शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

चारशेहून अधिक भारतीय मायदेशी; मायभूमीवर पाय ठेवताच केला जयघोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 06:05 IST

अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. त्यामुळे तेथे अडकलेल्या भारतीयांची चिंता वाढली होती. तालिबानने भारतीयांवर हल्ला करणार नसल्याचे जाहीर केले असले तरीही भीती  होती.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अफगाणिस्तानातील  तणावग्रस्त परिस्थितीत वायुसेनेच्या विशेष विमानांमधून सुमारे ४०० भारतीयांना मायदेशी परत आणण्यात यश आले आहे. भारतीयांसह काही अफगाण नागरिकांना घेऊन वायुसेनेची विमाने गाझियाबाद येथील हिंडन एअरबेसवर उतरली. भूमीवर पाय ठेवताच भाारतीयांनी ‘भारतमाता की जय’ अशा घोषणाही दिल्या. 

अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. त्यामुळे तेथे अडकलेल्या भारतीयांची चिंता वाढली होती. तालिबानने भारतीयांवर हल्ला करणार नसल्याचे जाहीर केले असले तरीही भीती  होती. सुमारे २०० शीख आणि हिंदू नागरिक एका गुरुद्वारामध्ये थांबले होते. अखेर वायुसेनेच्या विशेष विमानांमधून त्यांना भारतात आणण्यात आले. तीन विमानांमधून ३२९ भारतीय आणि अफगाणिस्तानच्या दोन खासदारांसह जवळपास ४०० जणांना भारतात आणण्यात आले.. याशिवाय अमेरिका आणि नाटोच्या विमानांमधून दोहा येथे गेलेल्या १३५ भारतीयांनाही परत आणण्यात आल्याची माहिती वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी दिली. दोहा येथून भारतात आलेल्या नागरिकांमध्ये बहुतांश जण हे विविध परदेशी कंपन्यांचे कर्मचारी आहेत. कतार, ताजिकिस्तान, अमेरिका व इतर मित्र राष्ट्रांच्या मदतीने भारत ही मोहीम राबवीत आहे.

अफगाण महिलेने मानले आभारभारतात दाखल झालेल्या अफगाण नागरिकांनी भारताचे आभार मानले आहेत. एका महिलेने सांगितले की, तालिबान्यांनी माझे घर जाळले. त्यामुळे मी, माझी मुलगी आणि दोन नातवंडे येथे आलो आहोत. या कठीण प्रसंगात आमचे भारतीय बंधू आणि भगिनी आमच्या मदतीला आले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते.

अडकलेल्या प्रत्येक भारतीयाला सुरक्षितपणे भारतात परत आणण्यास सर्वोच्च प्राधान्य असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. या नागरिकांची नेमकी ठिकाणे शोधण्याचे आव्हान आहे. त्यामुळे भारतीयांनी तसेच त्यांना नोकऱ्या देणाऱ्या कंपन्यांनी माहिती पुरविण्याचे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. nभारतीयांसोबत अनेक अफगाण नागरिकही भारतात दाखल होत आहेत. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानindian air forceभारतीय हवाई दल