शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

MP Crisis: ‘हे’ ट्विट सांभाळून ठेवा! सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसच्या या दाव्याने पुन्हा खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 08:41 IST

मध्य प्रदेश काँग्रेसने हे ट्विट केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. काँग्रेस आतापासूनच भाजपा सरकार पाडण्याच्या तयारीत लागलं आहे का?

ठळक मुद्देभाजपा नेते शिवराज चौहान यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेटभाजपा सरकार येत्या ६ महिन्यात कोसळेलकाँग्रेस नेत्यांनी केला दावा

भोपाळ – मध्य प्रदेशात मागील काही दिवसांपासून सुरु असलेला सत्तासंघर्ष अखेर शुक्रवारी संपला. काँग्रेस सरकारचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी विधानसभेत बहुमत चाचणीऐवजी राज्यपालांची भेट घेतली. कमलनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकार कोसळलं.

मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या राजीनाम्यानंतर काही तासांतच मध्य प्रदेश काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक ट्विट करण्यात आलं, हे ट्विट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलं आहे. येत्या १५ ऑगस्टला मुख्यमंत्री म्हणून कमलनाथ ध्वजारोहण करतील असा दावा या ट्विटमध्ये करण्यात आला आहे. इतकचं नाही तर सध्या काही काळ विश्रांती आहे असं सांगत हे ट्विट सांभाळून ठेवा असा सल्लाही दिला आहे.

मध्य प्रदेश काँग्रेसने हे ट्विट केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. काँग्रेस आतापासूनच भाजपा सरकार पाडण्याच्या तयारीत लागलं आहे का? कमलनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस नेते बृजेंद्रसिंह राठोड यांनी सांगितले की, येणारं सरकार फक्त ६ महिने टिकेल. तसेच काँग्रेस पुन्हा एकदा मध्यप्रदेशात सरकार बनवेल असा दावा काँग्रेस नेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे सध्या काँग्रेसने कमलनाथ यांना राजीनामा द्यायला सांगितला असला तरी काँग्रेस राजकीय डावपेच टाकत आहे का हे येणाऱ्या काळात कळेल.

दरम्यान, मध्यप्रदेशचे भाजपा नेते शिवराज चौहान यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री कमलनाथ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. शिवराज चौहान यांच्या नेतृत्वात भाजपाने काँग्रेस सरकार पाडलं त्याचसोबत ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपात सामील करुन घेतलं. त्यामुळे शिवराज-कमलनाथ यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली यावरुन राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.   

राजीनामा दिल्यानंतर कमलनाथ यांनी भाजपावर निशाणा साधला होता. कमलनाथ यांनी सांगितले होते की, भाजपाने २२ आमदारांना अपहरण केले होते, हे देशच बोलत आहे. करोडो रुपये खर्च करून हा खेळ खेळला गेला. एक महाराज आणि त्यांच्या २२ सहकाऱ्यांनी मिळून कट रचला. काही काळानंतर यातील सत्य बाहेर येईल असा आरोप त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव न घेता केला. तसेच आम्ही एकदा नाही तर तीनवेळा विधानसभेत बहुमत दाखविले होते. भाजपाने जनतेचा विश्वासघात केलाच आहे पण लोकशाहीच्या मुल्यांची हत्याही केली आहे. त्यांना जनता कधी माफ करणार नाही. भाजपा पहिल्या दिवसापासून सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोप त्यांनी भाजपावर केला.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेश