शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

खासदार अमोल कोल्हेंनी शब्द पाळला, बैलगाडा शर्यतींचा प्रश्न संसदेत मांडला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 20:29 IST

सन्माननीय राष्ट्रपती महोदयांनी आपल्या अभिभाषणात पशुधन, पशुधनाचे आरोग्य आणि पशुधनाच्या विकासाबाबत माहिती देण्यात आली.

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी मतदारसंघातील लोकांना दिलेल्या आश्वासनानुसार पहिल्यात भाषणात बैलगाडा शर्यतीचा मुद्दा उपस्थित केला. बैलगाडा शर्यतींसाठी ज्या बैलांचा वापर केला जातो, ते खिलार जातीचे देशी वंशाची बैलं आहेत. खिलारी जातीच्या देशी गायींमध्ये दुधाचे प्रमाण कमी असते. तरीही, महाराष्ट्रातील शेतकरी या गायींचे पालन पोषण करतो. कारण, या गायींकडून खिलारी जातीच्या बैलांना जन्म दिला जातो. मात्र, सरकारने लादलेल्या बंदीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झाल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, सरकारने ही बंदी उठवावी, अशी शेतकऱ्यांची इच्छा असल्याचेही कोल्हेंनी संसदेत बोलताना म्हटले. 

सन्माननीय राष्ट्रपती महोदयांनी आपल्या अभिभाषणात पशुधन, पशुधनाचे आरोग्य आणि पशुधनाच्या विकासाबाबत माहिती देण्यात आली. देशात बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्यात आली आहे. पण, बैलगाडा शर्यत ही केवळ मनोरंजन नसून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचं मोठं माध्यम आहे. आईसकांडी विकणाऱ्यापासून ते भेळ विकणाऱ्यांपर्यंत सर्वचजण यामध्ये सहभागी होता. केवळ बैलगाडा मालकच नाहीत, तर ट्रान्सपोर्टपासून ते सर्वसामन्यही मोठ्या प्रमाणात या बैलगाडा शर्यतींमध्ये सहभागी होता. त्यामुळे, हा ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळकटी आणणारा खेळाचा प्रकार असल्याचं अमोल कोल्हे यांनी संसदेतील आपल्या प्रश्नोत्तरावेळी सांगितले. 

केंद्र सरकारने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातल्यामुळे नाराज झालेल्या शेतकऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शर्यत पूर्ववत होण्यासाठी पाठपुरावा केला. त्यासाठी जिल्हा, राज्य आणि अगदी देश पातळीवर संघटना स्थापन केली. राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर या प्रश्नाला गती मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी याबाबतचे विधेयक विधानसभेत मांडले होते. संसदेत विधेयक मांडणीची प्रक्रिया किचकट असल्यामुळे प्रक्रियेला कायदेशीर रूप देण्यासाठी केंद्र सरकारने वेग दिला आणि विधेयक मंजूर करण्यात आले. परंतु, काही नियम घालून देण्यात आले आहेत. या शर्यतींसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. आज खासदार अमोल कोल्हेंनी संसंदेत बैलगाडी शर्यतींवर असलेली बंदी उठविण्याची मागणी केली. दरम्यान, लोकसभा निवडणुकांवेळी लोकांना दिलेल्या आश्वासनांतील पहिला मुद्दा आज कोल्हे यांनी संसदेत मांडला. 

 

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेshirur-pcशिरूरBull Cart Raceबैलगाडी शर्यतParliamentसंसद