शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
2
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
3
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
4
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
5
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
6
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
7
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
8
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
9
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
10
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
11
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
12
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
13
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
14
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
15
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
16
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
17
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
18
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
19
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
20
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव

ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 14:45 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना ईडी-सीबीआयच्या कारवाईत जप्त केलेल्या पैशांबाबत मोठं विधान केलं आहे.

PM Modi on ED: गेल्या काही वर्षांपासून देशभरात अंमलबजावणी संचालनालयाच्या कारवाया मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. ईडी कारवाईमुळे अनेकांना तुरुंगाची हवा देखील खावी लागली आहे. तर काही कारवायांमध्ये ईडीने मोठ्या प्रमाणात रोकड देखील जप्त केली आहे. ईडीचा वापर आम्हाला संपवण्यासाठी केला जात असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी ईडी ही स्वतंत्ररित्या काम करत असल्याचे म्हटलं आहे. मात्र आता ईडीच्या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या पैशांबाबत पंतप्रधान मोदींनी मोठं विधान केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी एका मुलाखतीमध्ये बोलताना ईडीच्या कारवायांबद्दल उघडपणे बोलले आहेत. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ईडीने जप्त केलेला पैसा गरिबांना परत करण्यासाठी सरकार पर्याय शोधत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले. इंडिया टुडेला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोदींनी सांगितले की, आपण ईडीने जप्त केलेली रक्कम गरिबांमध्ये वितरित करण्याचे मार्ग शोधत आहे.मात्र, हे कधी शक्य होईल हे मोदींनी सांगितलेले नाही. काँग्रेसच्या काळात ईडीने काम करणे बंद केले होते. तर भाजप सरकारमध्ये ईडी उघडपणे काम करत आहे, असेही मोदी म्हणाले.

"मी यावर खूप विचार करत आहे, कारण मला मनापासून वाटते की या लोकांनी आपल्या पदाचा गैरफायदा घेऊन गरीब लोकांचे पैसे लुटले आहेत आणि त्यांना ते परत मिळाले पाहिजेत. यासाठी मला कायदेशीर बदल करावे लागले तर मी करेन. सध्या मी यासाठी कायदेशीर बाजू समजून घेत आहे. मला सल्ला देण्याच्या सूचनाही मी न्यायव्यवस्थेला केल्या आहेत," असे पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

भारतीय दंड संहिता म्हणजेच आयपीसीच्या जागी आणलेल्या न्याय संहितेमध्ये या संदर्भात काही तरतुदी असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले. आतापर्यंत सरकारी यंत्रणांनी १.२५ लाख कोटी रुपये जप्त केले आहेत, असं मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी पश्चिम बंगाल, केरळ आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्याशी संबंधित प्रकरणांचा खास करुन उल्लेख केला.

"कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा दिलेल्या सहकारी बँकांमध्ये वैयक्तिक व्यवसाय भागीदारीच्या नावाखाली लोकांची फसवणूक करण्यात आली होती. याशिवायसुद्धा हजारो कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. लालूजी रेल्वेमंत्री असताना त्यांनी गरीब लोकांना नोकऱ्या देण्याच्या नावाखाली त्यांच्या नावावर जमीन घेतली. या जमिनी लोकांना परत करण्याच्या कराराचा विचार करत आहे," असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयBJPभाजपा