शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

Video: 'मुलाला सेट अन् जावयाला भेट'; खासदार दुबे यांचं विधान, सोनिया गांधींनाही आले हसू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 13:54 IST

Monsoon Session Of Parliament: काँग्रेसने आम्हाला राष्ट्रवाद शिकवू नये, असं म्हणत हा प्रस्ताव विरोधकांच्या एकीसाठी आणला असल्याचा दावा निशिकांत दुबे यांनी केला. 

नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आजपासून लोकसभेत चर्चा सुरू झाली आहे. या प्रस्तावावर काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी चर्चा सुरू केली आहे. या चर्चेत काँग्रेसचे खासदार राहुल गांधीही सहभागी होणार आहेत. संसदेत तीन दिवस अविश्वास प्रस्तावावर १८ तास चर्चा होणार आहे. यानंतर १० ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेला उत्तर देतील.

अविश्वास ठरावावरील चर्चेदरम्यान विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना भाजपाचे खासदार निशिकांत दुबे म्हणाले की, आम्हाला वाटले होते की राहुल गांधी चर्चा सुरू करतील पण ते बोलायला तयार नाहीत, कदाचित ते सकाळी उशीरा उठले असतील. मणिपूरबाबत दुबे म्हणाले की, मी स्वतः मणिपूरच्या इतिहासाचा बळी आहे. सुरक्षा दलात उच्च पदावर असलेल्या माझ्या नातेवाईकाला अतिरेकी हल्ल्यात आपला पाय गमवावा लागला होता. काँग्रेसने आम्हाला राष्ट्रवाद शिकवू नये, असं म्हणत हा प्रस्ताव विरोधकांच्या एकीसाठी आणला असल्याचा दावा निशिकांत दुबे यांनी केला. 

विरोधी एकजुटीवर निशाणा साधत निशिकांत दुबे म्हणाले की, विरोधी पक्षात बसलेले काही लोकच भारताचे पूर्ण रूप सांगू शकतील. सर्व विरोधी पक्ष एकमेकांशी लढत आहेत पण तरीही केंद्रात युती करत आहेत. लालू यादव यांना आम्ही तुरुंगात पाठवले नाही, काँग्रेसने त्यांना तुरुंगात पाठवले. ममता बॅनर्जी यांच्यावर काँग्रेसने आरोप केले आम्ही नाही. तसेच शरद पवारांना कोणी हटवले? असा सवाल करत काँग्रेसला कंटाळूनच शरद पवार यांनी स्वतंत्र्य पक्ष काढला, असं दुबे यांनी सांगितले. तसेच सोनिया गांधी यांना मुलाला सेट आणि जावयाला भेट करायची आहे. यासाठीच त्यांनी मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला, असा टोलाही दुबे यांनी लगावला. दुबेंच्या या विधानावर सोनिया गांधी यांनाही हसू आले.

मणिपूरला फटका बसला तर भारतालाही फटका बसतो. आम्ही फक्त मणिपूरबद्दल बोलत नाही. संपूर्ण भारताबद्दल बोलतो. या दु:खाच्या काळात संपूर्ण देश मणिपूरच्या पाठीशी आहे, असा संदेश यावा, अशी आमची अपेक्षा होती, पण दुर्दैवाने तसे झाले नाही. पंतप्रधान नरेंद्र मौन व्रत घेतले. ते लोकसभेतही काही बोलणार नाहीत आणि राज्यसभेतही काही बोलणार नाहीत. त्यामुळेच आम्हाला पंतप्रधान मोदींचं मौन व्रत अविश्वास ठरावाद्वारे तोडायचे आहे, असं गौरव गोगाई यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला का गेले नाहीत? असा सवालही गौरव गोगोई यांनी उपस्थित केला. पंतप्रधान मोदींना मणिपूरवर बोलायला ८० दिवस का लागले? पंतप्रधान मोदींकडून शोक किंवा शांततेचे आवाहन का झाले नाही? मंत्र्याला बोलण्यापासून कोणी रोखत नाही, पण पंतप्रधान मोदींच्या बोलण्याचं वजन कोणत्याही मंत्र्यामध्ये नाही. आमचा तिसरा प्रश्न आहे की, पंतप्रधानांनी मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना का हटवले नाही. गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वी दोनदा मुख्यमंत्री बदलले, उत्तराखंड, त्रिपुरामध्येही मुख्यमंत्री बदलले. पण मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना विशेष आशीर्वाद का?, असे विविध सवाल गौरव गोगाई यांनी उपस्थित केले.

टॅग्स :Monsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसद