शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

यंदा पाऊस सरासरीएवढा, हवामान खात्याचा दुसरा अंदाज जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 10:57 IST

हवामान विभागाकडून मान्सूनचा दुसरा अंदाजदेखील प्रसिद्ध करण्यात आला आहे.

नवी दिल्ली -  केरळमध्ये मंगळवारी (29 मे) सकाळी दाखल झाला आणि लगेचच संपूर्ण राज्यात स्थिरावला आहे. त्यामुळे त्याचे 6 जून रोजी मुंबईत आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून मान्सूनचा दुसरा अंदाजदेखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. पाऊसमान सरासरीएवढेच राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. यंदा सरासरीच्या 97 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. उत्तर-पश्चिम भारतात 100 टक्के पाऊस होणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. एकूणच दुष्काळाची परिस्थिती निर्माण होणार नसल्याचं हवामान विभागानं सांगितलं असल्यानं सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

(आनंदाची बातमी... मान्सून केरळमध्ये पोहोचला, कोकणच्या दिशेनं निघाला!)

महाराष्ट्रात वेळेवर येणार मान्सूनकेरळमध्ये मान्सूनचे वेळेआधीच आगमन झाले आहे. बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मान्सून कर्नाटकात येत्या दोन दिवसांत दाखल होईल आणि त्यानंतर महाराष्ट्रात वेळेवर येण्याची शक्यता आहे. - डॉ. ए. के. श्रीवास्तव, भारतीय हवामान विभाग

(नागपुरात मान्सून जूनच्या मध्यात धडकणार)

वेगाने वाटचालमान्सून केरळात १ जून रोजी दाखल होतो. अंदमानमध्ये दाखल होण्याची त्याची तारीख २० मे आहे. परंतु अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्याने अंदमानच्या दक्षिण समुद्रात मान्सूनचे आगमन यंदा उशिरा झाले होते. चक्रीवादळाचा जोर ओसरल्यानंतर मात्र त्याने वेगाने वाटचाल केली.

दरम्यान, केरळच्या बहुसंख्य भागात, तसेच तामिळनाडू व कर्नाटकच्या किनारी भागात मंगळवारी पावसाने हजेरी लावली. गोव्यातही सकाळी ढगाळ वातावरण होते. मान्सूनची घोडदौड अशीच सुरू राहिली, तर पुढील आठवडाभरात तो कोकणासह मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. स्कायमेट या संस्थेने २८ मे रोजी केरळात दाखल होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. हवामान विभागाने मात्र, २९ मे रोजी मान्सून येणार असल्याचे गेल्या आठवड्यात जाहीर केले होते. हे अंदाज सध्या केरळपुरते तरी जवळपास खरे ठरले आहेत.कोकण, गोव्यात पावसाची शक्यताबुधवारी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गोव्याच्या किनारपट्टीवर व दक्षिण महाराष्ट्रात ताशी ४० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मच्छीमारांनी दक्षिण कोकण व गोव्याच्या समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे़अंदाज कधी बरोबर, कधी ‘अंदाज’च!!भारतीय हवामान विभागाचे अंदाज गेल्या तीन वर्षांपासून अचूक ठरत आहेत. या विभागाने २०१५ साली ३० मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असे जाहीर केले होते, पण त्या वर्षी मान्सूनचे आगमन सहा दिवस विलंबाने म्हणजे ५ जूनला झाले होते.गेल्या वर्षी दोन दिवस आधी म्हणजे ३0 मे रोजी मान्सूनने केरळात हजेरी लावली होती. मागील वर्षी ३० मे रोजी केरळात मान्सून दाखल झाला होता. आतापर्यंत २0१५ चा अपवाद वगळता मान्सूनच्या आगमनात १ वा २ दिवसांचा फरक होत असतो. 

 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Rainपाऊस