शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा डाव त्यांच्यावरच उलटला; काँग्रेसला मिळाली संजीवनी, शिवराज सरकारला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 08:30 IST

कमलनाथ सरकार असताना नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषदेत अध्यक्ष, महापौर निवड नगरसेवकांमधून करण्याचा अध्यादेश काढला होता.

इंदूर - मध्य प्रदेश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला जोरदार झटका लागला आहे. राज्यातील एकूण १६ महापालिकांमध्ये भाजपाचे ९, काँग्रेसचे ५, आम आदमी पक्षाचा १ आणि एक अपक्ष महापौर बनले आहेत. आतापर्यंत सर्व महापालिकांवर सत्ता असणाऱ्या भाजपाच्या हातून तब्बल ७ महापालिका निसटल्या आहेत. तर काँग्रेसनं शून्यापासून ५ महापालिकांमध्ये मजल मारली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जर कमलनाथ सरकारचा निर्णय बदलला नसता आणि त्या फॉर्म्युल्याने महापालिका निवडणुका झाल्या असत्या तर आज भाजपाचे ९ नव्हे तर १५ महापौर असते. 

राज्यात महापालिका निवडणुकीत थेट जनतेतून महापौर निवडण्याचा निर्णय भाजपावरच उलटला आहे. तर काँग्रेसला त्याचा राजकीय लाभ झाला. भाजपाच्या हातून रिवा, कटनी, मुरैना महापालिका गेली. तर छिंदवाडा, ग्वाल्हेर, सिंगरौली, जबलपूर महापौर निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला. त्यामुळे १६ पैकी ७ महापालिका भाजपानं गमावलं आहे. तर अन्य २ महापालिका काठावर मिळाल्या आहेत. मोठ्या शहरातील महापौर थेट जनतेतून निवडणं भाजपाला महागात पडलं आहे. जर निवडून आलेल्या नगरसेवकांमधून महापौर निवड झाली असती तर बहुतांश महापालिकेत भाजपाचा महापौर बसला असता. 

कमलनाथ सरकार असताना नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषदेत अध्यक्ष, महापौर निवड नगरसेवकांमधून करण्याचा अध्यादेश काढला होता. त्याला भाजपानं विरोध केला. कमलनाथ यांचा हा निर्णय लोकशाहीची हत्या करणारा आहे असा आरोप भाजपानं केला. भाजपा शिष्टमंडळानं तत्कालीन राज्यपाल लालजी टंडन यांची भेट घेत निर्णयाचा विरोध केला. भाजपाच्या विरोधामुळे निवडणुका रखडल्या होत्या. 

२०२० मध्ये राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कमलनाथ सरकारचा निर्णय बदलत थेट जनतेतून महौपार, अध्यक्ष निवड करण्याचा निर्णय घेतला. मात्र शिवराज सिंह चौहान यांच्या निर्णयाचा उलट परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. ज्यात महापालिका निवडणुकीत भाजपाला झटका बसला. भाजपा १६ पैकी ७ महापौर निवडीत पराभूत झाली ज्याठिकाणी नगरसेवकांच्या बहुमताचा आकडा भाजपाकडे आहे. जर कमलनाथ सरकारचा निर्णय बदलला नसता तर आज या शहरांमध्ये भाजपाचा महापौर बसला असता. परंतु जनतेतून निवड करण्याचा निर्णय फसला. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपा