शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

चारशेहून अधिक भारतीय मायदेशी; मायभूमीवर पाय ठेवताच केला जयघोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 06:05 IST

अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. त्यामुळे तेथे अडकलेल्या भारतीयांची चिंता वाढली होती. तालिबानने भारतीयांवर हल्ला करणार नसल्याचे जाहीर केले असले तरीही भीती  होती.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अफगाणिस्तानातील  तणावग्रस्त परिस्थितीत वायुसेनेच्या विशेष विमानांमधून सुमारे ४०० भारतीयांना मायदेशी परत आणण्यात यश आले आहे. भारतीयांसह काही अफगाण नागरिकांना घेऊन वायुसेनेची विमाने गाझियाबाद येथील हिंडन एअरबेसवर उतरली. भूमीवर पाय ठेवताच भाारतीयांनी ‘भारतमाता की जय’ अशा घोषणाही दिल्या. 

अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. त्यामुळे तेथे अडकलेल्या भारतीयांची चिंता वाढली होती. तालिबानने भारतीयांवर हल्ला करणार नसल्याचे जाहीर केले असले तरीही भीती  होती. सुमारे २०० शीख आणि हिंदू नागरिक एका गुरुद्वारामध्ये थांबले होते. अखेर वायुसेनेच्या विशेष विमानांमधून त्यांना भारतात आणण्यात आले. तीन विमानांमधून ३२९ भारतीय आणि अफगाणिस्तानच्या दोन खासदारांसह जवळपास ४०० जणांना भारतात आणण्यात आले.. याशिवाय अमेरिका आणि नाटोच्या विमानांमधून दोहा येथे गेलेल्या १३५ भारतीयांनाही परत आणण्यात आल्याची माहिती वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी दिली. दोहा येथून भारतात आलेल्या नागरिकांमध्ये बहुतांश जण हे विविध परदेशी कंपन्यांचे कर्मचारी आहेत. कतार, ताजिकिस्तान, अमेरिका व इतर मित्र राष्ट्रांच्या मदतीने भारत ही मोहीम राबवीत आहे.

अफगाण महिलेने मानले आभारभारतात दाखल झालेल्या अफगाण नागरिकांनी भारताचे आभार मानले आहेत. एका महिलेने सांगितले की, तालिबान्यांनी माझे घर जाळले. त्यामुळे मी, माझी मुलगी आणि दोन नातवंडे येथे आलो आहोत. या कठीण प्रसंगात आमचे भारतीय बंधू आणि भगिनी आमच्या मदतीला आले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते.

अडकलेल्या प्रत्येक भारतीयाला सुरक्षितपणे भारतात परत आणण्यास सर्वोच्च प्राधान्य असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. या नागरिकांची नेमकी ठिकाणे शोधण्याचे आव्हान आहे. त्यामुळे भारतीयांनी तसेच त्यांना नोकऱ्या देणाऱ्या कंपन्यांनी माहिती पुरविण्याचे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. nभारतीयांसोबत अनेक अफगाण नागरिकही भारतात दाखल होत आहेत. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानindian air forceभारतीय हवाई दल