शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

PM Kisan Mandhan Yojana: शेतकऱ्यांना मोदी सरकार दरवर्षी देणार ३६ हजार रुपये, केवळ करावं लागेल एवढं काम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 17:43 IST

PM Kisan Mandhan Yojana Update: केंद्र सरकारने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक योजना सुरू करत असते. या योजनांमध्ये पीएम किसान मानधन योजनेचाही समावेश आहे. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ३६ हजार रुपये दिले जातात.

नवी दिल्ली - भारत एक कृषिप्रधान देश आहे. मात्र तरीही शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अद्याप सुधारलेली नाही. दरवर्षी शेतकरी आर्थिक नुकसानीमुळे मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत असतात. दरम्यान, केंद्र सरकारने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक योजना सुरू करत असते. या योजनांमध्ये पीएम किसान मानधन योजनेचाही समावेश आहे.

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ३६ हजार रुपये दिले जातात. दरम्यान, ही रक्कम पेन्शनच्या रूपामध्ये सरकार शेतकऱ्यांना दर महिन्याला ३ हजार रुपये दिले जातात.

पीएम किसान मानधन योजनेसाठी शेतकऱ्यांना अगदी माफक रक्कम दरवर्षी जमा करावी लागेल. १८ ते ४० वर्षांच्या वयोगटातील कुणीही शेतकऱ्यांसाठीच्या या योजनेचा फायदा घेऊ शकतात. वयाच्या हिशोबाने शेतकऱ्यांनी दर महिन्याला विम्याचा हप्ता म्हणून जमा करावी लागणारी रक्कम निश्चित केली जाते. ही रक्कम ५५ रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत येते. या पेन्शन फंडची भारतीय जीवन विमान निगमकडून देखरेख केली जात आहे.

पीएम किसान मानधन योजनेनुसार ज्या शेतकऱ्यांचं वय १८ वर्षांपासून २९ वर्षांपर्यंत आहे. त्यांना ५५ रुपयांपासून १०९ रुपये हप्ता जमा करावे लागतील. तर ३० वर्षांपासून ३९ वर्षांपर्यंतच्या शेतकऱ्यांना दरमहा ११० रुपयांपासून १९९ रुपयांदरम्यान हप्ता द्यावा लागेल.

त्याशिवाय जे शेतकरी ४० व्या वर्षी या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील त्यांना दरमहा २०० रुपये हप्ता द्यावा लागेल. जेव्हा शेतकऱ्याचं वय ६० वर्षे होईल, तेव्हा सरकारकडून दर वर्षी ३६ हजार रुपये आणि दर महिन्याला ३ हजार रुपये दिले जातील.  

टॅग्स :FarmerशेतकरीMONEYपैसाCentral Governmentकेंद्र सरकार