शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

'7 दिवसांत आपल्या अधिकाऱ्यांना परत बोलवा, अन्यथा...', मोदी सरकारचा ट्रुडोंना अल्टिमेटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 14:23 IST

भारताने कॅनडावर त्यांच्याच शब्दात वार केला आहे. केंद्र सरकारने कॅनडाला आपले 41 अधिकारी परत बोलवण्यास सांगितले आहे.

India-Canada: खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरुन भारत आणि कॅनडा, यांच्यात मोठा तणाव निर्माण झाला आहे. यादरम्यान, आता भारताने ट्रूडो सरकारला भारतातील आपल्या अधिकाऱ्यांना(डिप्लोमॅट) परत बोलावण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. मोदी सरकारने कॅनडाला 10 ऑक्टोबरपर्यंत भारतातून 41 अधिकाऱ्यांना परत बोलावण्यास सांगितले आहे. 

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या भारतात कॅनडाचे 62 डिप्लोमॅट आहेत. मोदी सरकारने ही संख्या 21 वर आणण्यास सांगितले आहे. म्हणजेच भारत सरकारने कॅनडाला 10 ऑक्टोबरपर्यंत आपल्या 41 अधिकाऱ्यांना परत बोलावण्यास सांगितले आहे. 10 ऑक्‍टोबरनंतरही हे अधिकारी भारतातच राहिले, तर त्यांचे अधिकार काढून घेतले जातील, असे भारताने सांगितले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॅनडाचे परराष्ट्र मंत्रालय आणि भारत सरकारने यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. पण भारताने कॅनडाला संख्येबाबत आधीच सांगितले होते की, दोन्ही देशांतील मुत्सद्दींची उपस्थिती समान असावी. 21 सप्टेंबर रोजी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले होते, भारतात कॅनडाच्या अधिकाऱ्यांची संख्या, कॅनडातील भारतीय अधिकाऱ्यांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. त्यामुळे ती कमी करण्याची गरज आहे.

रिपोर्ट्सनुसार, परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावरील कॅनडाच्या सिनेट समितीचे अध्यक्ष पीटर बोहम यांनी सांगितले की, भारतातील अतिरिक्त कॅनेडियन मुत्सद्दींवर भारत सरकारच्या निर्णयामुळे परिस्थिती आणखी बिघडेल. या निर्णयानंतर दोन्ही देशांमध्ये सुरू असलेला तणाव कमी करणे अधिक कठीण होणार आहे. कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांना भारताकडून अशा प्रतिक्रियेची अपेक्षा नाही, असे पीटर बोहम यांचे म्हणणे आहे. 

दोन्ही देशांमध्ये राजनैतिक तणाव कायम खलिस्तानी दहशतवादी हरदीप निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा हात असल्याचा आरोप करत कॅनडाने 18 सप्टेंबर रोजी एका वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्याची हकालपट्टी केली, त्यानंतर दोन्ही देशातील राजनैतिक तणाव वाढला. त्यानंतर भारताने कॅनडाच्या एका उच्च अधिकाऱ्याला पाच दिवसांत देश सोडण्याचे आदेश जारी केले होते. दरम्यान, भारताने कॅनडाचे आरोप फेटाळून लावले असून, कॅनडातील हिंसाचाराच्या कोणत्याही घटनेत भारत सरकारचा सहभाग असल्याचा आरोप मूर्खपणाचा असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCanadaकॅनडाIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय