शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
4
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
5
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
6
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
7
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
8
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
9
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
10
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
11
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
12
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
13
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
14
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
15
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
16
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
17
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
18
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
19
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
20
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
Daily Top 2Weekly Top 5

ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 14:45 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना ईडी-सीबीआयच्या कारवाईत जप्त केलेल्या पैशांबाबत मोठं विधान केलं आहे.

PM Modi on ED: गेल्या काही वर्षांपासून देशभरात अंमलबजावणी संचालनालयाच्या कारवाया मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. ईडी कारवाईमुळे अनेकांना तुरुंगाची हवा देखील खावी लागली आहे. तर काही कारवायांमध्ये ईडीने मोठ्या प्रमाणात रोकड देखील जप्त केली आहे. ईडीचा वापर आम्हाला संपवण्यासाठी केला जात असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी ईडी ही स्वतंत्ररित्या काम करत असल्याचे म्हटलं आहे. मात्र आता ईडीच्या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या पैशांबाबत पंतप्रधान मोदींनी मोठं विधान केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी एका मुलाखतीमध्ये बोलताना ईडीच्या कारवायांबद्दल उघडपणे बोलले आहेत. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ईडीने जप्त केलेला पैसा गरिबांना परत करण्यासाठी सरकार पर्याय शोधत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले. इंडिया टुडेला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोदींनी सांगितले की, आपण ईडीने जप्त केलेली रक्कम गरिबांमध्ये वितरित करण्याचे मार्ग शोधत आहे.मात्र, हे कधी शक्य होईल हे मोदींनी सांगितलेले नाही. काँग्रेसच्या काळात ईडीने काम करणे बंद केले होते. तर भाजप सरकारमध्ये ईडी उघडपणे काम करत आहे, असेही मोदी म्हणाले.

"मी यावर खूप विचार करत आहे, कारण मला मनापासून वाटते की या लोकांनी आपल्या पदाचा गैरफायदा घेऊन गरीब लोकांचे पैसे लुटले आहेत आणि त्यांना ते परत मिळाले पाहिजेत. यासाठी मला कायदेशीर बदल करावे लागले तर मी करेन. सध्या मी यासाठी कायदेशीर बाजू समजून घेत आहे. मला सल्ला देण्याच्या सूचनाही मी न्यायव्यवस्थेला केल्या आहेत," असे पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

भारतीय दंड संहिता म्हणजेच आयपीसीच्या जागी आणलेल्या न्याय संहितेमध्ये या संदर्भात काही तरतुदी असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले. आतापर्यंत सरकारी यंत्रणांनी १.२५ लाख कोटी रुपये जप्त केले आहेत, असं मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी पश्चिम बंगाल, केरळ आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्याशी संबंधित प्रकरणांचा खास करुन उल्लेख केला.

"कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा दिलेल्या सहकारी बँकांमध्ये वैयक्तिक व्यवसाय भागीदारीच्या नावाखाली लोकांची फसवणूक करण्यात आली होती. याशिवायसुद्धा हजारो कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. लालूजी रेल्वेमंत्री असताना त्यांनी गरीब लोकांना नोकऱ्या देण्याच्या नावाखाली त्यांच्या नावावर जमीन घेतली. या जमिनी लोकांना परत करण्याच्या कराराचा विचार करत आहे," असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयBJPभाजपा