शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा डाव त्यांच्यावरच उलटला; काँग्रेसला मिळाली संजीवनी, शिवराज सरकारला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 08:30 IST

कमलनाथ सरकार असताना नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषदेत अध्यक्ष, महापौर निवड नगरसेवकांमधून करण्याचा अध्यादेश काढला होता.

इंदूर - मध्य प्रदेश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला जोरदार झटका लागला आहे. राज्यातील एकूण १६ महापालिकांमध्ये भाजपाचे ९, काँग्रेसचे ५, आम आदमी पक्षाचा १ आणि एक अपक्ष महापौर बनले आहेत. आतापर्यंत सर्व महापालिकांवर सत्ता असणाऱ्या भाजपाच्या हातून तब्बल ७ महापालिका निसटल्या आहेत. तर काँग्रेसनं शून्यापासून ५ महापालिकांमध्ये मजल मारली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जर कमलनाथ सरकारचा निर्णय बदलला नसता आणि त्या फॉर्म्युल्याने महापालिका निवडणुका झाल्या असत्या तर आज भाजपाचे ९ नव्हे तर १५ महापौर असते. 

राज्यात महापालिका निवडणुकीत थेट जनतेतून महापौर निवडण्याचा निर्णय भाजपावरच उलटला आहे. तर काँग्रेसला त्याचा राजकीय लाभ झाला. भाजपाच्या हातून रिवा, कटनी, मुरैना महापालिका गेली. तर छिंदवाडा, ग्वाल्हेर, सिंगरौली, जबलपूर महापौर निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला. त्यामुळे १६ पैकी ७ महापालिका भाजपानं गमावलं आहे. तर अन्य २ महापालिका काठावर मिळाल्या आहेत. मोठ्या शहरातील महापौर थेट जनतेतून निवडणं भाजपाला महागात पडलं आहे. जर निवडून आलेल्या नगरसेवकांमधून महापौर निवड झाली असती तर बहुतांश महापालिकेत भाजपाचा महापौर बसला असता. 

कमलनाथ सरकार असताना नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषदेत अध्यक्ष, महापौर निवड नगरसेवकांमधून करण्याचा अध्यादेश काढला होता. त्याला भाजपानं विरोध केला. कमलनाथ यांचा हा निर्णय लोकशाहीची हत्या करणारा आहे असा आरोप भाजपानं केला. भाजपा शिष्टमंडळानं तत्कालीन राज्यपाल लालजी टंडन यांची भेट घेत निर्णयाचा विरोध केला. भाजपाच्या विरोधामुळे निवडणुका रखडल्या होत्या. 

२०२० मध्ये राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कमलनाथ सरकारचा निर्णय बदलत थेट जनतेतून महौपार, अध्यक्ष निवड करण्याचा निर्णय घेतला. मात्र शिवराज सिंह चौहान यांच्या निर्णयाचा उलट परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. ज्यात महापालिका निवडणुकीत भाजपाला झटका बसला. भाजपा १६ पैकी ७ महापौर निवडीत पराभूत झाली ज्याठिकाणी नगरसेवकांच्या बहुमताचा आकडा भाजपाकडे आहे. जर कमलनाथ सरकारचा निर्णय बदलला नसता तर आज या शहरांमध्ये भाजपाचा महापौर बसला असता. परंतु जनतेतून निवड करण्याचा निर्णय फसला. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपा