शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

सुरक्षा दलात लाखाहून अधिक पदे रिक्त; लेखी, शारीरिक परीक्षा होऊनही दोन वर्षांत भरती नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 06:58 IST

गृहमंत्रालय म्हणते, प्रक्रिया अंतिम टप्प्यात

नितीन अग्रवाल नवी दिल्ली : सुरक्षा दलांमध्ये एक लाखापेक्षा जास्त पदे रिक्त असली तरी भरती प्रक्रियेची गती फारच हळू आहे. केंद्रीय गृहमंत्रालयांतर्गत सुरक्षा दलांमध्ये ५५ हजार पदांसाठी लेखी आणि शारीरिक परीक्षा होऊनही दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून भरती प्रक्रिया सुरूच आहे.

यादरम्यान, रिक्त पदांची संख्या वाढून एक लाखापेक्षा जास्त झाली आहे. निमलष्करी दलांशी संबंधित संघटन कॉन्फडेरेशन आॅफ पॅरामिलिटरी दलाचे सरचिटणीस रणबीर सिंह यांचे म्हणणे असे की, आॅगस्ट २०१८ मध्ये जवळपास ५४,९५३ पदे भरतीसाठी जाहिरातीसह प्रक्रिया सुरू केली गेली होती. त्यात ४७,३०७ पदे पुरुषांसाठी व ७,६४६ पदे महिलांसाठी होती. या पदांसाठी लेखी व शारीरिक परीक्षाही झाली; परंतु दोन वर्षांनंतरही भरती प्रकिया पूर्ण झाली नाही.

यादरम्यान, अनेक योग्य उमेदवार वय वाढल्यामुळे स्पर्धेतून बाद होतील. त्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढत जात आहे. भरतीला होत असलेल्या विलंबाचा मुद्दा गृहमंत्रालय व पंतप्रधान कार्यालयाकडे उपस्थित करण्यात आला आहे. भरतीला होत असलेल्या विलंबावर गृहमंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, भरती प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात असून, भरतीसाठी आवश्यक वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया सुरू आहे. मंत्रालयांतर्गत ६०,२१० कॉन्स्टेबल, २,५३४ उपनिरीक्षक तथा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमाद्वारे कमेंडेटच्या ३३० पदांवर नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. 

टॅग्स :Home Ministryगृह मंत्रालय