शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

मोदींच्या भाषणांची पातळी खूपच घसरली - प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 06:07 IST

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांची पातळी खूप घसरली आहे. यावरून त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसते, अशी टीका अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांची पातळी खूप घसरली आहे. यावरून त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसते, अशी टीका करीत अशा व्यक्तीला जनतेने पंतप्रधान करू नये, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे संयोजक अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त गंज पेठ येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना आंबेडकर यांनी मोदी व पवार यांच्यावर टीका केली. लोकसभा निवडणुकांनंतर एच.डी. देवेगौडा यांच्यासारखी व्यक्ती पंतप्रधान होईल, याचा आंबेडकर यांनी पुनरुच्चार केला. भारतीय जनता पक्ष सत्तेत येणार नाही. मोदींचे संतुलन बिघडल्याने अशा व्यक्तीस जनतेने पुन्हा पंतप्रधान पदावर बसवू नये. राज्यातील निकालांबाबत सट्टा बाजारातही संभ्रम आहे. त्यामुळे मलाही सांगता येणार नाही. मात्र, वंचित बहुजन आघाडीला मान्यताप्राप्त पक्ष होण्याइतपत जागा नक्की मिळतील, असा दावा आंबेडकर यांनी केला.निवडणूक झाल्यानंतर पवार यांनी लगेच दुष्काळी गावांचा दौरा केला. त्यानंतर आम्ही दुष्काळी दौरा केल्यामुळे राज्य शासनाला जाग आल्याचा दावा पवार यांनी केला. पवार यांचे नाव न घेता आंबेडकर म्हणाले, मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. ही आमची संस्कृती नाही. मीही अनेकवेळा दुष्काळी भागांचा दौरा केला आहे. पण त्याबाबत कधीच मार्केटिंग केले नाही. एक सत्तेवर बसले आहेत. आणि दुसरे ५० वर्ष सत्तेत होते. त्यांनी दुष्काळी निवारणासाठी किती प्रयत्न केले आहेत? उलट आपल्या मतदारसंघात पाणी पळविले.पवार यांची भीती अनाठायीबारामतीत वेगळा निकाल लागला तर ईव्हीएमवरील लोकांचा विश्वास उडेल, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. पवार यांची ही भीती अनाठायी आहे. बारामतीमध्ये झालेल्या विकासकामांमुळे सुप्रिया सुळे यांचा पराभव होणार नाही, असेही आंबेडकर यांनी सांगितले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNarendra Modiनरेंद्र मोदी