शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

MP Politics: मध्य प्रदेशात राजकीय भूकंप; मुख्यमंत्री कमलनाथ यांनी घेतले सर्व मंत्र्यांचे राजीनामे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 06:55 IST

Madhya Pradesh Political Crisis: ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नाराजीमुळे काँग्रेसचे १७ आमदार बंगळुरुला आहेत. त्यामुळे कमलनाथ सरकारवर टांगती तलवार आहे.

भोपाळ - मध्य प्रदेशच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी रात्री उशीरा कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतले आहेत. आणि ते मान्यही करण्यात आले आहेत. 

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नाराजीमुळे काँग्रेसचे १७ आमदार बंगळुरुला आहेत. त्यामुळे कमलनाथ सरकारवर टांगती तलवार आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मध्यप्रदेशातील भाजपाने मंगळवारी संध्याकाळी ६ वाजता आमदारांची बैठक बोलावली आहे. कमलनाथ यांनी सांगितले की, जे लोक माफियाच्या मदतीने सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना कधी यशस्वी होऊ देणार नाही. माझी सर्व ताकद आणि विश्वास मध्य प्रदेशातील जनतेचे प्रेम आहे. त्यामुळे लोकांनी बनवलेल्या या सरकारला पाडण्याचं स्वप्न कधी पूर्ण होऊ शकणार नाही असं ते म्हणाले. 

काय आहे कमलनाथ यांची योजना?कमलनाथ हे सरकारवर आलेल्या संकटापासून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात नाराज चेहरे सामावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मंत्रिमंडळातील सहा मंत्र्यांसह काँग्रेसच्या एकूण १७ आमदारांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याने मध्य प्रदेशमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. हे मंत्री आणि आमदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गटातील असून, स्वत: शिंदेही बंडाच्या पावित्र्यात असून, त्यांनी भाजपाच्या एका बड्या नेत्याची भेट घेतल्याचे वृत्त आहे. दरम्यान, शिंदे यांची समजूत घालण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच राज्यात उदभवलेल्या परिस्थितीबाबत मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याशी चर्चा केली आहे.

मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये कमलनाथ, दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य शिंदे असे एकूण तीन गट आहेत. दरम्यान, गेल्या लोकसभा निवडणुकीत दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना आपापल्या मतदारसंघात पराभव पत्करावा लागला होता. तेव्हापासून ज्योतिरादित्य शिंदे यांची मध्य प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांवरून ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारवर टीका केली होती. तसेच सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचाही इशारा दिला होता. तेव्हा कमलनाथ यांनीही ज्यांना रस्त्यावर उतरायचे आहे त्यांनी उतरावे असे आव्हान दिले होते. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपा