शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

PM Kisan Mandhan Yojana: शेतकऱ्यांना मोदी सरकार दरवर्षी देणार ३६ हजार रुपये, केवळ करावं लागेल एवढं काम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 17:43 IST

PM Kisan Mandhan Yojana Update: केंद्र सरकारने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक योजना सुरू करत असते. या योजनांमध्ये पीएम किसान मानधन योजनेचाही समावेश आहे. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ३६ हजार रुपये दिले जातात.

नवी दिल्ली - भारत एक कृषिप्रधान देश आहे. मात्र तरीही शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अद्याप सुधारलेली नाही. दरवर्षी शेतकरी आर्थिक नुकसानीमुळे मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत असतात. दरम्यान, केंद्र सरकारने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक योजना सुरू करत असते. या योजनांमध्ये पीएम किसान मानधन योजनेचाही समावेश आहे.

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ३६ हजार रुपये दिले जातात. दरम्यान, ही रक्कम पेन्शनच्या रूपामध्ये सरकार शेतकऱ्यांना दर महिन्याला ३ हजार रुपये दिले जातात.

पीएम किसान मानधन योजनेसाठी शेतकऱ्यांना अगदी माफक रक्कम दरवर्षी जमा करावी लागेल. १८ ते ४० वर्षांच्या वयोगटातील कुणीही शेतकऱ्यांसाठीच्या या योजनेचा फायदा घेऊ शकतात. वयाच्या हिशोबाने शेतकऱ्यांनी दर महिन्याला विम्याचा हप्ता म्हणून जमा करावी लागणारी रक्कम निश्चित केली जाते. ही रक्कम ५५ रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत येते. या पेन्शन फंडची भारतीय जीवन विमान निगमकडून देखरेख केली जात आहे.

पीएम किसान मानधन योजनेनुसार ज्या शेतकऱ्यांचं वय १८ वर्षांपासून २९ वर्षांपर्यंत आहे. त्यांना ५५ रुपयांपासून १०९ रुपये हप्ता जमा करावे लागतील. तर ३० वर्षांपासून ३९ वर्षांपर्यंतच्या शेतकऱ्यांना दरमहा ११० रुपयांपासून १९९ रुपयांदरम्यान हप्ता द्यावा लागेल.

त्याशिवाय जे शेतकरी ४० व्या वर्षी या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील त्यांना दरमहा २०० रुपये हप्ता द्यावा लागेल. जेव्हा शेतकऱ्याचं वय ६० वर्षे होईल, तेव्हा सरकारकडून दर वर्षी ३६ हजार रुपये आणि दर महिन्याला ३ हजार रुपये दिले जातील.  

टॅग्स :FarmerशेतकरीMONEYपैसाCentral Governmentकेंद्र सरकार