शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

मोदी-शहा यांची भीती अखेर ओसरू लागली - चिदम्बरम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 06:30 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट देताना निवडणूक आयोगात मतभेद झाल्याच्या वृत्ताच्या संदर्भात काँग्रेस नेते पी. चिदम्बरम यांनी शनिवारी सांगितले की, मोदी-शहा जोडीची दहशत अखेर कमी होऊ लागली आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट देताना निवडणूक आयोगात मतभेद झाल्याच्या वृत्ताच्या संदर्भात काँग्रेस नेते पी. चिदम्बरम यांनी शनिवारी सांगितले की, मोदी-शहा जोडीची दहशत अखेर कमी होऊ लागली आहे.महाराष्ट्रातील वर्धा आणि लातूर येथील भाषणांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. याप्रकरणी निवडणूक आयोगाने मोदी यांना क्लीन चिट दिली असली तरी आयोगाच्या एका सदस्याने क्लीन चिटला विरोध केल्याचे वृत्त बाहेर आले आहे. मोदी यांनी आचारसंहिता आणि आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा भंग केला आहे, असे मत आयोगाच्या एका सदस्याने दिले होते.या पार्श्वभूमीवर चिदम्बरम यांनी आपल्या टष्ट्वीटमध्ये म्हटले की, निवडणूक आयोगात काही तरी जान आली आहे, असे संकेत यावरून मिळतात. ६, १२ आणि १९ मेचा टप्पा जवळ आलेला असताना निवडणूक आयोग कदाचित मोदी आणि शहा यांना समजही देऊ शकतो.आरोप आणि कार्यवाहीराहुल गांधी हे अल्पसंख्याकबहुल वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक का लढत आहेत, असे म्हणत मोदी यांनी राहुल यांच्यावर वर्ध्यातील भाषणात टीका केली होती. लातूर येथील भाषणात मोदींनी बालाकोट एअरस्ट्राईक आणि पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या नावे मते मागितली होती. त्यावरून काँग्रेसने मोदी यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल केल्या होत्या.निवडणूक आयोगाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, आयोगाच्या बैठकीत एका आयुक्तांनी मोदींच्या विरोधात मत व्यक्त केले. त्यामुळे आयोगाने बहुमताच्या आधारे मोदींना क्लीन चिट दिली. तथापि, हा निर्णय निम-न्यायिक (क्वासी-ज्युडिशियल) नसल्यामुळे विरोधी मताची लेखी नोंद घेण्यात आली नाही. निवडणूक आयोग कायदा-१९९१ नुसार, एखाद्या मुद्यावर मतभेद झाल्यास आयोगाने बहुमताच्या आधारे निर्णय घ्यावा, अशी तरतूद आहे. निर्णय प्रक्रियेत मुख्य निवडणूक आयुक्तांसह तिन्ही आयुक्तांना समान अधिकार आहेत. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा