शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

Video: 'मुलाला सेट अन् जावयाला भेट'; खासदार दुबे यांचं विधान, सोनिया गांधींनाही आले हसू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 13:54 IST

Monsoon Session Of Parliament: काँग्रेसने आम्हाला राष्ट्रवाद शिकवू नये, असं म्हणत हा प्रस्ताव विरोधकांच्या एकीसाठी आणला असल्याचा दावा निशिकांत दुबे यांनी केला. 

नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आजपासून लोकसभेत चर्चा सुरू झाली आहे. या प्रस्तावावर काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी चर्चा सुरू केली आहे. या चर्चेत काँग्रेसचे खासदार राहुल गांधीही सहभागी होणार आहेत. संसदेत तीन दिवस अविश्वास प्रस्तावावर १८ तास चर्चा होणार आहे. यानंतर १० ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेला उत्तर देतील.

अविश्वास ठरावावरील चर्चेदरम्यान विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना भाजपाचे खासदार निशिकांत दुबे म्हणाले की, आम्हाला वाटले होते की राहुल गांधी चर्चा सुरू करतील पण ते बोलायला तयार नाहीत, कदाचित ते सकाळी उशीरा उठले असतील. मणिपूरबाबत दुबे म्हणाले की, मी स्वतः मणिपूरच्या इतिहासाचा बळी आहे. सुरक्षा दलात उच्च पदावर असलेल्या माझ्या नातेवाईकाला अतिरेकी हल्ल्यात आपला पाय गमवावा लागला होता. काँग्रेसने आम्हाला राष्ट्रवाद शिकवू नये, असं म्हणत हा प्रस्ताव विरोधकांच्या एकीसाठी आणला असल्याचा दावा निशिकांत दुबे यांनी केला. 

विरोधी एकजुटीवर निशाणा साधत निशिकांत दुबे म्हणाले की, विरोधी पक्षात बसलेले काही लोकच भारताचे पूर्ण रूप सांगू शकतील. सर्व विरोधी पक्ष एकमेकांशी लढत आहेत पण तरीही केंद्रात युती करत आहेत. लालू यादव यांना आम्ही तुरुंगात पाठवले नाही, काँग्रेसने त्यांना तुरुंगात पाठवले. ममता बॅनर्जी यांच्यावर काँग्रेसने आरोप केले आम्ही नाही. तसेच शरद पवारांना कोणी हटवले? असा सवाल करत काँग्रेसला कंटाळूनच शरद पवार यांनी स्वतंत्र्य पक्ष काढला, असं दुबे यांनी सांगितले. तसेच सोनिया गांधी यांना मुलाला सेट आणि जावयाला भेट करायची आहे. यासाठीच त्यांनी मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला, असा टोलाही दुबे यांनी लगावला. दुबेंच्या या विधानावर सोनिया गांधी यांनाही हसू आले.

मणिपूरला फटका बसला तर भारतालाही फटका बसतो. आम्ही फक्त मणिपूरबद्दल बोलत नाही. संपूर्ण भारताबद्दल बोलतो. या दु:खाच्या काळात संपूर्ण देश मणिपूरच्या पाठीशी आहे, असा संदेश यावा, अशी आमची अपेक्षा होती, पण दुर्दैवाने तसे झाले नाही. पंतप्रधान नरेंद्र मौन व्रत घेतले. ते लोकसभेतही काही बोलणार नाहीत आणि राज्यसभेतही काही बोलणार नाहीत. त्यामुळेच आम्हाला पंतप्रधान मोदींचं मौन व्रत अविश्वास ठरावाद्वारे तोडायचे आहे, असं गौरव गोगाई यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला का गेले नाहीत? असा सवालही गौरव गोगोई यांनी उपस्थित केला. पंतप्रधान मोदींना मणिपूरवर बोलायला ८० दिवस का लागले? पंतप्रधान मोदींकडून शोक किंवा शांततेचे आवाहन का झाले नाही? मंत्र्याला बोलण्यापासून कोणी रोखत नाही, पण पंतप्रधान मोदींच्या बोलण्याचं वजन कोणत्याही मंत्र्यामध्ये नाही. आमचा तिसरा प्रश्न आहे की, पंतप्रधानांनी मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना का हटवले नाही. गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वी दोनदा मुख्यमंत्री बदलले, उत्तराखंड, त्रिपुरामध्येही मुख्यमंत्री बदलले. पण मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना विशेष आशीर्वाद का?, असे विविध सवाल गौरव गोगाई यांनी उपस्थित केले.

टॅग्स :Monsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसद