शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

ग्वाल्हेरनंतर भाजपाने आणखी तीन नगरपालिका गमावल्या; मध्य प्रदेशमध्ये आले नाकीनऊ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 15:45 IST

MP Civic Poll Election Result: ग्वाल्हेरनंतर भाजपासाठी मुरैनाची नगरपालिका महत्वाची होती. वर्षभरात मध्य प्रदेशमध्ये निवडणुका आहेत. यामुळे भाजपाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

मध्य प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यातील ११ पैकी चार महापालिका गमावणाऱ्या भाजपाला दुसऱ्या टप्प्यातदेखील मोठा धक्का बसला आहे. भाजपाने आणखी तीन नगर पालिका हातच्या गमावल्या आहेत. ओबीसी आरक्षणानंतर या निवडणुका झाल्या आहेत. 

दुसऱ्या टप्प्यात मुरैना, रीवा आणि कटनी या तीन नगरपालिका भाजपाने गमावल्या आहेत. या दोन ठिकाणी काँग्रेस तर एका ठिकाणी अपक्षांची सत्ता आली आहे. ग्वाल्हेरनंतर भाजपासाठी मुरैनाची नगरपालिका महत्वाची होती. कारण केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या मतदार संघातील ही महत्वाची पालिका होती. ग्वाल्हेर ही ज्योतिरादित्य शिंदेंची महापालिका होती. मुरैनामध्ये ४७ वार्डांपैकी १९ वर काँग्रेस, १५ वर भाजपा आणि आठ वर बसपा जिंकली आहे. तीन अपक्ष तर एका जागेवर आपचा उमेदवार जिंकला आहे. 

मध्य प्रदेशमध्ये महापौरांची निवडणूक ही थेट केली जाते. जनता थेट महापौर निवडते.  राज्यात १६ पालिकांच्या निवडणुका झाल्या. यामध्ये सात नगरपालिका भाजपाने गमावल्या आहेत. या सर्व पालिकांवर भाजपाची अनेक वर्षे सत्ता होती. ग्लाल्हेर, जबलपूर, छिंदवाडा, रीवा, मुरैना, कटनी आणि सिंगरौली या पालिका भाजपाने गमावल्या आहेत. पाच पालिका या काँग्रेसने जिंकल्या आहेत. मध्य प्रदेशमध्ये वर्षभरानंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. यामुळे भाजपाला चिंतेत टाकणारी तर काँग्रेसला बळ देणारी ही निवडणूक ठरली आहे. भाजपाच्या ताब्यात इंदौर, भोपाळ, बुरहानपुर, उज्जैन, सतना, खंडवा आणि सागर या महापालिका गेल्या आहेत. ग्वाल्हेरमध्ये ५७ वर्षांनी भाजपाची सत्ता गेली आहे. जबलपूरमध्ये २३ वर्षांनी भाजपाचा महापौर नसणार आहे. 

ग्वाल्हेर का बोचणारे...ग्वाल्हेरमधून दोन केंद्रीय मंत्री, राज्य सरकारचे पाच मंत्री येतात. एवढी सत्ता एकवटलेली असतानाही ग्वाल्हेर गमावल्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे. शहरी मतदारांवर भाजपाचा मोठा पगडा आहे, असे असले तरी देखील काँग्रेसचा उमेदवार जिंकल्याने आश्चर्य व्य़क्त केले जात आहे. ग्वाल्हेरच्या विजयाचे श्रेय सतीश सिकरवार यांना दिले जात आहे. त्यांची पत्नी शोभा शर्मा यांनी भाजपाच्या सुमन शर्मा यांचा पराभव केला. शर्मा या नरेंद्र सिंह तोमर यांच्या समर्थक होत्या. तर ज्योतिरादित्यांना माया सिंह यांना निवडणुकीत उतरवायचे होते. परंतू, तोमर यांनी राजकारण करून शिंदेंचा पत्ता कट केला आणि पक्षाला सुमन शर्मा यांना उतरविण्यास भाग पाडले. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेस