शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

यूपीए सरकारच्याच काळात सर्वाधिक प्रगती- पी. चिदंबरम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:09 IST

स्वातंत्र्यानंतर देशाची सर्वात जास्त प्रगती काँग्रेसप्रणित केंद्रातील यूपीए-१, यूपीए-२ या सरकारांच्या दशकभराच्या कालावधीत झाली आहे, असा दावा माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला.

नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर देशाची सर्वात जास्त प्रगती काँग्रेसप्रणित केंद्रातील यूपीए-१, यूपीए-२ या सरकारांच्या दशकभराच्या कालावधीत झाली आहे, असा दावा माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला. सध्या देशात वास्तवातील, कायद्याने नेमलेला व एक अदृश्य असे तीन अर्थमंत्री देशाची अर्थव्यवस्था हाताळत असतात, असा टोलाही त्यांनी लगावला.यूपीए-१च्या काळात देशाचा सरासरी विकासदर ८.८७ टक्के होता. २००७-०८या कालावधीत तो दोन अंकी म्हणजे १०.०८ टक्के झाला होता. यूपीए-२च्या काळात देशाचा सरासरी विकासदर ७.३९ टक्के होता. यूपीए १ व २ सरकारांच्या काळात देशातील १४ कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणण्यात यश आले असेही चिदंबरम म्हणाले. केंद्राच्या सांख्यिकी विभागाने देशातील राष्ट्रीय ठोकळ उत्पन्नाबाबत जी आकडेवारी प्रसिद्ध केली आहे त्याचा आधार त्यांनी आपल्या वक्तव्यासाठी घेतला. हा अहवाल केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी खात्याने शुक्रवारी वेबसाइटवर झळकवला होता.भाजपाचा टोलाभाजप प्रवक्ते समबित पात्रा यांनी म्हटले की, ही आकडेवारी अधिकृत नसून तिचा सरकारने अद्याप स्वीकार केलेला नाही. ज्यावेळेला काँग्रेसला यश मिळत नाही ते अपयश साजरे करताना दिसतात. यूपीए सरकारच्या काळात महागाई वाढली होती. आर्थिक तूट कमी करण्यात त्यांना अपयश आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत जगातील पहिल्या सहा मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश झाला.

टॅग्स :congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाGovernmentसरकार