शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

MP Crisis: 15 महिन्यात मध्य प्रदेशात कमळ फुलणार?; कमलनाथ सरकारची पुन्हा अग्निपरीक्षा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 07:54 IST

Madhya Pradesh Floor Test: भाजपाला वाटत असेल तर त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणावा. काँग्रेसकडे बहुमत आहे त्यामुळे बहुमत चाचणी घेण्याची गरज नाही.

ठळक मुद्देभाजपाला वाटत असेल तर त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणावाकाँग्रेसकडे बहुमत असल्याचा मुख्यमंत्री कमलनाथ यांचा दावा सुप्रीम कोर्टात आज होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष

भोपाळ – मध्य प्रदेशातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपा आणि काँग्रेस आपापले डाव खेळत आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार सोमवारी विधानसभेत बहुमत चाचणी होणार होती. मात्र विधानसभा अध्यक्षांनी 26 मार्चपर्यंत कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सभागृह पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. यानंतर भाजपाने सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला. या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

दुसरीकडे राज्यपाल लालजी टंडन यांनी तिसऱ्यांदा मध्यप्रदेश सरकार आणि विधानसभा अध्यक्ष यांना पत्र लिहून मंगळवारी बहुमत चाचणी घ्यावी असे आदेश दिलेत. त्यामुळे आजचा दिवस मुख्यमंत्री कमलनाथ आणि काँग्रेससाठी महत्त्वपूर्ण आहे. सुप्रीम कोर्टात सुनावणी आणि मध्य प्रदेशात घडणाऱ्या घडामोडी याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.

रात्री उशीरा मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सांगितले की, भाजपाला वाटत असेल तर त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणावा. काँग्रेसकडे बहुमत आहे त्यामुळे बहुमत चाचणी घेण्याची गरज नाही. बहुमत चाचणी टाळण्यासाठी काँग्रेसकडून अनेक युक्तिवाद केला जात आहे. राज्यपालांनी तीन वेळा मुख्यमंत्री कमलनाथ यांनी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिलेत मात्र त्यांच्याकडून चालढकल करण्यात येत आहे. अद्याप काँग्रेसच्या 16 आमदारांचा राजीनामा स्वीकारला नाही.

15 महिन्यांनंतर मध्य प्रदेशात कमळ फुलणार?

आमचं सरकार अल्पमतात नाही असा दावा मुख्यमंत्री कमलनाथ करत आहेत. तर दुसरीकडे बहुमत चाचणी घेण्यासाठी भाजपा आग्रही आहे. सुप्रीम कोर्टात याबाबत काय निर्णय होतो यावर कमलनाथ सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे. विधानसभेत बहुमत चाचणी घेतल्यास कमलनाथ सरकार पडण्याची दाट शक्यता दिसून येत आहे.

विधानसभा अध्यक्षांनी 22 आमदारांपैकी 6 आमदारांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर काँग्रेसचं संख्याबळ 108 झालं आहे. अद्याप 16 आमदारांचा राजीनामा स्वीकारला नाही, हे राजीनामे घेतल्यास कमलनाथ सरकारकडे 92 आमदार बाकी राहतात. भाजपा आमदारांची संख्या 107 आहे. 230 विधानसभा सदस्यांपैकी 222 सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे. बहुमतासाठी 112 आमदारांची गरज आहे. सध्या बसपा 2, सपा 1 आणि 4 अपक्षांनी कमलनाथ सरकारला पाठिंबा दिला आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेसSupreme Courtसर्वोच्च न्यायालय