शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

विधानसभेचं कामकाज न झाल्यास भत्ताही नाही; सरकारच्या नव्या प्रस्तावाला भाजपाचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 15:50 IST

सरकार दबावाचं राजकारण करत असल्याचा भाजपाचा आरोप

विधिमंडळात होणारा गदारोळ आणि त्यामुळे सदनाचा वाया जाणारा वेळ हे काही नवं नाही. आमदारांनी गोंधळ घातल्यामुळे अनेकदा विधिमंडळाचं कामकाज होत नाही आणि जनतेचे प्रश्न तसेच राहतात. याला चाप लावण्यासाठी कामकाज नाही, तर भत्ता नाही, असा नवा नियम लागू करण्याचा प्रयत्न मध्य प्रदेश सरकारकडून सुरू आहे. हा नवा नियम लागू झाल्यास विधानसभेच्या कामकाजात अडथळा आणणाऱ्या आमदाराला भत्ता मिळणार नाही. काँग्रेस सरकार नवा नियम लागू करण्याच्या प्रयत्नात असताना भाजपानं याला जोरदार विरोध केला आहे. सरकारकडून दबावाचं राजकारण होत असल्याचा भाजपाचा आरोप आहे. मध्य प्रदेशात अधिवेशनादरम्यान प्रत्येक आमदाराला प्रति दिन दीड हजार रुपये इतका भत्ता मिळतो. सध्या काँग्रेस सरकारकडून 'कामकाज नाही, तर भत्ता नाही' हा नियम लागू करण्याचा प्रयत्न होत असताना त्याला भाजपाचा विरोध आहे. मात्र भाजपा सत्तेत असताना त्यांच्याकडूनदेखील हाच नियम लागू करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी त्यांना अपयश आलं होतं. मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या मंत्रिमंडळात कायदा मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पी. सी. शर्मा यांनी याबद्दलची माहिती विधानसभा अध्यक्षांना पाठवली आहे. त्यामुळे आता पुढचा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष घेतील, असं शर्मांनी सांगितलं. विधानसभेत आमदारांकडून घातला जाणारा गोंधळ थांबवणं अतिशय महत्त्वाचं आहे. विधानसभेच्या अध्यक्षांना याबद्दलची कल्पना आहे. त्यामुळे ते लवकरच नव्या नियमाची अंमलबजावणी करतील, असं शर्मा यांनी म्हटलं. मध्य प्रदेशात जवळपास १५ वर्षे भाजपाची सत्ता होती. मात्र गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तांतर झालं. सध्या विधानसभेत काँग्रेसचे ११५ आमदार आहेत. काँग्रेस सरकारला ४ अपक्ष आमदारांसह बसपाच्या २ आणि सपाच्या एका आमदाराचा पाठिंबा आहे. विरोधी बाकांवर असलेल्या भाजपाचे १०८ आमदार आहेत. त्यामुळे सदनात अनेकदा काँग्रेस विरुद्ध भाजपा हा सामना पाहायला मिळाला आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपा