शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

खासदार कंगनाचे शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान; भाजपने आक्षेप घेत सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 17:23 IST

काही दिवसापूर्वी खासदार कंगना रणौतने एका मुलाखतीदरम्यान शेतकरी आंदोलनावर टीका केली होती. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

खासदार कंगना रणौत यांनी काही दिवसापूर्वी एका मुलाखतीत शेतकऱ्यांच्या आंदोलनावर टीका केली होती. यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. या टीकेनंतर विरोधकांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आणि कंगनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. वाढता वाद पाहता पक्षाने आता अधिकृत निवेदन जारी करून कंगना रणौत यांनी केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेतला असून, कंगनाला भविष्यात असे कोणतेही वक्तव्य न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जम्मू काश्मीरसाठी भाजपाचा 'मास्टर प्लॅन'; PM नरेंद्र मोदींच्या किती सभा होणार?

एका मुलाखतीत खासदार कंगना रणौत म्हणाल्या की, जर आमचे नेतृत्व मजबूत नसते तर शेतकरी आंदोलनादरम्यान पंजाबचे बांगलादेशात रूपांतर झाले असते. कंगना राणौतच्या या वक्तव्यावर विरोधकांनी हल्लाबोल करत आहेत. काँग्रेसने कंगनावर एनएसए अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, भाजपनेही कंगनाच्या वक्तव्यावर टीका केली. तिचे हे वैयक्तिक विधान असून पक्षाचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.

कंगना रणौतच्या या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपच्या केंद्रीय माध्यम विभागाने अधिकृत निवेदन जारी केले आहे. यात म्हटले आहे की, "भाजप खासदार कंगना रणौत यांनी शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात दिलेले विधान हे पक्षाचे मत नाही. भारतीय जनता पक्ष कंगना राणौतच्या विधानावर असहमत आहे. पक्षाच्या वतीने धोरणावर बोलण्यासाठी कंगना रणौतला अशी विधाने करण्याची परवानगी नाही किंवा त्यांना भविष्यात असे कोणतेही वक्तव्य न करण्याचे निर्देश दिले आहेत.

एका मुलाखतीत भाजप खासदार कंगना रणौत म्हणाल्या होत्या की, आमचे सर्वोच्च नेतृत्व कमकुवत असते तर बांगलादेशसारखी परिस्थिती भारतात होऊ शकली असती. शेतकऱ्यांच्या आंदोलनात काय झाले ते सर्वांनी पाहिले. निदर्शनाच्या नावाखाली हिंसाचार पसरवण्यात आला. तिथे बलात्कार होत होते, लोकांना मारले जात होते, फासावर लटकवले जात होते. जेव्हा हे विधेयक मागे घेण्यात आले तेव्हा सर्वच भोंदूबाबांना धक्का बसला. कारण त्याचं नियोजन खूप लांबलचक होतं, असंही कंगना रणौत म्हणाली. 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतBJPभाजपा