शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

चारशेहून अधिक भारतीय मायदेशी; मायभूमीवर पाय ठेवताच केला जयघोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 06:05 IST

अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. त्यामुळे तेथे अडकलेल्या भारतीयांची चिंता वाढली होती. तालिबानने भारतीयांवर हल्ला करणार नसल्याचे जाहीर केले असले तरीही भीती  होती.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अफगाणिस्तानातील  तणावग्रस्त परिस्थितीत वायुसेनेच्या विशेष विमानांमधून सुमारे ४०० भारतीयांना मायदेशी परत आणण्यात यश आले आहे. भारतीयांसह काही अफगाण नागरिकांना घेऊन वायुसेनेची विमाने गाझियाबाद येथील हिंडन एअरबेसवर उतरली. भूमीवर पाय ठेवताच भाारतीयांनी ‘भारतमाता की जय’ अशा घोषणाही दिल्या. 

अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. त्यामुळे तेथे अडकलेल्या भारतीयांची चिंता वाढली होती. तालिबानने भारतीयांवर हल्ला करणार नसल्याचे जाहीर केले असले तरीही भीती  होती. सुमारे २०० शीख आणि हिंदू नागरिक एका गुरुद्वारामध्ये थांबले होते. अखेर वायुसेनेच्या विशेष विमानांमधून त्यांना भारतात आणण्यात आले. तीन विमानांमधून ३२९ भारतीय आणि अफगाणिस्तानच्या दोन खासदारांसह जवळपास ४०० जणांना भारतात आणण्यात आले.. याशिवाय अमेरिका आणि नाटोच्या विमानांमधून दोहा येथे गेलेल्या १३५ भारतीयांनाही परत आणण्यात आल्याची माहिती वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी दिली. दोहा येथून भारतात आलेल्या नागरिकांमध्ये बहुतांश जण हे विविध परदेशी कंपन्यांचे कर्मचारी आहेत. कतार, ताजिकिस्तान, अमेरिका व इतर मित्र राष्ट्रांच्या मदतीने भारत ही मोहीम राबवीत आहे.

अफगाण महिलेने मानले आभारभारतात दाखल झालेल्या अफगाण नागरिकांनी भारताचे आभार मानले आहेत. एका महिलेने सांगितले की, तालिबान्यांनी माझे घर जाळले. त्यामुळे मी, माझी मुलगी आणि दोन नातवंडे येथे आलो आहोत. या कठीण प्रसंगात आमचे भारतीय बंधू आणि भगिनी आमच्या मदतीला आले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते.

अडकलेल्या प्रत्येक भारतीयाला सुरक्षितपणे भारतात परत आणण्यास सर्वोच्च प्राधान्य असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. या नागरिकांची नेमकी ठिकाणे शोधण्याचे आव्हान आहे. त्यामुळे भारतीयांनी तसेच त्यांना नोकऱ्या देणाऱ्या कंपन्यांनी माहिती पुरविण्याचे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. nभारतीयांसोबत अनेक अफगाण नागरिकही भारतात दाखल होत आहेत. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानindian air forceभारतीय हवाई दल