शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

MP Politics: राज्यपाल परतल्यानंतर येणार घडामोडींना वेग; काँग्रेस नेत्यांचे शिंदे यांच्यावर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 06:39 IST

सप, बसपच्या नेत्यांनी घेतली शिवराजसिंह यांची भेट

नवी दिल्ली/भोपाळ : सध्या लखनौत असलेले मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन भोपाळमध्ये पोहोचल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग येईल, असे मानले जाते. आमदारांच्या राजीनाम्यासह राजकीय घटनांवर मी लक्ष ठेवून आहे. घटनेच्या दृष्टीने योग्य निर्णय मी घेईन, अशी प्रतिक्रिया टंडन यांनी काही वाहिन्यांशी बोलताना दिली.

कुटुंबीयांसोबत होळीचा आनंद लुटण्यासाठी टंडन सध्या सुट्टीवर आहेत. मी राजभवनावर पोहोचलो, की योग्य निर्णय घेईन. एवढीच प्रतिक्रिया त्यांनी दिली. बहुजन समाजवादी पक्षाचे दोन आमदार आणि समाजवादी पक्षाचा एक आमदार काँग्रेसच्या कमलनाथ सरकारमध्ये आहेत. काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा देताच बसपच्या संजीव सिंग कुशवाह आणि सपच्या राजेश शुक्ला या आमदारांनी भाजप नेते शिवराजसिंह चौहान यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. होळीनिमित्त ही सदिच्छा भेट होती, अशी माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना चौहान यांनी दिली.

कुशवाह आणि शुक्ला यांनी गेल्या आठवड्यांत फोन बंद केले होते. ते बेपत्ता झाले होते. तेव्हा त्यांच्या अपहरणाचा आरोप काँग्रेसने केला होता. ४ मार्चला भोपाळमध्ये परतल्यानंतर दोन्ही आमदारांनी भाजपने अपहरण केल्याचा आरोप फेटाळून लावला होता.ज्योतिरादित्य शिंदे भाजपसोबत जाणार असल्याचे स्पष्ट होताच काँग्रेसच्या विविध नेत्यांनी त्यांच्यावर संधिसाधूपणाचा, सत्तेसाठी हपापल्याचा आरोप करत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले, ‘राष्ट्रीय संकटा’वेळी वेळी भाजपशी हातमिळवणी केल्याने शिंदे यांनी जनतेसोबतच स्वत:च्या विचारधारेशीसुद्धा विश्वासघात केला आहे. असे लोक सत्ता नसेल तरजगू शकत नाहीत, हे त्यांनी कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे असे लोक पक्षातून जेवढ्या लवकर बाहेर पडतील तेवढे चांगले आहे.

काँग्रेसचे अन्य नेते अधीररंजन चौधरी यांनी शिंदे यांचा उल्लेख गद्दार असा केला आहे. जेव्हा पक्ष कठीण काळात असतो तेव्हा पक्षाला सोडून जाणे ही बेईमानी आहे, अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला. भाजप आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या पक्षाला जर तुम्ही बळ देणार असाल, तर पक्षाला त्या विरोधात कारवाई करावीच लागेल. पक्षाने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला हे फार बरे झाले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. शिंदे यांच्या राजीनाम्यामुळे मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार टिकणार नाही, हे चौधरी यांनी मान्य केले.सोनिया-गेहलोत चर्चामध्ये प्रदेशातील घडामोडींनंतर राजस्थानातील सत्तेला दगाफटका होऊ नये. नाराज असलेले सचिन पायलट यांच्या गटाने उचल खाऊ नये, यासाठी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी लगोलग चर्चा केली आणि तेथील राजकीय परिस्थिती समजावून घेतली.पायलट, देवरा बाकी हैज्योतिरादित्य यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीतील राजकीय वर्तुळात वेगवेगळ््या राजकीय टिप्पणीला वेग आला. मध्ये प्रदेशात सत्ता येणार या कल्पनेने खुश झालेल्या भाजपच्या नेत्यांनी ‘ये तो सिर्फ झाँकी है, सचिन पायलट, मिलिंद देवरा बाकी है’ असे संदेश पसरवण्यास सुरूवात केली. राजस्थानमझील उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी पटत नसल्याचा आणि मुंबई विभागीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा पक्षावर नाराज असल्याचा संदर्भ या विधानांना होता.

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेcongressकाँग्रेसBJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेश