शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

केंदाच्या तिजोरीत खडखडाट; नव्या योजनांना कात्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 06:49 IST

केंद्र सरकार : पंतप्रधान, वित्तमंत्र्यांची कठोर भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोनाच्या भयानक संकटाशी देश मुकाबला करीत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा लागणार आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीतून विविध गोष्टींवर होणाऱ्या भारंभार खर्चाला कात्री लावण्यासाठी येत्या मार्चअखेरीपर्यंत एकही नवी योजना न राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

या कालावधीत पंतप्रधानांची गरीब कल्याण योजना व आत्मनिर्भर अभियानाच्या कक्षेत येणाºया मनरेगासारख्या योजनांवरच फक्त खर्च करण्यात येईल. नवीन योजनांचे प्रस्ताव केंद्रीय मंत्र्यांनी पाठवू नयेत, अशा स्पष्ट सूचना त्यांना वित्तमंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत.यासंदर्भात वित्तमंत्रालयाने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की, देशामध्ये कोरोना संकटाचा मुकाबला करताना अनेक उपाययोजनांसाठी सरकारी तिजोरीतून मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे हाती असलेला पैसा व संसाधने यांचा जपून वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्राधान्यक्रमाच्या गोष्टी ठरविणे आवश्यक होते. त्यामुळेच येत्या मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत एकही नवी योजना न राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मंजूर झालेल्या योजनाही ३१ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. देशाचा राष्ट्रीय ठोकळ उत्पन्नाचा (जीडीपी) भावी काळातील विकास दर गेल्या ११ वर्षांतील प्रमाणापेक्षा सर्वात कमी असेल, तसेच गेल्या चार दशकांत झाले नसेल इतके देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान होणार आहे, असे काही ठोकताळे वित्तीय संस्थांनी नुकतेच मांडले होते.भारताच्या संभाव्य आर्थिक दुरवस्थेबद्दल मुडीज पतमापन संस्थेनेही भाकीत केले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी कठोर निर्णय घेतले आहेत.

कोरोना स्थितीनुसार वित्तीय धोरण ठरणारकोरोना साथ येत्या काळात किती प्रमाणात आटोक्यात येते यावरच पुढील आर्थिक वर्षाची वित्तीय धोरणे ठरविण्यात येतील, असे वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या महिन्यात म्हटले होते.कोरोना साथीमुळे डळमळीत झालेल्या अर्थव्यवस्थेलाचालना व जनतेला दिलासा देण्याकरिता केंद्र सरकारने20.97लाख रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. भारतात कोरोना साथीचा फैलाव कमी होण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत. लॉकडाऊनचा काळ फार लांबविणे अर्थव्यवस्थेसाठी मारक ठरेल, हे लक्षात आल्याने केंद्र सरकारने निर्बंध हटविण्यासाठी पावले टाकायला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून खर्चालाकात्री लावण्याचे ठरविले आहे.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनcorona virusकोरोना वायरस बातम्या