शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

मोहन भागवतांनी 'देशद्रोह' केला; राहुल गांधींच्या टीकेवर भाजप नेत्यांचा पलटवार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 17:22 IST

BJP VS Congress: राहुल गांधींनी मोहन भागवतांचे संविधानावरील वक्तव्य देशद्रोह असल्याचे म्हटले आहे.

Rahul Gandhi on Mohan Bhagwat: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांच्या विधानावर जोरदार हल्ला चढवला आहे. मोहन भागवत यांच्या वक्तव्याला देशद्रोह ठरवत राहुल गांधी म्हणाले की, भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले नाही, हे भागवतांचे विधान संविधानाविरोधात आहे. हे भारतीय जनतेचा घोर अपमान आहे. हे विधान म्हणजे देशद्रोह आहे, अशी टीका राहुल गांधींनी केली. दरम्यान, राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर आता भाजपने त्यांच्यावर टीका सुरू केली आहे.

निर्मला सीतारामन यांचे जोरदार प्रत्युत्तरराहुल गांधींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, जे नेते लोकसभेत बसून राज्यघटनेनुसार शपथ घेतात, तेच नेते आता भारताच्या विरोधात वक्तव्ये करू लागले, तर ही चिंताजनक बाब आहे. राहुल गांधींचे वक्तव्य फेटाळून लावत त्या म्हणतात, हे विधान देशाच्या एकता आणि अखंडतेच्या विरोधात आहे. राहुल गांधी हे भारताचे विरोधी पक्षनेते आहेत आणि अशी विधाने करणे हे केवळ त्यांच्या पदाच्या विरोधात नाही, तर भारतीय जनतेची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न आहे.

भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया काय म्हणालेदिल्ली भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनीही राहुल गांधींच्या वक्तव्यावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, राहुल गांधींनी भारताच्या अखंडतेची शपथ घेतली होती आणि आता ते त्याच भारताशी लढण्याची भाषा करत आहेत. हे देशद्रोहाचे वक्तव्य आहे. राहुल गांधींवर निशाणा साधत भाटिया म्हणाले की, ते देशाच्या विरोधात असलेल्या लोकांसोबत स्टेज शेअर करतात. राहुल गांधींचे हे विधान अवैध असून, ते आपल्या पक्षाच्या राजकीय फायद्यासाठी राष्ट्रहिताकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते.

जेपी नड्डाांचे प्रत्युत्तर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही राहुल गांधींच्या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया दिली. नड्डा म्हणाले की, काँग्रेसचा इतिहास नेहमीच अशा शक्तींना पाठिंबा देण्याचा राहिला आहे, ज्यांना भारत कमकुवत पहायचा आहे. राहुल गांधींच्या सत्तेच्या लालसेने त्यांना देशाच्या अखंडतेविरुद्ध बोलण्यास भाग पाडले आहे. भारतीय जनता पक्ष सदैव भारताच्या एकता आणि अखंडतेच्या बाजूने उभा राहील आणि काँग्रेसची ही विचारधारा कधीही मान्य केली जाणार नाही.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीMohan Bhagwatमोहन भागवतBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघcongressकाँग्रेस