शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

...अन् हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं! लग्नाच्याच दिवशी घराला भीषण आग; 5 जणांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 08:52 IST

लग्नाची तयारी सुरू असलेल्या तीन मजली इमारतीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद जिल्ह्यात लग्नाची तयारी सुरू असलेल्या तीन मजली इमारतीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आग इतक्या वेगाने पसरली की इमारतीतील पहिल्या मजल्यावरील लोकांना इमारती बाहेर येण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे होरपळून पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये तीन लहान मुलांचा देखील समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या सात नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं आहे. याच घरामध्ये आज लग्न होणार होतं. विवाहसोहळ्यात सहभागी होण्यासाठी शमा परवीन या मुरादाबादमध्ये आपल्या माहेरी आल्या होत्या. पहिल्या मजल्यावर त्या आपली आई आणि मुलांसह राहत होत्या. पण या आगीत त्यांचा मृत्यू झाला आणि हसतं खेळतं घर उद्धवस्त झालं आहे. ज्या घरात सनईचे सूर ऐकू येणार होते, तिथेच दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

मुरादाबादच्या गलशहीद परिसरात राहणाऱ्या जावेद कुरेशी यांच्या दोन मुलीचं 26 ऑगस्ट रोजी लग्न होतं. घरामध्ये आनंदाचं वातावरण असून लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. याच दरम्यान ही दुर्घटना घडली. मुरादाबादचे न्यायदंडाधिकारी शैलेंद्र कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरादाबादमधील तीन मजली इमारतीत आग लागल्याने पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर सात लोक जखमी झाले आहेत. एकाच कुटुंबातील सदस्य या इमारतीत राहत होते. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशfireआग