शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

Parliament: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळामुळे १३३ कोटींचा चुराडा; केवळ १८ तास कामकाज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 10:02 IST

एका माहितीनुसार, आतापर्यंत संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील गोंधळामुळे करदात्यांचा १३३ कोटी रुपयांचा चुराडा झाला.

ठळक मुद्देसंसदेच्या पावसाळी अधिवेशनातील गोंधळामुळे करदात्यांचा १३३ कोटी रुपयांचा चुराडाबहुतांश विधेयके मंजुरीच्या प्रतिक्षेतएकूण निर्धारित कामकाजापैकी केवळ १६.८ टक्के कामकाज

नवी दिल्ली:संसदेच्या पावसाळी अधिवेशन सुरू होऊन दोन आठवडे उलटून गेले आहेत. पहिल्या दोन्ही आठवड्यात विरोधकांनी अनेकविध मुद्द्यांवरून केंद्रातील मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या गोंधळामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज वेळोवेळी स्थगित करण्यात आले. महागाई, इंधनदरवाढ, केंद्रीय कृषी कायदे, शेतकरी आंदोलन, पेगॅसस हेरगिरी प्रकरणी विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. मिळालेल्या एका माहितीनुसार, आतापर्यंत संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील गोंधळामुळे करदात्यांचा १३३ कोटी रुपयांचा चुराडा झाला. (monsoon session of parliament more than rs 133 crore wasted due to uproar)

गुंतवणुकीची सुवर्ण संधी! ‘या’ एकाच दिवशी ४ कंपन्यांचे IPO सादर होणार; पाहा, डिटेल्स

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मागील कालावधीत १०७ तासांचे कामकाज निर्धारित करण्यात आले होते. मात्र, विरोधकांच्या गोंधळामुळे प्रत्यक्षात १८ तासच काम झाल्याची माहिती मिळाली आहे. सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यसभेत निर्धारित कामकाजातील केवळ २१ टक्के काम होऊ शकले. तर लोकसभेत एकूण निर्धारित कामकाजापैकी केवळ १३ टक्के काम होऊ शकले. १९ जुलै २०२१ रोजी सुरू झालेले संसदेचे पावसाळी अधिवेशन १३ ऑगस्ट २०२१ पर्यंत चालणार आहे.

इंधनदरवाढीमुळे ‘या’ कंपनीची भन्नाट कमाई; तब्बल ५ हजार ९४१ कोटींचा नफा

बहुतांश विधेयके मंजुरीच्या प्रतिक्षेत

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभेत ५४ तासांपैकी केवल ७ तास, तर राज्यसभेत ५३ तासांपैकी केवळ ११ तास कामकाज होऊ शकले. संसदेच्या दोन्ही सभागृहातील एकूण निर्धारित कामकाजापैकी केवळ १६.८ टक्के कामकाज झाल्याची माहिती मिळाली आहे. आतापर्यंत लोकसभा आणि राज्यसभेत फक्त ५ विधेयके मंजुरी झाली असून, बहुतांश महत्त्वाची विधेयके चर्चेनंतर मंजूर होण्याच्या प्रतिक्षेत असल्याचे सांगितले जात आहे. 

आता TATA देणार मुकेश अंबानींना टक्कर; ‘या’ कंपन्यांसोबत करणार 5G क्रांती!

दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनावेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी चक्क ट्रॅक्टर घेऊन संसद परिसरात आले होते. केंद्रीय कृषी कायद्याला विरोध आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी ट्रॅक्टरवरून राहुल गांधी आले होते. यावेळी त्यांच्यासोबत अनेक काँग्रेस नेते होते. पोलिसांनी हस्तक्षेप करत काही काँग्रेस नेत्यांवर कारवाई केली. तसेच पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरूनही राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. संसदेत विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. मोदी सरकारने पेगॅसस खरेदी केले की नाही आणि पेगॅसस हत्याराचा वापर आपल्याच लोकांविरुद्ध केला की नाही, या प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यावीत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :ParliamentसंसदCentral Governmentकेंद्र सरकार