शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारच्या मास्टरस्ट्रोकमुळे विरोधकांची विकेट?

By बाळकृष्ण परब | Updated: January 8, 2019 14:46 IST

थोडक्यात सांगायचं तर गरीब सवर्णांना देऊ केलेल्या आरक्षणाचा प्रत्यक्षात लाभ कधी मिळेल याबाबत छातीठोकपणे कुणीच सांगू शकणार नाही. मात्र आरक्षण विधेयक पारीत झाले तर श्रेय भाजपा आणि मोदींना तर पडले तर त्याचे खापर विरोधकांच्या माथी, असा एकूण मामला आहे. 

ठळक मुद्देराफेल घोटाळ्यातील आरोपांचे विमान घोंघावत असताना मोदी सरकारने सवर्णांना आरक्षणाची घोषणा करून सवर्णांच्या आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आणला गरीब सवर्णांसाठी आरक्षणाच्या घोषणेमुळे आगामी काही दिवसांत भाजपाविरोधात आक्रमक असलेल्या अनेक पक्षांची कोंडी झाली आहे.सवर्ण आरक्षण विधेयक पारीत झाले तर श्रेय भाजपा आणि मोदींना तर पडले तर त्याचे खापर विरोधकांच्या माथी, असा एकूण मामला आहे

- बाळकृष्ण परब अनेक वर्षांनंतर केंद्रात स्पष्ट बहुमताचे सरकार चालवणाऱ्या नरेंद्र मोदींना गेल्या काही दिवसांपासून अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गतनिवडणुकीत दिलेल्या वारेमाप आश्वासनांपैकी अनेक आश्वासनांची पूर्तता न झाल्याने सरकारवर प्रश्नांची चौफेर सरबत्ती होत आहे. त्यातच पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल सरकारविरोधात गेल्याने होऊ घातलेली लोकसभा निवडणूक मोदी सरकारला जड जाणार असेच वाटत आहे. अशा परिस्थितीत मोदी सरकारने सोमवारी कुणाच्या ध्यानिमनी नसताना एक अशी चाल खेळली आहे ज्यामुळे आगामी काही दिवसांत भाजपाविरोधात आक्रमक असलेल्या अनेक पक्षांची कोंडी झाली आहे. ती चाल म्हणजे सवर्ण जातींमधील आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्यांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या कारकिर्दीत धक्कातंत्राचा वापर करून विरोधकांना वारंवार नामोहरम केले आहे. आताही डोक्यावर राफेल घोटाळ्याच्या आरोपांचे विमान घोंघावत असताना मोदी सरकारने सवर्णांना आरक्षणाची घोषणा करून सवर्णांच्या आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आणला आहे. त्यामुळे नाही म्हटले तरीही सरकारविरोधातील अनेक मुद्द्यांवरून लक्ष विखुरले जाणार आहे. सरकारच्या या घोषणेनंतर विरोधी पक्षांनी या निर्णयाबाबत घेतलेली सावध भूमिका त्याचेच उदाहरण म्हणता येईल. हा निर्णय लोकसभा  निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून घेण्यात आला आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. मात्र या निर्णयाविरोधात भूमिका घेण्याचा प्रयत्न काँग्रेस करणार नाही. दुसरीकडे आप, बसपासारख्या पक्षांनी निर्णयाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. निवडणुकांमध्ये भाजपाला होणाऱ्या मतदानामध्ये सवर्ण जातींचे प्रमाण अधिक असते. मात्र भाजपाप्रमाणेच काँग्रेसलाही सवर्ण जातींमधून लक्षणीय प्रमाणात मतदान होते. काँग्रेसने जिथे सवर्ण जातींचा पाठिंबा गमावलाय, अशा ठिकाणी काँग्रेस कमकुवत झाली आहे. त्यामुळे सवर्ण आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेसची कोंडी होणार आहे. काही प्रमाणात तीच परिस्थिती महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची आहे.  आता सवर्णांना दिलेले आरक्षण घटनेच्या चौकटीत बसत नाही. 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही. असे आरक्षण दिल्यास ते असंवैधानिक ठरवून सर्वोच्च न्यायालयात ते टिकणार नाही. न्यायालय ते रद्द करेल. असे घटना तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान,  केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी लोकसभेमध्ये हे विधेयक सादर केले आहे. या विधेयकाविरोधात भूमिका घेणे विरोधी पक्षांना अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे काही अपवाद वगळता बहुतेक सर्वच पक्ष आज सावध भूमिकेमध्ये दिसत आहेत.  समजा तशी भूमिका कुठल्या पक्षाने घेतली आणि हे विधेयक पडले तर त्या पक्षाविरोधात आयते कोलीत भाजपाला मिळणार आहे.

अगदी थोडक्यात सांगायचं तर गरीब सवर्णांना देऊ केलेल्या आरक्षणाचा प्रत्यक्षात लाभ कधी मिळेल याबाबत छातीठोकपणे कुणीच सांगू शकणार नाही. मात्र सवर्ण आरक्षणाचे हे आश्वासन भाजपासाठी गाजराची पुंगी ठरणार आहे. वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली. कारण सवर्ण आरक्षण विधेयक पारीत झाले तर श्रेय भाजपा आणि मोदींना तर पडले तर त्याचे खापर विरोधकांच्या माथी, असा एकूण मामला आहे. 

टॅग्स :reservationआरक्षणNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेस