शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

"मोहन भागवतांना हे बोलण्याचा अधिकार नाही"; मंदिर-मशीद मुद्द्यावरून रामभद्राचार्य भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 17:41 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानावर स्वामी रामभद्राचार्यांनी संताप व्यक्त केला. मंदिर-मशीद वादावर त्यांनी भूमिका मांडली. 

Swami Rambhadracharya on Mohan Bhagwat Statement: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानाची देशभरात चर्चा सुरू आहे. त्यांच्या विधानाला विरोधही होत आहे. तुलसी पिठाधीश्वेर स्वामी रामभद्राचार्य यांनी तर 'मोहन भागवत यांना असे बोलण्याचा अधिकार नाही, असे म्हणत संताप व्यक्त केला आहे. 

धर्माची व्याख्या सांगणारे ते कोण आहेत?

स्वामी रामभद्राचार्य यांनी मोहन भागवत यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "माझा सर्वात जास्त आक्षेप या गोष्टीवर आहे की, त्यांना हे बोलण्याचा अधिकारी नाही की, आता मंदिर-मशीद सगळं सोडून द्यायला.  आम्ही शोधत नाहीये. जिथे जिथे आमच्या मंदिरांचे पुरावे आहेत, आम्हाला तेच हवे आहेत. दुसरा आक्षेप म्हणजे त्यांनी (मोहन भागवत) असं म्हटलं की, राम मंदिर निर्माणानंतर काही लोक असे मुद्दे उपस्थित करून पुढारी होऊ इच्छित आहे. कोणाला पुढारी व्हायचे आहे?", असा सवाल स्वामी रामभद्राचार्य यांनी केला.

"माझा तिसरा आक्षेप हा आहे की, त्यांनी (मोहन भागवत) नाशिकमध्ये असे म्हटले की, धर्माची चुकीची व्याख्या केली जात आहे. नीट अर्थ सांगितला जात नाहीये. आम्हाला धर्माची व्याख्या सांगणारे, ते कोण आहेत? धर्माचार्य आम्ही आहोत, जगतगुरू आम्ही आहोत. आमच्यापेक्षा जास्त धर्म त्यांना थोडी माहिती आहे. त्यांनी अशी विधाने करायला नको. ते एका संघटनेचे प्रमुख आहेत. हिंदू धर्माचे ते प्रमुख नाहीत. त्यांच्या म्हणण्यांनुसार हिंदू धर्म चालणार नाही", असे भाष्य स्वामी रामभद्राचार्य यांनी केले. 

"धर्माचार्यांना बोलवून चर्चा करायला हवी होती" "त्यांनी (मोहन भागवत) आधी संत, धर्माचार्य यांना बोलवायला हवे होते. त्यांनी त्यांची चिंता मांडली असती, तर आम्ही धर्माचार्यांनी त्यांचे समाधान केले असते. आम्हाला निर्देश देणारे ते कोण आहेत? आम्हाला त्यांच्या मशिदी नकोय. जिथे जिथे पुरावे आहेत, ते आम्हाला हवे आहे. इतिहासाला आम्ही सोडणार नाही. अधिकार गमावून बसणे या सगळ्यात मोठे दुर्दैव आहे. आपल्या भावालाही दंड देणे हाच धर्म आहे", असे स्वामी रामभद्राचार्य म्हणाले. 

मंदिर-मशीद वादावर बोलताना स्वामी रामभद्राचार्य म्हणाले, "सर्व्हेमध्ये जिथे जिथे आमची मंदिरं आहेत, तिथे तिथे आम्हाला अधिकार हवा आहे. आम्ही त्यांच्या मशिदी कधीही तोडल्या नाहीत. त्यांनी आमची तीस हजार मंदिरं तोडली आहेत, मग कमीत कमी सर्व्हेमध्ये जिथे मुख्य मंदिरं आढळत आहेत, ते तर आम्हाला मिळायला हवेत. आम्हाला यापलिकडे काहीही नकोय. भागवतजींना असा म्हणण्याचा अधिकार नाहीये की, लोक नेता बनण्याचे प्रयत्न करताहेत. आम्हाला नेता बनायचे नाही. आम्ही केवळ अधिकारांची लढाई लढतोय", अशी भूमिका त्यांनी मांडली. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघReligious Placesधार्मिक स्थळेUttar Pradeshउत्तर प्रदेश