शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

MP Crisis: 15 महिन्यात मध्य प्रदेशात कमळ फुलणार?; कमलनाथ सरकारची पुन्हा अग्निपरीक्षा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 07:54 IST

Madhya Pradesh Floor Test: भाजपाला वाटत असेल तर त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणावा. काँग्रेसकडे बहुमत आहे त्यामुळे बहुमत चाचणी घेण्याची गरज नाही.

ठळक मुद्देभाजपाला वाटत असेल तर त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणावाकाँग्रेसकडे बहुमत असल्याचा मुख्यमंत्री कमलनाथ यांचा दावा सुप्रीम कोर्टात आज होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष

भोपाळ – मध्य प्रदेशातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपा आणि काँग्रेस आपापले डाव खेळत आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार सोमवारी विधानसभेत बहुमत चाचणी होणार होती. मात्र विधानसभा अध्यक्षांनी 26 मार्चपर्यंत कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सभागृह पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. यानंतर भाजपाने सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला. या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

दुसरीकडे राज्यपाल लालजी टंडन यांनी तिसऱ्यांदा मध्यप्रदेश सरकार आणि विधानसभा अध्यक्ष यांना पत्र लिहून मंगळवारी बहुमत चाचणी घ्यावी असे आदेश दिलेत. त्यामुळे आजचा दिवस मुख्यमंत्री कमलनाथ आणि काँग्रेससाठी महत्त्वपूर्ण आहे. सुप्रीम कोर्टात सुनावणी आणि मध्य प्रदेशात घडणाऱ्या घडामोडी याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.

रात्री उशीरा मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सांगितले की, भाजपाला वाटत असेल तर त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणावा. काँग्रेसकडे बहुमत आहे त्यामुळे बहुमत चाचणी घेण्याची गरज नाही. बहुमत चाचणी टाळण्यासाठी काँग्रेसकडून अनेक युक्तिवाद केला जात आहे. राज्यपालांनी तीन वेळा मुख्यमंत्री कमलनाथ यांनी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिलेत मात्र त्यांच्याकडून चालढकल करण्यात येत आहे. अद्याप काँग्रेसच्या 16 आमदारांचा राजीनामा स्वीकारला नाही.

15 महिन्यांनंतर मध्य प्रदेशात कमळ फुलणार?

आमचं सरकार अल्पमतात नाही असा दावा मुख्यमंत्री कमलनाथ करत आहेत. तर दुसरीकडे बहुमत चाचणी घेण्यासाठी भाजपा आग्रही आहे. सुप्रीम कोर्टात याबाबत काय निर्णय होतो यावर कमलनाथ सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे. विधानसभेत बहुमत चाचणी घेतल्यास कमलनाथ सरकार पडण्याची दाट शक्यता दिसून येत आहे.

विधानसभा अध्यक्षांनी 22 आमदारांपैकी 6 आमदारांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर काँग्रेसचं संख्याबळ 108 झालं आहे. अद्याप 16 आमदारांचा राजीनामा स्वीकारला नाही, हे राजीनामे घेतल्यास कमलनाथ सरकारकडे 92 आमदार बाकी राहतात. भाजपा आमदारांची संख्या 107 आहे. 230 विधानसभा सदस्यांपैकी 222 सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे. बहुमतासाठी 112 आमदारांची गरज आहे. सध्या बसपा 2, सपा 1 आणि 4 अपक्षांनी कमलनाथ सरकारला पाठिंबा दिला आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेसSupreme Courtसर्वोच्च न्यायालय