शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: April 25, 2015 01:38 IST

महाराष्ट्रात केवळ तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा दोनच दिवसांपूर्वी कृषिमंत्री राधामोहनसिंग यांनी लोकसभेत केला असताना सरकारने

नवी दिल्ली : महाराष्ट्रात केवळ तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा दोनच दिवसांपूर्वी कृषिमंत्री राधामोहनसिंग यांनी लोकसभेत केला असताना सरकारने शुक्रवारी या राज्यात जानेवारी ते मार्च २०१५ या काळात तब्बल २५७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती देत आकडेवारीचा घोळात घोळ संपला नसल्याचे व कालावधीबाबत संभ्रम कायम असल्याचेच दाखवून दिले. दरम्यान, मराठवाड्यात तीन महिन्यात सर्वाधिक ११४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, अशी माहिती सरकारने दिली. अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसलेल्या महाराष्ट्रात उपरोक्त तीन महिन्यांच्या कालावधीत २५७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती राज्याकडून मिळाल्याचे कृषी राज्यमंत्री मोहनभाई कुंदारिया यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले.