शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

MP Crisis: ‘हे’ ट्विट सांभाळून ठेवा! सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसच्या या दाव्याने पुन्हा खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 08:41 IST

मध्य प्रदेश काँग्रेसने हे ट्विट केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. काँग्रेस आतापासूनच भाजपा सरकार पाडण्याच्या तयारीत लागलं आहे का?

ठळक मुद्देभाजपा नेते शिवराज चौहान यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेटभाजपा सरकार येत्या ६ महिन्यात कोसळेलकाँग्रेस नेत्यांनी केला दावा

भोपाळ – मध्य प्रदेशात मागील काही दिवसांपासून सुरु असलेला सत्तासंघर्ष अखेर शुक्रवारी संपला. काँग्रेस सरकारचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी विधानसभेत बहुमत चाचणीऐवजी राज्यपालांची भेट घेतली. कमलनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकार कोसळलं.

मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या राजीनाम्यानंतर काही तासांतच मध्य प्रदेश काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक ट्विट करण्यात आलं, हे ट्विट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलं आहे. येत्या १५ ऑगस्टला मुख्यमंत्री म्हणून कमलनाथ ध्वजारोहण करतील असा दावा या ट्विटमध्ये करण्यात आला आहे. इतकचं नाही तर सध्या काही काळ विश्रांती आहे असं सांगत हे ट्विट सांभाळून ठेवा असा सल्लाही दिला आहे.

मध्य प्रदेश काँग्रेसने हे ट्विट केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. काँग्रेस आतापासूनच भाजपा सरकार पाडण्याच्या तयारीत लागलं आहे का? कमलनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस नेते बृजेंद्रसिंह राठोड यांनी सांगितले की, येणारं सरकार फक्त ६ महिने टिकेल. तसेच काँग्रेस पुन्हा एकदा मध्यप्रदेशात सरकार बनवेल असा दावा काँग्रेस नेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे सध्या काँग्रेसने कमलनाथ यांना राजीनामा द्यायला सांगितला असला तरी काँग्रेस राजकीय डावपेच टाकत आहे का हे येणाऱ्या काळात कळेल.

दरम्यान, मध्यप्रदेशचे भाजपा नेते शिवराज चौहान यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री कमलनाथ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. शिवराज चौहान यांच्या नेतृत्वात भाजपाने काँग्रेस सरकार पाडलं त्याचसोबत ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपात सामील करुन घेतलं. त्यामुळे शिवराज-कमलनाथ यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली यावरुन राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.   

राजीनामा दिल्यानंतर कमलनाथ यांनी भाजपावर निशाणा साधला होता. कमलनाथ यांनी सांगितले होते की, भाजपाने २२ आमदारांना अपहरण केले होते, हे देशच बोलत आहे. करोडो रुपये खर्च करून हा खेळ खेळला गेला. एक महाराज आणि त्यांच्या २२ सहकाऱ्यांनी मिळून कट रचला. काही काळानंतर यातील सत्य बाहेर येईल असा आरोप त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव न घेता केला. तसेच आम्ही एकदा नाही तर तीनवेळा विधानसभेत बहुमत दाखविले होते. भाजपाने जनतेचा विश्वासघात केलाच आहे पण लोकशाहीच्या मुल्यांची हत्याही केली आहे. त्यांना जनता कधी माफ करणार नाही. भाजपा पहिल्या दिवसापासून सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोप त्यांनी भाजपावर केला.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेश