शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

"महिला सुशिक्षित आहे म्हणून तिला..."; के. कवितांना जामीन मंजूर करताना कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 15:56 IST

Suprem Court : दिल्ली कथित मध्य घोटाळ्याशी संबधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सुप्रीम कोर्टाने के. कविता यांना जामीन मंजूर केला आहे.

K Kavitha's bail : कथित दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे काही दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आले होते. त्यानंतर आता बीआरएस नेत्या के कविता यांनाही सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन दिला आहे. हा निर्णय ईडी आणि सीबीआयला मोठा धक्का देणारा असल्याचे म्हटलं जात आहे. के कविता यांना दोन्ही प्रकरणात जामीन मिळाला आहे. त्यामुळे पाच महिन्यांनंतर त्याचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. के कविता यांना ९ मार्च रोजी अटक करण्यात आली होती.

दिल्ली कथित मध्य घोटाळ्याशी संबधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मंगळवारी भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के. कविता यांना जामीन मंजूर केला. आहे. ईडी आणि सीबीआयच्या दोन्ही खटल्यांमध्ये त्यांना जामीन मिळाला आहे. न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठाने  दोन्ही प्रकरणांमध्ये प्रत्येकी १० लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर कविता जामीन मंजूर केला. कविता यांना त्यांचा पासपोर्ट कनिष्ठ न्यायालयात जमा करावा लागणार आहे. कविता या शिक्षित आहेत किंवा आमदार किंवा खासदार आहेत तर त्यांना पीएमएलए कायद्यातील तरतुदींच्या लाभांपासून वंचित ठेवता येईल, असे म्हणता येणार नाही, असं कोर्टानं म्हटलं. यादरम्यान कोर्टाने ईडी आणि सीबीआयला कविताचा मद्य घोटाळ्यातील सहभाग सिद्ध करण्यासाठी पुरावे सादर करण्यास सांगितले.

के कविता यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आपल्या अशिलासाठी जामीन मागितला होता. दोन तपास यंत्रणांनी त्यांच्याविरुद्ध तपास पूर्ण केला आहे, असा युक्तीवाद रोहतगी यांनी केला होता.

सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?

"के कविता ५ महिन्यांपासून तुरुंगात आहे. भविष्यात या खटल्याचा निकाल लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्ण कोठडीचे शिक्षेत रूपांतर करू नये. कविता पीएमपीएलच्या कलम ४५ अंतर्गत लाभांसाठी पात्र आहे. सुशिक्षित महिलांशी भेदभाव करता येत नाही. न्यायालये या वर्गाप्रती संवेदनशील आणि सहानुभूती दाखवणारी असावीत. अशा बाबींवर निर्णय देताना न्यायालयांनी विवेकबुद्धीचा वापर करावा. केवळ एक महिला सुशिक्षित आहे किंवा संसद सदस्य किंवा विधानपरिषदेची सदस्य आहे म्हणून पीएमपीएल कायद्याच्या कलम ४५ च्या तरतुदीचा लाभ मिळण्यास पात्र नाही असे कोर्ट म्हणत नाही. दिल्ली उच्च न्यायालयाच्या या आदेशाला कायदा बनवण्याची परवानगी दिली तर या निरीक्षणांचा अर्थ असा होईल की कोणत्याही सुशिक्षित महिलेला जामीन मिळणार नाही. याउलट, आम्ही म्हणतो की न्यायालये खासदार आणि सामान्य व्यक्ती यांच्यात फरक नसावा. खटला निःपक्षपाती असला पाहिजे. स्वत:वर गुन्हा दाखल असणाऱ्या व्यक्तीला साक्षीदार करण्यात आले आहे. उद्या तुम्ही तुमच्या आवडीचे कोणाला उचलू शकता? तुम्ही निवडकपणे कोणताही आरोपी ठरवू शकत नाही," असं कोर्टाने यावेळी म्हटलं.

नेमकं प्रकरण काय?

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता यांना दिल्ली मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात १५ मार्चमध्ये हैदराबादमधून ईडीने अटक केली होती. त्यानंतर सीबीआयने त्यांना अटक केली. ईडीने दावा केला होता की साउथ ग्रुपने आम आदमी पक्षाच्या नेत्यांसाठी विजय नायर आणि इतरांना १०० कोटी रुपयांची लाच दिली होती. कवितासुद्धा  या ग्रुपच्या एक भाग होत्या. या ग्रुपमध्ये दक्षिणेतील राजकारणी, नोकरशहा आणि व्यापारी यांचा समावेश आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, के कविता यांनी १९-२० मार्च २०२१ रोजी आरोपी विजय नायरची भेट घेतली होती. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCBIगुन्हा अन्वेषण विभागEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय