शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

...अन् हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं! लग्नाच्याच दिवशी घराला भीषण आग; 5 जणांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 08:52 IST

लग्नाची तयारी सुरू असलेल्या तीन मजली इमारतीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद जिल्ह्यात लग्नाची तयारी सुरू असलेल्या तीन मजली इमारतीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आग इतक्या वेगाने पसरली की इमारतीतील पहिल्या मजल्यावरील लोकांना इमारती बाहेर येण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे होरपळून पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये तीन लहान मुलांचा देखील समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या सात नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं आहे. याच घरामध्ये आज लग्न होणार होतं. विवाहसोहळ्यात सहभागी होण्यासाठी शमा परवीन या मुरादाबादमध्ये आपल्या माहेरी आल्या होत्या. पहिल्या मजल्यावर त्या आपली आई आणि मुलांसह राहत होत्या. पण या आगीत त्यांचा मृत्यू झाला आणि हसतं खेळतं घर उद्धवस्त झालं आहे. ज्या घरात सनईचे सूर ऐकू येणार होते, तिथेच दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

मुरादाबादच्या गलशहीद परिसरात राहणाऱ्या जावेद कुरेशी यांच्या दोन मुलीचं 26 ऑगस्ट रोजी लग्न होतं. घरामध्ये आनंदाचं वातावरण असून लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. याच दरम्यान ही दुर्घटना घडली. मुरादाबादचे न्यायदंडाधिकारी शैलेंद्र कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरादाबादमधील तीन मजली इमारतीत आग लागल्याने पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर सात लोक जखमी झाले आहेत. एकाच कुटुंबातील सदस्य या इमारतीत राहत होते. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशfireआग