शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

खासदार विशेषाधिकार कायद्याहून मोठा नाही; केंद्राने सर्वोच्च न्यायालयात मांडली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 06:05 IST

१९९८च्या निकालावर पुनर्विचार करण्याबाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला.

नवी दिल्ली : लाचखोरी हा कधीही संरक्षणाचा विषय असू शकत नाही आणि संसदीय विशेषाधिकार म्हणजे एखाद्या खासदाराला कायद्याच्या वर स्थान देता येत नाही, अशी भूमिका केंद्र सरकारने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात मांडली. दरम्यान, १९९८च्या निकालावर पुनर्विचार करण्याबाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला.

विधानसभेत भाषण करण्यासाठी किंवा मतदान करण्यासाठी खासदार आणि आमदारांनी लाच घेतल्याबद्दल निकालात खटल्यापासून संरक्षण देण्यात आले होते. ॲटर्नी जनरल आर. वेंकटरामानी आणि सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सात न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर केंद्राची भूमिका मांडली.

संसदेत हजारांत एखादे लाचखोरीचे प्रकरण झाले असले, तरी लाचखोरी हा कधीही संरक्षणाचा विषय होऊ शकत नाही. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्यावर कारवाई केली जाऊ शकते,  असे मेहता यांनी खंडपीठाला सांगितले.

कायद्याने स्पष्टपणे प्रतिबंधित केलेल्या कोणत्याही गोष्टीला या कलमांतर्गत (१०५ आणि १९४) संरक्षण मिळू शकत नाही. मला वाटत नाही, की कोणतेही जबाबदार सरकार किंवा सार्वजनिक प्राधिकरण अशी भूमिका घेऊ शकेल.

- आर. वेंकटरामानी, अटर्नी जनरल

अनेक निवाड्यांचा संदर्भ

ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन यांनी अनेक निवाड्यांचा संदर्भ दिला आणि सांगितले की, ‘फौजदारी खटल्यापासून कोणालाही संरक्षण मिळत नाही. सभागृहातील त्यांच्या कृत्यांबद्दल त्यांना अनेकदा लक्ष्य केले जात असल्याने त्यांना संरक्षणाची आवश्यकता असते. म्हणून, समतोल साधताना, तुम्हाला (सर्वोच्च न्यायालय) घटनेत अभिप्रेत असलेले संरक्षण आमदारांना मिळेल, याची काळजी घ्यावी लागेल.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय