शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने सत्तेसाठी इतरांची सरकारं पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका
2
सर्वांनी माघार घेतली तर उमेदवार-नोटामध्ये निवडणूक का नाही? आयुक्त राजीव कुमारांनी केले स्पष्ट
3
Lipi Rastogi Suicide Note : मुंबईत आयएएस दाम्पत्याच्या मुलीची आत्महत्या, 'सुसाइड नोट'मध्ये काय? आलं समोर...
4
"आश्वासक बदल दिसला नाहीतर मी..."; CM शिंदेंचा उल्लेख करत शरद पवारांचा सरकारला इशारा
5
"कोणी केले सांगा, आम्ही त्यांना शिक्षा देऊ"; अमित शाह यांनी धमकावल्याच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
6
भारतातल्या पहिल्या निवडणुकीच्या मास्टरमाईंडवर येतोय सिनेमा, विद्या बालनच्या पतीची मोठी घोषणा
7
विजयापूर्वीच जल्लोषाची तयारी, पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून भाजपा कार्यालयापर्यत होणार रोड शो  
8
पॉवर शेअर चमकला, सरकारचा आहे ५१ टक्के हिस्सा; १३ एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी करा, भाव वाढणार..."
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पुढील लोकसभा निवडणूक एप्रिलमध्येच संपविणार
10
“आमच्या नादाला लागू नका, उद्धव ठाकरे हे...”; रवी राणांच्या दाव्यावर संजय राऊतांचा पलटवार
11
"हातकणंगलेमधून मीच निवडून येणार"; निकालाआधीच राजू शेट्टींनी थेट लीडच सांगितलं
12
T20 World Cup मधील सर्वात तरूण आणि वयस्कर खेळाडू कोण? तब्बल २५ वर्षांचे अंतर
13
प्रेरणादायी! इंजिनिअर झाला वेटर, विकली चित्रपटाची तिकिटं; ६ वेळा नापास, ७ व्या प्रयत्नात IRS
14
Akasa Air च्या दिल्ली-मुंबई विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; अहमदाबादेत ईमर्जन्सी लँडिंग
15
Exit Poll मध्ये भाजप्रणित एनडीएला बहुमत; गुंतवणूकदारांच्या उड्या, Adani च्या शेअर्समध्ये तुफान तेजी
16
निवडणूक आयोग गायब नव्हता; लोकसभा निकालापूर्वी पत्रकार परिषद घेत आयुक्तांनी सुनावले
17
BREAKING Lipi Rastogi: आयएएस अधिकारी विकास रस्तोगींच्या मुलीची आत्महत्या, मंत्रालयासमोरच्या इमारतीत घडला प्रकार
18
महाराष्ट्रात आम्ही ३५ पेक्षा जास्त जागा जिंकणार; निकालाआधी विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा
19
बहिणीला प्रियकरासोबत पाहताच संतापला भाऊ; वडिलांसह मिळून केली मुलाची निर्घृण हत्या
20
चर्चेतील 'या' हाॅट सीट्सवर बाजी मारणार तरी काेण ? कुठे लागू शकतात धक्कादायक निकाल?

बांगलादेशनं भारताला प्रगतीच्याबाबतीत खरंच मागे टाकलं आहे का? केंद्रानं संसदेत दिलं उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 3:51 PM

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारला बांगलादेशच्या होणाऱ्या प्रगतीवरुन सातत्यानं प्रश्न विचारले जात आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारला बांगलादेशच्या होणाऱ्या प्रगतीवरुन सातत्यानं प्रश्न विचारले जात आहे. बांगलादेशच्या दरडोई उत्पनावरुन विरोधी पक्षानं केंद्र सरकारला धारेवर धरलं. त्यावर केंद्र सरकारनंही प्रत्युत्तर दिलं आहे. गेल्या वर्षी जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं (आयएमएफ) दरडोई उत्पन्नामध्ये बांगलादेश भारतालाही मागे टाकण्याची शक्यता आहे, असा अहवाल प्रकाशित केला होता. याच मुद्द्यावरुन संसदेत रणकंदन सुरू आहे. (Modi govt tells if Bangladesh is set to surpass India’s per capita income in 2021)

केंद्र सरकारनं दिलं उत्तरआयएमएफनं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार खरंच बांगलादेश २०२१ मध्ये दरडोई उत्पन्नात भारताला मागे टाकणार आहे का? असा सवाल सरकारला विचारण्यात आला. त्यावर सरकारकडून केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी बाजू मांडली. आयएमएफ आणि वर्ल्ड इकोनॉमिक आऊटलूकच्या (WEO) अहवालानुसार भारतात दरडोई सकल राष्ट्रीय उप्तन्नाचा (GDP) अंदाज व्यक्त करायचा झाल्यास एप्रिल २०२१ मध्ये ७३३२.९ अमेरिकी डॉलर इतका होता. तर बांगलादेशमध्ये हाच आकडा ५८११.६ अमेरिकी डॉलर इतका होता. यावरुन भारतच पुढे असल्याचं स्पष्ट होतं, अशी माहिती पंकज चौधरी यांनी संसदेत दिली. 

आयएमएफ काय सांगतं?आयएमएफच्या माहितीनुसार एप्रिल २०२१ मध्ये भारताची अर्थव्यवस्था १२.५ टक्के इतक्या दरानं वाढली आहे. हा आजवरचा विक्रम आहे, असं पंकज चौधरी म्हणाले. भारताचं दरडोई उत्पन्न २०१६ साली बांगलादेशपेक्षा ४१ टक्क्यांनी अधिक होते. त्यावेळी भारताचं दरडोई उत्पन्न ५८३९.९ अमेरिकी डॉलर, तर बांगलादेशचं ४११८.९ अमेरिकी डॉलर इतकं होतं. 

यंदाच्या वर्षात बांगलादेश सरकारकडून काही आकडे जारी करण्यात आले. त्यावर विश्वास ठेवायचा झाल्यास बांगलादेश दरडोई उत्पन्नात भारतापेक्षा पुढे निघून गेला आहे. बांगलादेश सरकारच्या दाव्यानुसार देशातील दरडोई उत्पन्न २२२७ डॉलर पर्यंत पोहोचलं आहे. हाच आकडा २०१९-२० या वर्षात २०६४ डॉलर इतका होता. भारताशी तुलना केल्यास दरडोई उत्पन्नाचा भारताचा आकडा १९४७.४१ डॉलर इतका आहे.

विश्लेषकांनी बांगलादेशचे आकडे नाकारलेदरम्यान, भारतीय अर्थ विश्लेषकांनी बांगलादेश सरकारनं जारी केलेले आकडे नाकारले आहेत. एका परदेशी वित्तीय कंपनीत काम करणाऱ्या अर्थशास्त्रज्ञाच्या माहितीनुसार बांगलादेश एक लेबर इंटेसिव्ह एक्सपोर्ट इकोनॉमीवर आधारलेला देश आहे. त्यामुळे तो भारताला मागे टाकू शकेल असा विचार करणं चुकीचं आहे. भारतात कोरोना प्रादुर्भाव नियंत्रित होत असताना बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेत तेजी पाहायला मिळाली होती. त्यामुळे भारत आणि बांगलादेशच्या आकड्यांची तुलना केली जाऊ शकत नाही, असंही ते म्हणाले. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशEconomyअर्थव्यवस्थाIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी