शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

भाजपाचा डाव त्यांच्यावरच उलटला; काँग्रेसला मिळाली संजीवनी, शिवराज सरकारला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 08:30 IST

कमलनाथ सरकार असताना नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषदेत अध्यक्ष, महापौर निवड नगरसेवकांमधून करण्याचा अध्यादेश काढला होता.

इंदूर - मध्य प्रदेश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला जोरदार झटका लागला आहे. राज्यातील एकूण १६ महापालिकांमध्ये भाजपाचे ९, काँग्रेसचे ५, आम आदमी पक्षाचा १ आणि एक अपक्ष महापौर बनले आहेत. आतापर्यंत सर्व महापालिकांवर सत्ता असणाऱ्या भाजपाच्या हातून तब्बल ७ महापालिका निसटल्या आहेत. तर काँग्रेसनं शून्यापासून ५ महापालिकांमध्ये मजल मारली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जर कमलनाथ सरकारचा निर्णय बदलला नसता आणि त्या फॉर्म्युल्याने महापालिका निवडणुका झाल्या असत्या तर आज भाजपाचे ९ नव्हे तर १५ महापौर असते. 

राज्यात महापालिका निवडणुकीत थेट जनतेतून महापौर निवडण्याचा निर्णय भाजपावरच उलटला आहे. तर काँग्रेसला त्याचा राजकीय लाभ झाला. भाजपाच्या हातून रिवा, कटनी, मुरैना महापालिका गेली. तर छिंदवाडा, ग्वाल्हेर, सिंगरौली, जबलपूर महापौर निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला. त्यामुळे १६ पैकी ७ महापालिका भाजपानं गमावलं आहे. तर अन्य २ महापालिका काठावर मिळाल्या आहेत. मोठ्या शहरातील महापौर थेट जनतेतून निवडणं भाजपाला महागात पडलं आहे. जर निवडून आलेल्या नगरसेवकांमधून महापौर निवड झाली असती तर बहुतांश महापालिकेत भाजपाचा महापौर बसला असता. 

कमलनाथ सरकार असताना नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषदेत अध्यक्ष, महापौर निवड नगरसेवकांमधून करण्याचा अध्यादेश काढला होता. त्याला भाजपानं विरोध केला. कमलनाथ यांचा हा निर्णय लोकशाहीची हत्या करणारा आहे असा आरोप भाजपानं केला. भाजपा शिष्टमंडळानं तत्कालीन राज्यपाल लालजी टंडन यांची भेट घेत निर्णयाचा विरोध केला. भाजपाच्या विरोधामुळे निवडणुका रखडल्या होत्या. 

२०२० मध्ये राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कमलनाथ सरकारचा निर्णय बदलत थेट जनतेतून महौपार, अध्यक्ष निवड करण्याचा निर्णय घेतला. मात्र शिवराज सिंह चौहान यांच्या निर्णयाचा उलट परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. ज्यात महापालिका निवडणुकीत भाजपाला झटका बसला. भाजपा १६ पैकी ७ महापौर निवडीत पराभूत झाली ज्याठिकाणी नगरसेवकांच्या बहुमताचा आकडा भाजपाकडे आहे. जर कमलनाथ सरकारचा निर्णय बदलला नसता तर आज या शहरांमध्ये भाजपाचा महापौर बसला असता. परंतु जनतेतून निवड करण्याचा निर्णय फसला. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपा