाखल; पोलिसांनी अडवला ताफा, पुढे सुरक्षित नसल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 13:59 IST

राहुल गांधी यांचा ताफा बिष्णुपूर जिल्ह्यात थांबवण्यात आला आहे.

नवी दिल्ली: मणिपुरमध्ये गेल्या काही दिवसापासून हिंसाचार सुरू आहे. आतापर्यंत या हिंसाचारात १२० जणांनी जीव गमावला आहे. याचपार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज मणिपूरमध्ये दाखल झाले आहेत. राहुल गांधींचा आज आणि उद्या असा दोन दिवसीय मणिपूर दौरा आहे. यादरम्यान ते पीडित कुटुंबियांची भेट घेणार आहे. इम्फाळपासून सुमारे २० किमी अंतरावर असलेल्या विष्णुपूर जिल्ह्यात राहुल गांधींचा ताफा थांबवण्यात आला. 

पुढे सध्या अशांतता असून तिथे जाणं सुरक्षित नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. बिष्णुपूरचे एसपी म्हणाले की, राहुल गांधींसह कोणालाही पुढे जाऊ दिले जाऊ शकत नाही. त्यांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. सध्या तिकडे जाळपोळ झाली असून काल रात्रीही परिस्थिती बिकट होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते यापुढे काय निर्णय घेणार, पोलीस अधिकारी त्यांना पीडितांना भेटण्यासाठी पुढे जाऊन देणार की नाही?, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

काँग्रेस नेत्यांनी सांगितले की, राहुल गांधी जातीय संघर्षामुळे विस्थापित झालेल्या लोकांना मदत छावणीमध्ये भेटतील आणि नागरी समाज संघटनांशी संवाद साधतील. इम्फाळला पोहोचल्यानंतर ते प्रथम मदत छावणींना भेट देतील आणि नंतर काही नागरी संस्थांशी संवाद साधतील. राहुल गांधींचा चुराचंदपूर जिल्ह्याला भेट देण्याचा कार्यक्रम आहे, जिथे ते मदत छावणींना भेट देतील. त्यानंतर ते बिष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांग येथे जाऊन विस्थापित लोकांशी संवाद साधतील. जातीय संघर्षानंतर, सुमारे ५०,००० लोक राज्यभरातील ३००हून अधिक मदत छावण्यांमध्ये राहत आहेत.

दरम्यान, मणिपूरमध्ये ३ मे रोजी हिंसाचार सुरू झाल्यापासून विरोधक राज्यातील परिस्थितीवर सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. विरोधी पक्ष केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधत आहेत. या पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यापूर्वी भेटीची वेळ मागितली होती. यानंतर सर्व पक्षांनी मिळून मणिपूरवर निवेदन दिले. या सर्व परिस्थितीमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. बैठकीत गृहमंत्र्यांनी विरोधी पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले आणि मणिपूरमधील परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल असे आश्वासन दिले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीManipur Violenceमणिपूर हिंसाचारcongressकाँग्रेसPoliceपोलिस