शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

MP Crisis: 15 महिन्यात मध्य प्रदेशात कमळ फुलणार?; कमलनाथ सरकारची पुन्हा अग्निपरीक्षा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 07:54 IST

Madhya Pradesh Floor Test: भाजपाला वाटत असेल तर त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणावा. काँग्रेसकडे बहुमत आहे त्यामुळे बहुमत चाचणी घेण्याची गरज नाही.

ठळक मुद्देभाजपाला वाटत असेल तर त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणावाकाँग्रेसकडे बहुमत असल्याचा मुख्यमंत्री कमलनाथ यांचा दावा सुप्रीम कोर्टात आज होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष

भोपाळ – मध्य प्रदेशातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपा आणि काँग्रेस आपापले डाव खेळत आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार सोमवारी विधानसभेत बहुमत चाचणी होणार होती. मात्र विधानसभा अध्यक्षांनी 26 मार्चपर्यंत कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सभागृह पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. यानंतर भाजपाने सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला. या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

दुसरीकडे राज्यपाल लालजी टंडन यांनी तिसऱ्यांदा मध्यप्रदेश सरकार आणि विधानसभा अध्यक्ष यांना पत्र लिहून मंगळवारी बहुमत चाचणी घ्यावी असे आदेश दिलेत. त्यामुळे आजचा दिवस मुख्यमंत्री कमलनाथ आणि काँग्रेससाठी महत्त्वपूर्ण आहे. सुप्रीम कोर्टात सुनावणी आणि मध्य प्रदेशात घडणाऱ्या घडामोडी याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.

रात्री उशीरा मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सांगितले की, भाजपाला वाटत असेल तर त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणावा. काँग्रेसकडे बहुमत आहे त्यामुळे बहुमत चाचणी घेण्याची गरज नाही. बहुमत चाचणी टाळण्यासाठी काँग्रेसकडून अनेक युक्तिवाद केला जात आहे. राज्यपालांनी तीन वेळा मुख्यमंत्री कमलनाथ यांनी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिलेत मात्र त्यांच्याकडून चालढकल करण्यात येत आहे. अद्याप काँग्रेसच्या 16 आमदारांचा राजीनामा स्वीकारला नाही.

15 महिन्यांनंतर मध्य प्रदेशात कमळ फुलणार?

आमचं सरकार अल्पमतात नाही असा दावा मुख्यमंत्री कमलनाथ करत आहेत. तर दुसरीकडे बहुमत चाचणी घेण्यासाठी भाजपा आग्रही आहे. सुप्रीम कोर्टात याबाबत काय निर्णय होतो यावर कमलनाथ सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे. विधानसभेत बहुमत चाचणी घेतल्यास कमलनाथ सरकार पडण्याची दाट शक्यता दिसून येत आहे.

विधानसभा अध्यक्षांनी 22 आमदारांपैकी 6 आमदारांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर काँग्रेसचं संख्याबळ 108 झालं आहे. अद्याप 16 आमदारांचा राजीनामा स्वीकारला नाही, हे राजीनामे घेतल्यास कमलनाथ सरकारकडे 92 आमदार बाकी राहतात. भाजपा आमदारांची संख्या 107 आहे. 230 विधानसभा सदस्यांपैकी 222 सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे. बहुमतासाठी 112 आमदारांची गरज आहे. सध्या बसपा 2, सपा 1 आणि 4 अपक्षांनी कमलनाथ सरकारला पाठिंबा दिला आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेसSupreme Courtसर्वोच्च न्यायालय