शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
5
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
6
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
7
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
8
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
9
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
10
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
11
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
12
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
13
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
14
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
15
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
16
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
17
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
18
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
19
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
20
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?

सुरक्षा दलात लाखाहून अधिक पदे रिक्त; लेखी, शारीरिक परीक्षा होऊनही दोन वर्षांत भरती नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 06:58 IST

गृहमंत्रालय म्हणते, प्रक्रिया अंतिम टप्प्यात

नितीन अग्रवाल नवी दिल्ली : सुरक्षा दलांमध्ये एक लाखापेक्षा जास्त पदे रिक्त असली तरी भरती प्रक्रियेची गती फारच हळू आहे. केंद्रीय गृहमंत्रालयांतर्गत सुरक्षा दलांमध्ये ५५ हजार पदांसाठी लेखी आणि शारीरिक परीक्षा होऊनही दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून भरती प्रक्रिया सुरूच आहे.

यादरम्यान, रिक्त पदांची संख्या वाढून एक लाखापेक्षा जास्त झाली आहे. निमलष्करी दलांशी संबंधित संघटन कॉन्फडेरेशन आॅफ पॅरामिलिटरी दलाचे सरचिटणीस रणबीर सिंह यांचे म्हणणे असे की, आॅगस्ट २०१८ मध्ये जवळपास ५४,९५३ पदे भरतीसाठी जाहिरातीसह प्रक्रिया सुरू केली गेली होती. त्यात ४७,३०७ पदे पुरुषांसाठी व ७,६४६ पदे महिलांसाठी होती. या पदांसाठी लेखी व शारीरिक परीक्षाही झाली; परंतु दोन वर्षांनंतरही भरती प्रकिया पूर्ण झाली नाही.

यादरम्यान, अनेक योग्य उमेदवार वय वाढल्यामुळे स्पर्धेतून बाद होतील. त्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढत जात आहे. भरतीला होत असलेल्या विलंबाचा मुद्दा गृहमंत्रालय व पंतप्रधान कार्यालयाकडे उपस्थित करण्यात आला आहे. भरतीला होत असलेल्या विलंबावर गृहमंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, भरती प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात असून, भरतीसाठी आवश्यक वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया सुरू आहे. मंत्रालयांतर्गत ६०,२१० कॉन्स्टेबल, २,५३४ उपनिरीक्षक तथा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमाद्वारे कमेंडेटच्या ३३० पदांवर नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. 

टॅग्स :Home Ministryगृह मंत्रालय