शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
3
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
4
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
5
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
6
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
7
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
8
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
9
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
10
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
11
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
12
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
13
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
14
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
15
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
16
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
17
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
18
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
19
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
20
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या

MP Crisis: ‘हे’ ट्विट सांभाळून ठेवा! सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसच्या या दाव्याने पुन्हा खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 08:41 IST

मध्य प्रदेश काँग्रेसने हे ट्विट केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. काँग्रेस आतापासूनच भाजपा सरकार पाडण्याच्या तयारीत लागलं आहे का?

ठळक मुद्देभाजपा नेते शिवराज चौहान यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेटभाजपा सरकार येत्या ६ महिन्यात कोसळेलकाँग्रेस नेत्यांनी केला दावा

भोपाळ – मध्य प्रदेशात मागील काही दिवसांपासून सुरु असलेला सत्तासंघर्ष अखेर शुक्रवारी संपला. काँग्रेस सरकारचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी विधानसभेत बहुमत चाचणीऐवजी राज्यपालांची भेट घेतली. कमलनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकार कोसळलं.

मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या राजीनाम्यानंतर काही तासांतच मध्य प्रदेश काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक ट्विट करण्यात आलं, हे ट्विट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलं आहे. येत्या १५ ऑगस्टला मुख्यमंत्री म्हणून कमलनाथ ध्वजारोहण करतील असा दावा या ट्विटमध्ये करण्यात आला आहे. इतकचं नाही तर सध्या काही काळ विश्रांती आहे असं सांगत हे ट्विट सांभाळून ठेवा असा सल्लाही दिला आहे.

मध्य प्रदेश काँग्रेसने हे ट्विट केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. काँग्रेस आतापासूनच भाजपा सरकार पाडण्याच्या तयारीत लागलं आहे का? कमलनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस नेते बृजेंद्रसिंह राठोड यांनी सांगितले की, येणारं सरकार फक्त ६ महिने टिकेल. तसेच काँग्रेस पुन्हा एकदा मध्यप्रदेशात सरकार बनवेल असा दावा काँग्रेस नेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे सध्या काँग्रेसने कमलनाथ यांना राजीनामा द्यायला सांगितला असला तरी काँग्रेस राजकीय डावपेच टाकत आहे का हे येणाऱ्या काळात कळेल.

दरम्यान, मध्यप्रदेशचे भाजपा नेते शिवराज चौहान यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री कमलनाथ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. शिवराज चौहान यांच्या नेतृत्वात भाजपाने काँग्रेस सरकार पाडलं त्याचसोबत ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपात सामील करुन घेतलं. त्यामुळे शिवराज-कमलनाथ यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली यावरुन राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.   

राजीनामा दिल्यानंतर कमलनाथ यांनी भाजपावर निशाणा साधला होता. कमलनाथ यांनी सांगितले होते की, भाजपाने २२ आमदारांना अपहरण केले होते, हे देशच बोलत आहे. करोडो रुपये खर्च करून हा खेळ खेळला गेला. एक महाराज आणि त्यांच्या २२ सहकाऱ्यांनी मिळून कट रचला. काही काळानंतर यातील सत्य बाहेर येईल असा आरोप त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव न घेता केला. तसेच आम्ही एकदा नाही तर तीनवेळा विधानसभेत बहुमत दाखविले होते. भाजपाने जनतेचा विश्वासघात केलाच आहे पण लोकशाहीच्या मुल्यांची हत्याही केली आहे. त्यांना जनता कधी माफ करणार नाही. भाजपा पहिल्या दिवसापासून सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोप त्यांनी भाजपावर केला.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेश