शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
3
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
4
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
5
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
6
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
7
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
8
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
9
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
10
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
11
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
12
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
13
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
14
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
15
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
16
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
17
सुंदर पिचाई, नाडेला यांची ‘अळी मिळी गुपचिळी’ का?; आयटी क्षेत्रात मोठी अस्वस्थता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

“४१ वर्षे जे कायदे बनवले गेले, ते चुकीचे होते का”; मोदी सरकारने विरोधकांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 14:24 IST

संसदेत कोणतीही चर्चा न करता विधेयके मंजूर केली जातात, या विरोधकांच्या आरोपाचा मोदी सरकारने चांगलाच समाचार घेतला.

नवी दिल्ली: आताच्या घडीला संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. पावसाळी अधिवेशनातील गैरवर्तणुकीबाबत राज्यसभेने १२ खासदारांचे निलंबन केले. यावरून राजकीय वातावरण तापले असताना आता केंद्रातील मोदी सरकारने विरोधकांना चांगलेच सुनावले आहे. संसदेत कोणतीही चर्चा न करता विधेयके मंजूर केली जातात, असा आरोप विरोधकांनी केला होता. यावर उत्तर देताना केंद्र सरकारने विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. सभागृहात सादर केलेली विधेयके संसदीय समितीकडे पाठवणे, यावरून लोकशाहीचे मोजमाप करता येत नाही, या शब्दांत सरकारने विरोधकांना सुनावले आहे. 

संसदीय समित्यांची स्थापना सन १९९३ मध्ये करण्यात आली होती. याचा अर्थ यापूर्वीची ४१ वर्षे जे कायदे संसदेसमोर सादर करण्यात आले, ते चुकीचे होते का, तेव्हा देशात लोकशाही नव्हती का आणि देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ते अगदी राजीव गांधी यांच्यापर्यंत यांच्या काळात तयार करण्यात आलेले कायदे चुकीचे होते, असे समजायचे का, अशी विचारणा केंद्र सरकारने यावेळी विरोधकांना केली. 

बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान समितीकडे पाठवले नव्हते

याशिवाय बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची घटना तयार केल्यानंतर ती कोणत्याही समितीकडे पाठवली नव्हती, असा टोला लगावत सन २०१४ पूर्वी २५ वर्षे केंद्रात स्थापन झालेली सरकारे कमकुवत होती. एकमत नसतानाही सत्ताधारी पक्षांतर्गत विविध विचार आणि मतभेदांमुळे विधेयके संसदीय समित्यांकडे पाठवली जात होती. ते आवश्यकही होते. मात्र, २०१४ नंतर केंद्रात बहुमताचे सरकार आले. बहुसंख्य सदस्यांचे एकसमान मत असल्यामुळे संसदेच्या स्थायी समित्यांकडे विधेयके पाठवण्याची वेळ आली नाही, असेही केंद्र सरकारने म्हटले आहे. 

काय आहे विरोधकांचा मोदी सरकारवर आरोप?

२००४ ते २००९ या कालावघीत ६० टक्के विधेयके संसदीय समित्यांकडे पाठवण्यात आली. तर २००९ ते २०१४ या कालावधीत ७१ टक्के विधेयके संसदीय समितीकडे पाठवण्यात आली. मात्र, मोदी सरकार सत्तेत आल्यापासून म्हणजेच २०१४ ते २०१९ या कालावधीत केवळ २७ टक्के विधेयके संसदीय समितीकडे पाठवण्यात आली. ती संख्या २०१९ नंतर आणखीन घसरली आणि २०१९ ते आतापर्यंत संसदीय समितीकडे केवळ १२ टक्के विधेयके पाठवण्यात आली, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. 

मोदी सरकारचे आकडेवारीसह स्पष्टीकरण

विरोधकांनी केलेल्या आरोपांचे खंडन करत मोदी सरकाने आकडेवारीसह स्पष्टीकरण दिले आहे. सन २०१४ ते २०१९ या कालावधीत राज्यसभेत केवळ १८ विधेयके सादर करण्यात आली. यापैकी ११ म्हणजेच ६१ टक्के विधेयके राज्यसभेच्या समित्यांकडे पाठवण्यात आली होती. तर, ५ म्हणजेच २८ टक्के विधेयके लोकसभेच्या समित्यांकडे पाठवण्यात आली होती. 

टॅग्स :ParliamentसंसदCentral Governmentकेंद्र सरकार