शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

MP Crisis: ‘हे’ ट्विट सांभाळून ठेवा! सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसच्या या दाव्याने पुन्हा खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 08:41 IST

मध्य प्रदेश काँग्रेसने हे ट्विट केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. काँग्रेस आतापासूनच भाजपा सरकार पाडण्याच्या तयारीत लागलं आहे का?

ठळक मुद्देभाजपा नेते शिवराज चौहान यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेटभाजपा सरकार येत्या ६ महिन्यात कोसळेलकाँग्रेस नेत्यांनी केला दावा

भोपाळ – मध्य प्रदेशात मागील काही दिवसांपासून सुरु असलेला सत्तासंघर्ष अखेर शुक्रवारी संपला. काँग्रेस सरकारचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी विधानसभेत बहुमत चाचणीऐवजी राज्यपालांची भेट घेतली. कमलनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकार कोसळलं.

मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या राजीनाम्यानंतर काही तासांतच मध्य प्रदेश काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक ट्विट करण्यात आलं, हे ट्विट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलं आहे. येत्या १५ ऑगस्टला मुख्यमंत्री म्हणून कमलनाथ ध्वजारोहण करतील असा दावा या ट्विटमध्ये करण्यात आला आहे. इतकचं नाही तर सध्या काही काळ विश्रांती आहे असं सांगत हे ट्विट सांभाळून ठेवा असा सल्लाही दिला आहे.

मध्य प्रदेश काँग्रेसने हे ट्विट केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. काँग्रेस आतापासूनच भाजपा सरकार पाडण्याच्या तयारीत लागलं आहे का? कमलनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस नेते बृजेंद्रसिंह राठोड यांनी सांगितले की, येणारं सरकार फक्त ६ महिने टिकेल. तसेच काँग्रेस पुन्हा एकदा मध्यप्रदेशात सरकार बनवेल असा दावा काँग्रेस नेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे सध्या काँग्रेसने कमलनाथ यांना राजीनामा द्यायला सांगितला असला तरी काँग्रेस राजकीय डावपेच टाकत आहे का हे येणाऱ्या काळात कळेल.

दरम्यान, मध्यप्रदेशचे भाजपा नेते शिवराज चौहान यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री कमलनाथ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. शिवराज चौहान यांच्या नेतृत्वात भाजपाने काँग्रेस सरकार पाडलं त्याचसोबत ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपात सामील करुन घेतलं. त्यामुळे शिवराज-कमलनाथ यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली यावरुन राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.   

राजीनामा दिल्यानंतर कमलनाथ यांनी भाजपावर निशाणा साधला होता. कमलनाथ यांनी सांगितले होते की, भाजपाने २२ आमदारांना अपहरण केले होते, हे देशच बोलत आहे. करोडो रुपये खर्च करून हा खेळ खेळला गेला. एक महाराज आणि त्यांच्या २२ सहकाऱ्यांनी मिळून कट रचला. काही काळानंतर यातील सत्य बाहेर येईल असा आरोप त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव न घेता केला. तसेच आम्ही एकदा नाही तर तीनवेळा विधानसभेत बहुमत दाखविले होते. भाजपाने जनतेचा विश्वासघात केलाच आहे पण लोकशाहीच्या मुल्यांची हत्याही केली आहे. त्यांना जनता कधी माफ करणार नाही. भाजपा पहिल्या दिवसापासून सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोप त्यांनी भाजपावर केला.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेश