शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

मोहन भागवतांनी 'देशद्रोह' केला; राहुल गांधींच्या टीकेवर भाजप नेत्यांचा पलटवार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 17:22 IST

BJP VS Congress: राहुल गांधींनी मोहन भागवतांचे संविधानावरील वक्तव्य देशद्रोह असल्याचे म्हटले आहे.

Rahul Gandhi on Mohan Bhagwat: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांच्या विधानावर जोरदार हल्ला चढवला आहे. मोहन भागवत यांच्या वक्तव्याला देशद्रोह ठरवत राहुल गांधी म्हणाले की, भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले नाही, हे भागवतांचे विधान संविधानाविरोधात आहे. हे भारतीय जनतेचा घोर अपमान आहे. हे विधान म्हणजे देशद्रोह आहे, अशी टीका राहुल गांधींनी केली. दरम्यान, राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर आता भाजपने त्यांच्यावर टीका सुरू केली आहे.

निर्मला सीतारामन यांचे जोरदार प्रत्युत्तरराहुल गांधींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, जे नेते लोकसभेत बसून राज्यघटनेनुसार शपथ घेतात, तेच नेते आता भारताच्या विरोधात वक्तव्ये करू लागले, तर ही चिंताजनक बाब आहे. राहुल गांधींचे वक्तव्य फेटाळून लावत त्या म्हणतात, हे विधान देशाच्या एकता आणि अखंडतेच्या विरोधात आहे. राहुल गांधी हे भारताचे विरोधी पक्षनेते आहेत आणि अशी विधाने करणे हे केवळ त्यांच्या पदाच्या विरोधात नाही, तर भारतीय जनतेची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न आहे.

भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया काय म्हणालेदिल्ली भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनीही राहुल गांधींच्या वक्तव्यावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, राहुल गांधींनी भारताच्या अखंडतेची शपथ घेतली होती आणि आता ते त्याच भारताशी लढण्याची भाषा करत आहेत. हे देशद्रोहाचे वक्तव्य आहे. राहुल गांधींवर निशाणा साधत भाटिया म्हणाले की, ते देशाच्या विरोधात असलेल्या लोकांसोबत स्टेज शेअर करतात. राहुल गांधींचे हे विधान अवैध असून, ते आपल्या पक्षाच्या राजकीय फायद्यासाठी राष्ट्रहिताकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते.

जेपी नड्डाांचे प्रत्युत्तर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही राहुल गांधींच्या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया दिली. नड्डा म्हणाले की, काँग्रेसचा इतिहास नेहमीच अशा शक्तींना पाठिंबा देण्याचा राहिला आहे, ज्यांना भारत कमकुवत पहायचा आहे. राहुल गांधींच्या सत्तेच्या लालसेने त्यांना देशाच्या अखंडतेविरुद्ध बोलण्यास भाग पाडले आहे. भारतीय जनता पक्ष सदैव भारताच्या एकता आणि अखंडतेच्या बाजूने उभा राहील आणि काँग्रेसची ही विचारधारा कधीही मान्य केली जाणार नाही.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीMohan Bhagwatमोहन भागवतBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघcongressकाँग्रेस