शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
4
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
5
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
6
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
7
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
8
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
9
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
10
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
11
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
12
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
13
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
14
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
15
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
16
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
17
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
18
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
19
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
20
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी

यूपीए सरकारच्याच काळात सर्वाधिक प्रगती- पी. चिदंबरम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:09 IST

स्वातंत्र्यानंतर देशाची सर्वात जास्त प्रगती काँग्रेसप्रणित केंद्रातील यूपीए-१, यूपीए-२ या सरकारांच्या दशकभराच्या कालावधीत झाली आहे, असा दावा माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला.

नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर देशाची सर्वात जास्त प्रगती काँग्रेसप्रणित केंद्रातील यूपीए-१, यूपीए-२ या सरकारांच्या दशकभराच्या कालावधीत झाली आहे, असा दावा माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला. सध्या देशात वास्तवातील, कायद्याने नेमलेला व एक अदृश्य असे तीन अर्थमंत्री देशाची अर्थव्यवस्था हाताळत असतात, असा टोलाही त्यांनी लगावला.यूपीए-१च्या काळात देशाचा सरासरी विकासदर ८.८७ टक्के होता. २००७-०८या कालावधीत तो दोन अंकी म्हणजे १०.०८ टक्के झाला होता. यूपीए-२च्या काळात देशाचा सरासरी विकासदर ७.३९ टक्के होता. यूपीए १ व २ सरकारांच्या काळात देशातील १४ कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणण्यात यश आले असेही चिदंबरम म्हणाले. केंद्राच्या सांख्यिकी विभागाने देशातील राष्ट्रीय ठोकळ उत्पन्नाबाबत जी आकडेवारी प्रसिद्ध केली आहे त्याचा आधार त्यांनी आपल्या वक्तव्यासाठी घेतला. हा अहवाल केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी खात्याने शुक्रवारी वेबसाइटवर झळकवला होता.भाजपाचा टोलाभाजप प्रवक्ते समबित पात्रा यांनी म्हटले की, ही आकडेवारी अधिकृत नसून तिचा सरकारने अद्याप स्वीकार केलेला नाही. ज्यावेळेला काँग्रेसला यश मिळत नाही ते अपयश साजरे करताना दिसतात. यूपीए सरकारच्या काळात महागाई वाढली होती. आर्थिक तूट कमी करण्यात त्यांना अपयश आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत जगातील पहिल्या सहा मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश झाला.

टॅग्स :congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाGovernmentसरकार