शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

केंदाच्या तिजोरीत खडखडाट; नव्या योजनांना कात्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 06:49 IST

केंद्र सरकार : पंतप्रधान, वित्तमंत्र्यांची कठोर भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोनाच्या भयानक संकटाशी देश मुकाबला करीत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा लागणार आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीतून विविध गोष्टींवर होणाऱ्या भारंभार खर्चाला कात्री लावण्यासाठी येत्या मार्चअखेरीपर्यंत एकही नवी योजना न राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

या कालावधीत पंतप्रधानांची गरीब कल्याण योजना व आत्मनिर्भर अभियानाच्या कक्षेत येणाºया मनरेगासारख्या योजनांवरच फक्त खर्च करण्यात येईल. नवीन योजनांचे प्रस्ताव केंद्रीय मंत्र्यांनी पाठवू नयेत, अशा स्पष्ट सूचना त्यांना वित्तमंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत.यासंदर्भात वित्तमंत्रालयाने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की, देशामध्ये कोरोना संकटाचा मुकाबला करताना अनेक उपाययोजनांसाठी सरकारी तिजोरीतून मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे हाती असलेला पैसा व संसाधने यांचा जपून वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्राधान्यक्रमाच्या गोष्टी ठरविणे आवश्यक होते. त्यामुळेच येत्या मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत एकही नवी योजना न राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मंजूर झालेल्या योजनाही ३१ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. देशाचा राष्ट्रीय ठोकळ उत्पन्नाचा (जीडीपी) भावी काळातील विकास दर गेल्या ११ वर्षांतील प्रमाणापेक्षा सर्वात कमी असेल, तसेच गेल्या चार दशकांत झाले नसेल इतके देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान होणार आहे, असे काही ठोकताळे वित्तीय संस्थांनी नुकतेच मांडले होते.भारताच्या संभाव्य आर्थिक दुरवस्थेबद्दल मुडीज पतमापन संस्थेनेही भाकीत केले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी कठोर निर्णय घेतले आहेत.

कोरोना स्थितीनुसार वित्तीय धोरण ठरणारकोरोना साथ येत्या काळात किती प्रमाणात आटोक्यात येते यावरच पुढील आर्थिक वर्षाची वित्तीय धोरणे ठरविण्यात येतील, असे वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या महिन्यात म्हटले होते.कोरोना साथीमुळे डळमळीत झालेल्या अर्थव्यवस्थेलाचालना व जनतेला दिलासा देण्याकरिता केंद्र सरकारने20.97लाख रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. भारतात कोरोना साथीचा फैलाव कमी होण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत. लॉकडाऊनचा काळ फार लांबविणे अर्थव्यवस्थेसाठी मारक ठरेल, हे लक्षात आल्याने केंद्र सरकारने निर्बंध हटविण्यासाठी पावले टाकायला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून खर्चालाकात्री लावण्याचे ठरविले आहे.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनcorona virusकोरोना वायरस बातम्या