शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
3
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
4
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
5
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
7
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
8
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
9
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
10
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
11
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
12
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
13
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
14
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
15
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
17
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
18
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
19
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
20
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?

मोदींच्या भाषणांची पातळी खूपच घसरली - प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 06:07 IST

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांची पातळी खूप घसरली आहे. यावरून त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसते, अशी टीका अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांची पातळी खूप घसरली आहे. यावरून त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसते, अशी टीका करीत अशा व्यक्तीला जनतेने पंतप्रधान करू नये, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे संयोजक अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त गंज पेठ येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना आंबेडकर यांनी मोदी व पवार यांच्यावर टीका केली. लोकसभा निवडणुकांनंतर एच.डी. देवेगौडा यांच्यासारखी व्यक्ती पंतप्रधान होईल, याचा आंबेडकर यांनी पुनरुच्चार केला. भारतीय जनता पक्ष सत्तेत येणार नाही. मोदींचे संतुलन बिघडल्याने अशा व्यक्तीस जनतेने पुन्हा पंतप्रधान पदावर बसवू नये. राज्यातील निकालांबाबत सट्टा बाजारातही संभ्रम आहे. त्यामुळे मलाही सांगता येणार नाही. मात्र, वंचित बहुजन आघाडीला मान्यताप्राप्त पक्ष होण्याइतपत जागा नक्की मिळतील, असा दावा आंबेडकर यांनी केला.निवडणूक झाल्यानंतर पवार यांनी लगेच दुष्काळी गावांचा दौरा केला. त्यानंतर आम्ही दुष्काळी दौरा केल्यामुळे राज्य शासनाला जाग आल्याचा दावा पवार यांनी केला. पवार यांचे नाव न घेता आंबेडकर म्हणाले, मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. ही आमची संस्कृती नाही. मीही अनेकवेळा दुष्काळी भागांचा दौरा केला आहे. पण त्याबाबत कधीच मार्केटिंग केले नाही. एक सत्तेवर बसले आहेत. आणि दुसरे ५० वर्ष सत्तेत होते. त्यांनी दुष्काळी निवारणासाठी किती प्रयत्न केले आहेत? उलट आपल्या मतदारसंघात पाणी पळविले.पवार यांची भीती अनाठायीबारामतीत वेगळा निकाल लागला तर ईव्हीएमवरील लोकांचा विश्वास उडेल, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. पवार यांची ही भीती अनाठायी आहे. बारामतीमध्ये झालेल्या विकासकामांमुळे सुप्रिया सुळे यांचा पराभव होणार नाही, असेही आंबेडकर यांनी सांगितले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNarendra Modiनरेंद्र मोदी