शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

राज्यातील बोर्ड, महामंडळाच्या नियुक्त्यांसाठी हालचाली सुरू; आघाडीतील कटुताही कमी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 05:53 IST

मुख्यमंत्र्यांना यादी होणार सादर

-व्यंकटेश केसरीनवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ताधारी तीन पक्षांत कटुता निर्माण झाली असताना आता राज्य सरकारमधील ५० पेक्षा जास्त बोर्ड आणि महामंडळाच्या नियुक्त्यांसाठी या पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी बैठकांचे सत्रही सुरू आहे.  या तीनही पक्षांचे मंत्री असलेल्या सहा सदस्यीय समन्वय समितीने या बोर्डावरील आणि मंडळावरील संचालक आणि अध्यक्ष यांच्या नावाला अंतिम स्वरूप देण्यासाठी रविवारी एक बैठक घेतली.

या समन्वय समितीत ज्येष्ठ मंत्री सुभाष देसाई, एकनाथ शिंदे (शिवसेना), अजित पवार, जयंत पाटील (राष्ट्रवादी), अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात (काँग्रेस) यांचा समावेश असून, आतापर्यंत त्यांनी २५ वेळा बैठक घेतली आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोणत्याही क्षणी ही समिती नावांची यादी सोपवू शकते. यामुळे राज्यातील राजकीय अस्थिरता कमी होऊ शकते. 

नव्या नियुक्त्यांमुळे आघाडी होईल मजबूत

सुभाष देसाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, या नियुक्त्यांसाठी चर्चा, विचारविनिमय पूर्ण झाला आहे. यादीला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे. त्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना उमेदवारांची यादी सादर करणार आहोत. या तीनही पक्षांचा एकमेकांविरुद्ध निवडणूक लढविल्याचा इतिहास आहे. आपले कोणतेही चुकीचे पाऊल राजकीय भवितव्यावर परिणाम करू शकते याची जाणीव ठेवून हे पक्ष काम करीत आहेत.

भाजप सभागृहात आणि बाहेरही आक्रमक आहे. मात्र, अद्याप ही आघाडी तोडण्यात यशस्वी झालेला नाही. बोर्ड आणि महामंडळाच्या ५० हून अधिक नियुक्त्यांमुळे ही आघाडी मजबूत होऊ शकते. ज्या नेत्यांना खासदार, आमदार म्हणून संधी मिळालेली नाही, त्यांना या माध्यमातून लोकांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. 

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे