शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

केंदाच्या तिजोरीत खडखडाट; नव्या योजनांना कात्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 06:49 IST

केंद्र सरकार : पंतप्रधान, वित्तमंत्र्यांची कठोर भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोनाच्या भयानक संकटाशी देश मुकाबला करीत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा लागणार आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीतून विविध गोष्टींवर होणाऱ्या भारंभार खर्चाला कात्री लावण्यासाठी येत्या मार्चअखेरीपर्यंत एकही नवी योजना न राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

या कालावधीत पंतप्रधानांची गरीब कल्याण योजना व आत्मनिर्भर अभियानाच्या कक्षेत येणाºया मनरेगासारख्या योजनांवरच फक्त खर्च करण्यात येईल. नवीन योजनांचे प्रस्ताव केंद्रीय मंत्र्यांनी पाठवू नयेत, अशा स्पष्ट सूचना त्यांना वित्तमंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत.यासंदर्भात वित्तमंत्रालयाने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की, देशामध्ये कोरोना संकटाचा मुकाबला करताना अनेक उपाययोजनांसाठी सरकारी तिजोरीतून मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे हाती असलेला पैसा व संसाधने यांचा जपून वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्राधान्यक्रमाच्या गोष्टी ठरविणे आवश्यक होते. त्यामुळेच येत्या मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत एकही नवी योजना न राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मंजूर झालेल्या योजनाही ३१ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. देशाचा राष्ट्रीय ठोकळ उत्पन्नाचा (जीडीपी) भावी काळातील विकास दर गेल्या ११ वर्षांतील प्रमाणापेक्षा सर्वात कमी असेल, तसेच गेल्या चार दशकांत झाले नसेल इतके देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान होणार आहे, असे काही ठोकताळे वित्तीय संस्थांनी नुकतेच मांडले होते.भारताच्या संभाव्य आर्थिक दुरवस्थेबद्दल मुडीज पतमापन संस्थेनेही भाकीत केले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी कठोर निर्णय घेतले आहेत.

कोरोना स्थितीनुसार वित्तीय धोरण ठरणारकोरोना साथ येत्या काळात किती प्रमाणात आटोक्यात येते यावरच पुढील आर्थिक वर्षाची वित्तीय धोरणे ठरविण्यात येतील, असे वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या महिन्यात म्हटले होते.कोरोना साथीमुळे डळमळीत झालेल्या अर्थव्यवस्थेलाचालना व जनतेला दिलासा देण्याकरिता केंद्र सरकारने20.97लाख रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. भारतात कोरोना साथीचा फैलाव कमी होण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत. लॉकडाऊनचा काळ फार लांबविणे अर्थव्यवस्थेसाठी मारक ठरेल, हे लक्षात आल्याने केंद्र सरकारने निर्बंध हटविण्यासाठी पावले टाकायला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून खर्चालाकात्री लावण्याचे ठरविले आहे.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनcorona virusकोरोना वायरस बातम्या